शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

धरणाखालील पिके होरपळणार

By admin | Updated: November 25, 2015 01:07 IST

सोलापूरला उजनी धरणामध्ये पुण्यातील चार धरणांमधून १० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. याला विरोध करण्यासाठी येथील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

बापू बैलकर,  पुणेसोलापूरला उजनी धरणामध्ये पुण्यातील चार धरणांमधून १० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. याला विरोध करण्यासाठी येथील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. पण जर हे पाणी सोडले, तर या धरणाखालील पिके होरपळून जातील. चासकमान लाभक्षेत्रासाठी रब्बीसाठी एकच आवर्तन मिळणार असून, पुढील ७ महिने त्यांना पाणी...पाणी.. करावे लागणार आहे. त्यामुळे सोलापूरसाठी आवश्यक साठा उजनीत असताना, आमच्या धरणातून पाणी कशासाठी, असा सवाल येथील शेतकरी करीत आहे. पाणी सोडू नका, यासाठी खेड-शिरूरमधील शेतकऱ्यांनी जलस्रोत प्राधिकरणाकडे विनवनी केली. त्यांनी नकार दिल्यानंतर, न्यायालयात धाव घेतली. आता ३0 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. मात्र, आपल्याला न्याय मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर, शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहे. गेल्या महिनाभरापासून हे प्रकरण गाजत आहे. सोलापूरची पाण्याची गरज काय? व येथील धरणातून पाणी सोडल्यास काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याची माहिती घेतली असता, चासकमान व भामाआसखेड धरणाखालील पिकं होरपळून जाण्याची शक्यता आहे. चासकमान धरणाची क्षमता ३ टीएमसी आहे. त्यातील शेतसाठी ११२ दलघमी राखीव आहे. यातील ९0 दलघमी पाणी सोडण्याचे आदेश आहेत. ३९.८५ दलघमी पाणी येथील शेतीसाठी शिल्लक राहील. यातून फक्त एक आवर्तन होईल. हे आवर्तनही आता सोडले आहे. त्यामुळे शेतीसाठीचे पाणी शिल्लकच राहणार नाही. परत शेतकऱ्यांना पाण्यासाठी पुढील सात महिने पाणी मिळणार नाही. त्यामुळे येथील पिकं होरपळून जाण्याची शक्यता आहे. चासकमान व भामाआसखेड धरणाखालील ४0 हजार हेक्टरक्षेत्र या पाण्यावर अवलंबून आहे. तर, सोलापूरमधील आतापर्यंत ५ हजार एकर क्षेत्राचीच पाण्याची मागणी झाली आहे. जेव्हा आदेश झाले, तेव्हा तर फक्त ५00 हेक्टरचीच मागणी होते. असे असताना १ लाख हेक्टर क्षेत्रासाठी पुरेलएवढे पाणी सोडण्याची गरज काय, असा सवाल याचिकाकर्ते अ‍ॅड. सुरेश पलांडे व धयर््ौशील पलांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.1सोलापूरची ५ हजार एकर क्षेत्राची आतापर्यंत पाण्याची मागणी आहे. तसेच, अवघे अडीच टीएमसी पाणी पिण्यासाठी लागते. उजनी धरणात १८0३ दलघमी म्हणजे, ६४ टीएमसी अचलसाठा आहे. सरकारच्या परवानगीने तो वापरता येतो. २0११ पासून तो वापरलाही जात आहे. २0११ साली ६ टीएमसी, २0१२ साली ३0 टीएमसी, २0१३ साली १२ टीएमसी व २0१४साली १५ टीएमसी पाणी या अचलसाठ्यातून वापरले आहे. 2मग आताही यातून पाणी वापरणे शक्य असताना पुण्यातील धरणातून पाणी सोडण्याची गरज काय आहे, जर पिण्यासाठीच पाणी सोडले जात आहे, तर सोलापूरला अडीच टीएमसी पाण्याची गरज आहे. मग ६१ टीएमसी पाणी अचलसाठ्यात असताना, ते का सोडले जात नाही, असा सवाल येथील शेतकरी करीत आहेत.