शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
4
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
5
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
6
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
7
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
8
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
9
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
10
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
11
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
12
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
13
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
14
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
15
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
16
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
17
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
18
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
19
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
20
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...

पितृपक्षानिमित्त गोदाकिनारी श्राध्दविधीसाठी भाविकांची गर्दी

By admin | Updated: September 22, 2016 18:50 IST

भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून शनिवारी महालयारंभ पर्वास सुरुवात झाली असून दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणा-या गोदावरी नदी किनारी भाविकांची तर्पण तसेच श्राध्दकर्म करण्यासाठी गर्दी होत आहे.

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. २२ : भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून शनिवारी (दि. १७) महालयारंभ पर्वास सुरुवात झाली असून दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणा-या गोदावरी नदी किनारी भाविकांची तर्पण तसेच श्राध्दकर्म करण्यासाठी गर्दी होत आहे. प्रभु रामचंद्राने आपले पिता अर्थात राजा दशरथ यांचा श्राध्दविधी पंचवटीतील रामकुंड येथे केल्याने तसेच दक्षिण दिशेला पितरांचे स्थान असल्याने नाशिक या तिर्थक्षेत्री श्राध्दविधी करण्यासाठी जगभारातून भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळते. श्राद्ध कर्माच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांचे स्मरण करत कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्राद्ध करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत बघायला मिळते.

पितरांचे स्मरण करून श्राद्ध विधी करण्याबरोबरच तर्पणविधी, पिंडदान विधीदेखील करण्यात येत असल्याची माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या पितृ पक्षाच्या कालावधीत आपल्या पितरांचे स्मरण करण्यासाठी पाच प्रकारचे घास बाजुला काढून ठेवण्याची प्रथा असून यात गायीसाठी ‘गोगीरास’, अथितींसाठी ‘अतिथी भाग’, कुत्र्यांसाठी ‘श्वानभाग’, कावळयांसाठी ‘काकभाग’, किटकांसाठी ‘पितंग पंतंग भाग’ यांचा समावेश होतो.पितृपक्षातील १५ दिवसांमध्ये ज्यांना श्राद्धविधी करणे शक्य झाले नाही त्यांना कार्तिक वद्य प्रतिपदेपर्यंत (दि. १५ नोव्हेंबर) श्राद्ध विधी करता येईल. या पितृपक्षाअंतर्गत मंगळवारी (दि. २०) भरणी श्राद्ध, शुक्रवारी (दि. २३) अष्टमी श्राद्ध, मंगळवारी (दि. २७) द्वादशी श्राद्ध, तर शुक्रवारी (दि. ३०) सर्वपित्री अमावास्या या मुख्य तिथी असून ज्या पूर्वजांचे पौर्णिमेला निधन झाले त्यांच्यासाठी या दिवशी श्राद्धविधी करता येणार आहे.

ब्रह्मपुराणात उल्लेख केल्याप्रमाणे श्रद्धापूर्वक केलेले तर्पण म्हणजे श्राद्ध अशी आख्यायिका सांगण्यात आली आहे, यानुसार योग्य गोष्ट-योग्य वस्तु-योग्य ठिकाणी विधिपूर्वक पितरांना तसेच ब्राह्मणांना अर्पण करण्यासाठी हे विधी करण्यात येतात. हे श्राद्धविधी पूर्ण करण्यासाठी दर्भ, भात, जव, काळी तीळ यांना विशेष महत्त्व आहे. महालयारंभ काळात आई, वडील, काका, मामा, भाऊ, पत्नी, बहीण, आत्या, मावशी, गुरू, शिष्य, सासरे, ज्यांना पुत्र नाहीत तसेच अनंत जन्माचे बांधवांच्या स्मरणार्थ श्राद्धकर्म करण्यात येते. श्राद्धविधी करणे शक्य न झाल्यास संततीहिनता तसेच महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी आणि पितृदोषासारख्या समस्या उद्भवत असल्याचे दाखले पुराणात पहायला मिळतात.