शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धरणाखालील पिके होरपळणार

By admin | Updated: November 25, 2015 01:07 IST

सोलापूरला उजनी धरणामध्ये पुण्यातील चार धरणांमधून १० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. याला विरोध करण्यासाठी येथील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

बापू बैलकर,  पुणेसोलापूरला उजनी धरणामध्ये पुण्यातील चार धरणांमधून १० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. याला विरोध करण्यासाठी येथील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. पण जर हे पाणी सोडले, तर या धरणाखालील पिके होरपळून जातील. चासकमान लाभक्षेत्रासाठी रब्बीसाठी एकच आवर्तन मिळणार असून, पुढील ७ महिने त्यांना पाणी...पाणी.. करावे लागणार आहे. त्यामुळे सोलापूरसाठी आवश्यक साठा उजनीत असताना, आमच्या धरणातून पाणी कशासाठी, असा सवाल येथील शेतकरी करीत आहे. पाणी सोडू नका, यासाठी खेड-शिरूरमधील शेतकऱ्यांनी जलस्रोत प्राधिकरणाकडे विनवनी केली. त्यांनी नकार दिल्यानंतर, न्यायालयात धाव घेतली. आता ३0 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. मात्र, आपल्याला न्याय मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर, शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहे. गेल्या महिनाभरापासून हे प्रकरण गाजत आहे. सोलापूरची पाण्याची गरज काय? व येथील धरणातून पाणी सोडल्यास काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याची माहिती घेतली असता, चासकमान व भामाआसखेड धरणाखालील पिकं होरपळून जाण्याची शक्यता आहे. चासकमान धरणाची क्षमता ३ टीएमसी आहे. त्यातील शेतसाठी ११२ दलघमी राखीव आहे. यातील ९0 दलघमी पाणी सोडण्याचे आदेश आहेत. ३९.८५ दलघमी पाणी येथील शेतीसाठी शिल्लक राहील. यातून फक्त एक आवर्तन होईल. हे आवर्तनही आता सोडले आहे. त्यामुळे शेतीसाठीचे पाणी शिल्लकच राहणार नाही. परत शेतकऱ्यांना पाण्यासाठी पुढील सात महिने पाणी मिळणार नाही. त्यामुळे येथील पिकं होरपळून जाण्याची शक्यता आहे. चासकमान व भामाआसखेड धरणाखालील ४0 हजार हेक्टरक्षेत्र या पाण्यावर अवलंबून आहे. तर, सोलापूरमधील आतापर्यंत ५ हजार एकर क्षेत्राचीच पाण्याची मागणी झाली आहे. जेव्हा आदेश झाले, तेव्हा तर फक्त ५00 हेक्टरचीच मागणी होते. असे असताना १ लाख हेक्टर क्षेत्रासाठी पुरेलएवढे पाणी सोडण्याची गरज काय, असा सवाल याचिकाकर्ते अ‍ॅड. सुरेश पलांडे व धयर््ौशील पलांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.1सोलापूरची ५ हजार एकर क्षेत्राची आतापर्यंत पाण्याची मागणी आहे. तसेच, अवघे अडीच टीएमसी पाणी पिण्यासाठी लागते. उजनी धरणात १८0३ दलघमी म्हणजे, ६४ टीएमसी अचलसाठा आहे. सरकारच्या परवानगीने तो वापरता येतो. २0११ पासून तो वापरलाही जात आहे. २0११ साली ६ टीएमसी, २0१२ साली ३0 टीएमसी, २0१३ साली १२ टीएमसी व २0१४साली १५ टीएमसी पाणी या अचलसाठ्यातून वापरले आहे. 2मग आताही यातून पाणी वापरणे शक्य असताना पुण्यातील धरणातून पाणी सोडण्याची गरज काय आहे, जर पिण्यासाठीच पाणी सोडले जात आहे, तर सोलापूरला अडीच टीएमसी पाण्याची गरज आहे. मग ६१ टीएमसी पाणी अचलसाठ्यात असताना, ते का सोडले जात नाही, असा सवाल येथील शेतकरी करीत आहेत.