शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

निसर्गाचा कोप वाढला, पीकविमा काढला का? मिळते आर्थिक संरक्षणाची निश्चित हमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 06:22 IST

गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आता नुकसान टाळण्यासाठी पीक विमा काढणे अपरिहार्य ठरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आता नुकसान टाळण्यासाठी पीक विमा काढणे अपरिहार्य ठरत आहे. पीक विमा काढल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षणाची निश्चित हमी मिळते. या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करतानाच तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना पीकविमा काढणे अधिक सुसह्य व्हावे, याकरिता आता शासनाने ॲपची देखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

३१ जुलैची अंतिम मुदत

पीक विम्यासाठी १५ जुलै ही मुदत होती. पण यावेळी ती ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. परंतु, ज्यांनी आतापर्यंत पीक विमा काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांनी फार प्रतीक्षा न करता लवकरात लवकर तो काढणे गरजेचे आहे. कारण, शेवटच्या दिवशी संगणकीय व्यवस्थेवर ताण येऊन अनेकवेळा विमा काढणे जिकिरीचे होते.

ॲपवर करा नोंदणी 

पीक विम्यासाठी तयार करण्यात आलेले ई-पीक ॲप हे गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डाऊनलोड करता येईल. ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये जिल्हा, तालुका, गाव, खाते किंवा गट नंबर तसेच भूमापन किंवा गट क्रमांक, जमिनीचे एकूण क्षेत्रफळ, पोटखराबा आदी माहिती द्यावी लागेल. तसेच पिकाचे नाव, एकापेक्षा जास्त पिके असल्यास तशी माहिती असे अनेक बारकावे भरावे लागतील. या सर्व माहितीची या ॲपद्वारे शासन दफ्तरी नोंदणी होईल आणि एक रेकॉर्ड देखील तयार होईल. जर काही आपत्ती आली तर ही माहिती आधार मानली जाईल.

पीक विम्याची नोंदणी झपाट्याने होत आहे. हे सारे काम ऑनलाईन पद्धतीने केले जात आहे. तसेच, बीड जिल्ह्यासाठी यशस्वी ठरलेला बीड पॅटर्न यंदा राज्यभर राबवला जाणार आहे. - एकनाथ डवले, कृषी सचिव

यंदा बीड पॅटर्न

-  विमा योजना राज्यात पहिल्यांदा बीड जिल्ह्यात राबविण्यात आली. याकरिता केंद्र सरकारने पीक विमा कंपनी निश्चित करून दिली. या योजनेशी संबंधित शेतकरी, विमा कंपनी आणि कृषी अशा तीनही घटकांना लाभ मिळावा, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. 

- मध्यप्रदेशाच्या धर्तीवर ८०-११० (टक्के) आणि ६०-१३० (टक्के) अशा दोन प्रकारांत ही योजना आहे. यातील ८०-११० (टक्के) योजनेनुसार, शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत भरलेली रक्कम, त्यातून शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीसाठी द्यावे लागणारे पैसे वजा करून उरलेली रक्कम हा नफा म्हणून गणला जाईल. 

- नफ्यातील ८० टक्के रक्कम विमा कंपनीला तर उर्वरित २० टक्के रकमेतील १० टक्के रक्कम संबंधित जिल्ह्यातील विकासकामांसाठी आहे. याच धर्तीवर ६०-१३० (टक्के)  आखणी आहे. यंदापासून हीच योजना राज्यभर राबविली जाईल. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी