शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पीक विमा राफेलपेक्षा मोठा घोटाळा : पी साईनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 05:47 IST

नागपूर : केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री पीक विमा’ योजनेत ‘राफेल’पेक्षा मोठा घोटाळा झाला आहे, असा ...

नागपूर : केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री पीक विमा’ योजनेत ‘राफेल’पेक्षा मोठा घोटाळा झाला आहे, असा दावा ज्येष्ठ पत्रकार व कृषितज्ज्ञ पी. साईनाथ यांनी शनिवारी येथे केला.

ते म्हणाले, योजनेची तीन वर्षाची फलनिष्पत्ती निराशाजनकच राहिली. पहिल्या दोनच वर्षांत विमा घेणाऱ्या कंपन्यांनी या योजनेतून १५,७९५ कोटी रुपयांचा फायदा प्राप्त केला. या पीक योजनेत शेतकरीच फसले. फायदा कंपन्यांचाच झाला. मुळात सरकारने ही योजना शेतकºयांसाठी नव्हे तर विम्याचा व्यवसाय करणाºया कंपन्या व बँकांसाठी आणली.

‘नेशन फॉर फार्मर्स’तर्फे’ शेतकरी, शेतमजूर संघटनांतर्फे दिल्लीला जाणाºया मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी नागपुरात बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी अभ्यासक विजय जावंधिया उपस्थित होते.

पी. साईनाथ म्हणाले, जीएसटी व नोटाबंदीमुळे लघु उद्योजक व कृषी क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. सरकार मोठमोठे दावे करीत असले तरी शेतकºयांची स्थिती आधीपेक्षा अधिक वाईट झाली आहे. महाराष्टÑ शासनाने जवळपास १५० गावांमध्ये दुष्काळ असल्याचे जाहीर केले. वास्तविक राज्यात २५० पेक्षा जास्त गावात भीषण दुष्काळाची स्थिती आहे. सरकारला हे माहीत आहे व म्हणूनच केंद्राकडे ७,००० कोटी दुष्काळ निधीची मागणी करण्यात आली. मात्र सर्वेक्षणाच्या निकषामुळे सरकारी मदतीचा हवा तसा लाभ शेतकºयांना मिळणार नाही. महाराष्टÑासह देशाच्या अनेक भागात दुष्काळाची स्थिती अतिशय विदारक आहे. भविष्यातही अधिकच भीषण होणार आहे. पुढच्या दोन महिन्यानंतरच या स्थितीचा सामना करावा लागणार असून, पिण्यासाठीही पाण्याचे दुर्भिक्ष्य सहन करावे लागेल.‘शेतकºयांसाठी राष्टÑ’ आंदोलन २९ व ३० लादुष्काळ आणि शेती समस्येवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष सत्र बोलावून चर्चा करण्याच्या मागणीसाठी येत्या २९ व ३० नोव्हेंबरला ‘नेशन फॉर फार्मर्स’ ची घोषणा करीत दिल्ली येथे मोर्चा काढला जाणार आहे. देशभरातून लाखो शेतकरी, कार्यकर्ते, विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरवर्ग यात सहभागी होणार असल्याचे पी. साईनाथ यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी