शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

यूपीवाल्यांचा आणि राज ठाकरेंचा डीएनए एकच, सुब्रमण्यम स्वामी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 22:40 IST

यूपीवाले आणि राज ठाकरे यांचा डीएनए एकच आहे, अशी टीका भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

डोंबिवली- यूपीवाले आणि राज ठाकरे यांचा डीएनए एकच आहे, अशी टीका भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. राज ठाकरे म्हणतात की, यूपीवाला आला आणि त्यांनी मुंबईतील मराठी टॅक्सीवाल्याचा धंदा खाऊन टाकला. एक दिवशी मला ठाकरे यांचा केस सापडला. तो हैद्राबाद येथील डीएनए तपासासाठी पाठिवाला असता यूपीवाल्या टॅक्सीचालकाचा व राज ठाकरे यांचा डीएनए एकच मिळून आला. राज ठाकरे यांचा डीएनए यूपीचा असेल तर ते यूपीतून महाराष्ट्रात आले असल्याचं खळबळजनक वक्तव्य भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं. 

विराट हिंदूस्थान संगम आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विचार वेध या व्याख्यानाचे आयोजन डोंबिवली ब्राह्मण सभागृहात करण्यात आलं. हिंदुस्थान हा शब्द हिमालय आणि हिंदू सागर या दोन शब्दांच्या संधी मिलनातून तयार झालेला आहे. आर्य खैरबखिंडीतून आले. त्यांनी द्रविडाना हरविले हा खूळचट शोध इंग्रजांनी आपल्यावर लादला. गैर हिंदू लोक हे वास्तविक पाहता हे हिंदूच होते. डीएनएचा आधार घेतल्यास सगळ्या भारतीयांचा डिएनए एकच दिसून येतो. याविषयी बोलताना ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका करुन उपरोक्त वक्तव्याने खळबळ उडवली आहे..

मनसे कार्यकत्र्यानी विचारला स्वामी यांना जाबसुब्रमण्यम स्वामी यांनी राज ठाकरे व यूपीच्या लोकांचा डीएनए एकच असल्याचे वक्तव्य केल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी धाव घेतली. यावेळी स्वामी कार्यक्रम आटोपून परतण्याच्या तयारीत होते. त्यावेळी कदम यांनी स्वामी यांनी तुम्ही मराठी माणसासाठी काय केले आहे. राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी जे काम केले आहे. ते तुम्ही केले आहे का. तुम्हाला त्यांचा डीएनए काढण्याचा अधिकार काय असा सवाल उपस्थित करुन फेरीवाल्यांच्या प्रश्नावर तुम्ही काही एक भाष्य केले नाही. यावेळी स्वामी यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस होते. त्यांनी कदम यांना जास्त काही बोलू दिले नाही. स्वामी यांनी केवळ ठाकरे यांचा डीएनए काढला नसून राज ठाकरे यांनी मला सांगावे त्यांना ही गोष्ट सिद्ध करुन दाखविण्यास केव्हापण तयार आहे. त्यांचे आव्हान मी स्विकारू शकतो हे कार्यक्रमापश्चातही मीडीयाशी बोलताना स्वामी यांनी सांगितले. त्या पाठोपाठ मनसे त्यांना जाब विचारण्यासाठी पोहचले.