शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

धरणाखालील पिके होरपळणार

By admin | Updated: November 25, 2015 01:07 IST

सोलापूरला उजनी धरणामध्ये पुण्यातील चार धरणांमधून १० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. याला विरोध करण्यासाठी येथील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

बापू बैलकर,  पुणेसोलापूरला उजनी धरणामध्ये पुण्यातील चार धरणांमधून १० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. याला विरोध करण्यासाठी येथील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. पण जर हे पाणी सोडले, तर या धरणाखालील पिके होरपळून जातील. चासकमान लाभक्षेत्रासाठी रब्बीसाठी एकच आवर्तन मिळणार असून, पुढील ७ महिने त्यांना पाणी...पाणी.. करावे लागणार आहे. त्यामुळे सोलापूरसाठी आवश्यक साठा उजनीत असताना, आमच्या धरणातून पाणी कशासाठी, असा सवाल येथील शेतकरी करीत आहे. पाणी सोडू नका, यासाठी खेड-शिरूरमधील शेतकऱ्यांनी जलस्रोत प्राधिकरणाकडे विनवनी केली. त्यांनी नकार दिल्यानंतर, न्यायालयात धाव घेतली. आता ३0 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. मात्र, आपल्याला न्याय मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर, शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहे. गेल्या महिनाभरापासून हे प्रकरण गाजत आहे. सोलापूरची पाण्याची गरज काय? व येथील धरणातून पाणी सोडल्यास काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याची माहिती घेतली असता, चासकमान व भामाआसखेड धरणाखालील पिकं होरपळून जाण्याची शक्यता आहे. चासकमान धरणाची क्षमता ३ टीएमसी आहे. त्यातील शेतसाठी ११२ दलघमी राखीव आहे. यातील ९0 दलघमी पाणी सोडण्याचे आदेश आहेत. ३९.८५ दलघमी पाणी येथील शेतीसाठी शिल्लक राहील. यातून फक्त एक आवर्तन होईल. हे आवर्तनही आता सोडले आहे. त्यामुळे शेतीसाठीचे पाणी शिल्लकच राहणार नाही. परत शेतकऱ्यांना पाण्यासाठी पुढील सात महिने पाणी मिळणार नाही. त्यामुळे येथील पिकं होरपळून जाण्याची शक्यता आहे. चासकमान व भामाआसखेड धरणाखालील ४0 हजार हेक्टरक्षेत्र या पाण्यावर अवलंबून आहे. तर, सोलापूरमधील आतापर्यंत ५ हजार एकर क्षेत्राचीच पाण्याची मागणी झाली आहे. जेव्हा आदेश झाले, तेव्हा तर फक्त ५00 हेक्टरचीच मागणी होते. असे असताना १ लाख हेक्टर क्षेत्रासाठी पुरेलएवढे पाणी सोडण्याची गरज काय, असा सवाल याचिकाकर्ते अ‍ॅड. सुरेश पलांडे व धयर््ौशील पलांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.1सोलापूरची ५ हजार एकर क्षेत्राची आतापर्यंत पाण्याची मागणी आहे. तसेच, अवघे अडीच टीएमसी पाणी पिण्यासाठी लागते. उजनी धरणात १८0३ दलघमी म्हणजे, ६४ टीएमसी अचलसाठा आहे. सरकारच्या परवानगीने तो वापरता येतो. २0११ पासून तो वापरलाही जात आहे. २0११ साली ६ टीएमसी, २0१२ साली ३0 टीएमसी, २0१३ साली १२ टीएमसी व २0१४साली १५ टीएमसी पाणी या अचलसाठ्यातून वापरले आहे. 2मग आताही यातून पाणी वापरणे शक्य असताना पुण्यातील धरणातून पाणी सोडण्याची गरज काय आहे, जर पिण्यासाठीच पाणी सोडले जात आहे, तर सोलापूरला अडीच टीएमसी पाण्याची गरज आहे. मग ६१ टीएमसी पाणी अचलसाठ्यात असताना, ते का सोडले जात नाही, असा सवाल येथील शेतकरी करीत आहेत.