शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

टीपू सुलतानवर टीका, गांधीजींवर प्रेम, ही काय भानगड..?

By अतुल कुलकर्णी | Updated: January 30, 2022 11:44 IST

गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रातल्या बातम्या आणि तर्कवितर्क पाहून बाबूराव वैतागले होते. त्यांच्या समोर एकच प्रश्न होता तो म्हणजे, टीपू सुलतान योद्धा होता की नव्हता..? आणि होता तर आता ‘हे’ लोक त्याच्याविरुद्ध का बोलत आहेत... काही केल्या बाबूरावांचं डोकं चालेना. त्यांनी हा विषय थेट पुरातत्त्व विभागाकडं न्यायचं ठरवलं.

- अतुल कुलकर्णी

गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रातल्या बातम्या आणि तर्कवितर्क पाहून बाबूराव वैतागले होते. त्यांच्या समोर एकच प्रश्न होता तो म्हणजे, टीपू सुलतान योद्धा होता की नव्हता..? आणि होता तर आता ‘हे’ लोक त्याच्याविरुद्ध का बोलत आहेत... काही केल्या बाबूरावांचं डोकं चालेना. त्यांनी हा विषय थेट पुरातत्त्व विभागाकडं न्यायचं ठरवलं. तेवढ्यात बाबूरावांच्या सौ म्हणाल्या, तुम्ही थेट न जाता आधी त्या  पुरातत्त्ववाल्यांना पत्र लिहा. तुम्हाला काय म्हणायचं आहे सगळं त्यात मांडा, नंतर भेटायला जा... बाबूरावांना सौंचा सल्ला पटला. त्यांनी तात्काळ पत्र लिहायला घेतलं. ते पत्र असं -माननीय पुरातत्त्व विभागप्रमुख,तुमचा आणि सध्या देशात असणाऱ्या जुन्या-पुराण्या वस्तूंचा, बिल्डिंगचा, माणसांचा काही संबंध आहे की नाही..? असला तर तुम्हाला काही लिहिण्यात अर्थ आहे, नाहीतर कशाला वेळ वाया घालवू...? सध्या आमच्याकडं टीपू सुलतानवरून चर्चा, मोर्चा, गदारोळ सगळं काही चालू आहे. मुंबई भाजपाचे नेते, कार्यकर्ते टीपूचे नाव काढलं की अंगावर येतात. मुंबईत एका मैदानाला टीपू सुलतानचं नाव दिलं आहे. तशी मुंबई सात बेटांची होती म्हणे. आता हे मैदान नेमक्या कोणत्या बेटावरचं होतं? की भराव टाकून बनवलं होतं...? त्यामुळे त्या मैदानाचा सातबारा तुमच्या पुरातत्त्व विभागात कोणाच्या नावाने आहे हे कळू शकेल का?  आता टीपूचं नाव का दिलं असं विचारले की, आम्हाला लगेच काही जण देशद्रोही वगैरे म्हणतात. असं कोणाचं नाव घेतलं की, माणूस देशभक्त किंवा देशद्रोही ठरतो का? पुरातत्त्व विभागात याचे काही दाखले आहेत का...? बघा काही सापडतात का ते...? आमच्या मनात आणखी काही प्रश्न आहेत. ज्या मुंबईत टीपूच्या नावावरून वाद सुरू आहे त्याच मुंबईच्या अंधेरी भागात २००१ साली एका रस्त्याला टीपू सुलतानचे नाव दिलं म्हणे... आणि त्यावेळी भाजपचे सगळे नेते हजर होते.. एवढंच कशाला, २०१३ साली गोवंडीत एका रस्त्याला टीपूचं नाव दिलं आणि तो प्रस्ताव भाजपच्या नगरसेवकानेच आणला होता म्हणे... तिकडे अकोल्यातसुद्धा महापालिकेत स्थायी सभागृहाला टीपूचे नाव दिलंय... त्यासाठीच्या प्रस्तावाचे सूचक भाजपचेच नगरसेवक होते म्हणे... हे सगळं कुठं तपासून मिळेल... याची काही कागदपत्रे जुनी-पुराणी झाली म्हणून पुरातत्त्व विभागात पाठवली जातात का...? आमच्या घरी जुने कागद, पुस्तकं, एखादी बाटली सापडली तर लगेच आमच्या सौ. द्या पाठवून पुरातत्त्व विभागात असं म्हणतात.... म्हणून आपलं विचारलं... ते जाऊ द्या... २०१२ साली यदुरप्पा यांनी टीपू सुलतानच्या कबरीला भेट दिली होती आणि तिथल्या वहीत हा ग्रेट वॉरीयर होता, असं लिहून ठेवलंय म्हणे... ते तर काहीच नाही... आपले राष्ट्रपती २०१७ मध्ये कर्नाटक विधानसभेत आले होते. त्यावेळी त्यांनी टीपू सुलतानचं वर्णन ‘देशासाठी प्राणाची आहुती देणारा योद्धा,’ असं केलं होतं. आता हे सगळं जुनं-पुराणं कोण तपासून देणार सांगा बरं...? जाता जाता आणखी एक... आमच्या मुंबईत एक जांबोरी मैदान आहे. तिथं म्हणे महात्मा गांधीजींच्या नावाची पाटी होती... आणि ती शिवसेनेने काढली, असं भाजपवाले म्हणत आहेत... त्यामुळेसुद्धा आमच्या मनात काही प्रश्न आले आहेत... आमच्या पत्रात दिलेले सगळे दाखले भाजपवाले टीपू सुलतानवर प्रेम करणारे होते, असं सांगणारे आहेत. मात्र, तेच आता टीपूवर टीका आणि गांधीजींवर प्रेम करत आहेत... ही काय भानगड आहे...? याचे तपशील तुमच्या पुराण विभागात आहेत का? जाता जाता एकच शेवटचं सांगा, गांधीजी नेमके कोणाचे होते...? की फक्त सरकारी भिंतीवर लावण्यापुरतेच होते...? सगळं जग गांधीजींच्या विचारावर चालतोय असं म्हणतं... आपण नेमकं कोणाच्या विचारावर चालतोय... आपला आणि गांधीजींचा काही संबंध आहे का...? तुमच्या पुराण खात्यात त्याच्या काही नोंदी आहेत का..? बघा सापडतात का काही...?तुमचाच,बाबूराव

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र