शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पितृपक्षानिमित्त गोदाकिनारी श्राध्दविधीसाठी भाविकांची गर्दी

By admin | Updated: September 22, 2016 18:50 IST

भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून शनिवारी महालयारंभ पर्वास सुरुवात झाली असून दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणा-या गोदावरी नदी किनारी भाविकांची तर्पण तसेच श्राध्दकर्म करण्यासाठी गर्दी होत आहे.

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. २२ : भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून शनिवारी (दि. १७) महालयारंभ पर्वास सुरुवात झाली असून दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणा-या गोदावरी नदी किनारी भाविकांची तर्पण तसेच श्राध्दकर्म करण्यासाठी गर्दी होत आहे. प्रभु रामचंद्राने आपले पिता अर्थात राजा दशरथ यांचा श्राध्दविधी पंचवटीतील रामकुंड येथे केल्याने तसेच दक्षिण दिशेला पितरांचे स्थान असल्याने नाशिक या तिर्थक्षेत्री श्राध्दविधी करण्यासाठी जगभारातून भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळते. श्राद्ध कर्माच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांचे स्मरण करत कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्राद्ध करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत बघायला मिळते.

पितरांचे स्मरण करून श्राद्ध विधी करण्याबरोबरच तर्पणविधी, पिंडदान विधीदेखील करण्यात येत असल्याची माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या पितृ पक्षाच्या कालावधीत आपल्या पितरांचे स्मरण करण्यासाठी पाच प्रकारचे घास बाजुला काढून ठेवण्याची प्रथा असून यात गायीसाठी ‘गोगीरास’, अथितींसाठी ‘अतिथी भाग’, कुत्र्यांसाठी ‘श्वानभाग’, कावळयांसाठी ‘काकभाग’, किटकांसाठी ‘पितंग पंतंग भाग’ यांचा समावेश होतो.पितृपक्षातील १५ दिवसांमध्ये ज्यांना श्राद्धविधी करणे शक्य झाले नाही त्यांना कार्तिक वद्य प्रतिपदेपर्यंत (दि. १५ नोव्हेंबर) श्राद्ध विधी करता येईल. या पितृपक्षाअंतर्गत मंगळवारी (दि. २०) भरणी श्राद्ध, शुक्रवारी (दि. २३) अष्टमी श्राद्ध, मंगळवारी (दि. २७) द्वादशी श्राद्ध, तर शुक्रवारी (दि. ३०) सर्वपित्री अमावास्या या मुख्य तिथी असून ज्या पूर्वजांचे पौर्णिमेला निधन झाले त्यांच्यासाठी या दिवशी श्राद्धविधी करता येणार आहे.

ब्रह्मपुराणात उल्लेख केल्याप्रमाणे श्रद्धापूर्वक केलेले तर्पण म्हणजे श्राद्ध अशी आख्यायिका सांगण्यात आली आहे, यानुसार योग्य गोष्ट-योग्य वस्तु-योग्य ठिकाणी विधिपूर्वक पितरांना तसेच ब्राह्मणांना अर्पण करण्यासाठी हे विधी करण्यात येतात. हे श्राद्धविधी पूर्ण करण्यासाठी दर्भ, भात, जव, काळी तीळ यांना विशेष महत्त्व आहे. महालयारंभ काळात आई, वडील, काका, मामा, भाऊ, पत्नी, बहीण, आत्या, मावशी, गुरू, शिष्य, सासरे, ज्यांना पुत्र नाहीत तसेच अनंत जन्माचे बांधवांच्या स्मरणार्थ श्राद्धकर्म करण्यात येते. श्राद्धविधी करणे शक्य न झाल्यास संततीहिनता तसेच महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी आणि पितृदोषासारख्या समस्या उद्भवत असल्याचे दाखले पुराणात पहायला मिळतात.