शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

टीपू सुलतानवर टीका, गांधीजींवर प्रेम, ही काय भानगड..?

By अतुल कुलकर्णी | Updated: January 30, 2022 11:44 IST

गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रातल्या बातम्या आणि तर्कवितर्क पाहून बाबूराव वैतागले होते. त्यांच्या समोर एकच प्रश्न होता तो म्हणजे, टीपू सुलतान योद्धा होता की नव्हता..? आणि होता तर आता ‘हे’ लोक त्याच्याविरुद्ध का बोलत आहेत... काही केल्या बाबूरावांचं डोकं चालेना. त्यांनी हा विषय थेट पुरातत्त्व विभागाकडं न्यायचं ठरवलं.

- अतुल कुलकर्णी

गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रातल्या बातम्या आणि तर्कवितर्क पाहून बाबूराव वैतागले होते. त्यांच्या समोर एकच प्रश्न होता तो म्हणजे, टीपू सुलतान योद्धा होता की नव्हता..? आणि होता तर आता ‘हे’ लोक त्याच्याविरुद्ध का बोलत आहेत... काही केल्या बाबूरावांचं डोकं चालेना. त्यांनी हा विषय थेट पुरातत्त्व विभागाकडं न्यायचं ठरवलं. तेवढ्यात बाबूरावांच्या सौ म्हणाल्या, तुम्ही थेट न जाता आधी त्या  पुरातत्त्ववाल्यांना पत्र लिहा. तुम्हाला काय म्हणायचं आहे सगळं त्यात मांडा, नंतर भेटायला जा... बाबूरावांना सौंचा सल्ला पटला. त्यांनी तात्काळ पत्र लिहायला घेतलं. ते पत्र असं -माननीय पुरातत्त्व विभागप्रमुख,तुमचा आणि सध्या देशात असणाऱ्या जुन्या-पुराण्या वस्तूंचा, बिल्डिंगचा, माणसांचा काही संबंध आहे की नाही..? असला तर तुम्हाला काही लिहिण्यात अर्थ आहे, नाहीतर कशाला वेळ वाया घालवू...? सध्या आमच्याकडं टीपू सुलतानवरून चर्चा, मोर्चा, गदारोळ सगळं काही चालू आहे. मुंबई भाजपाचे नेते, कार्यकर्ते टीपूचे नाव काढलं की अंगावर येतात. मुंबईत एका मैदानाला टीपू सुलतानचं नाव दिलं आहे. तशी मुंबई सात बेटांची होती म्हणे. आता हे मैदान नेमक्या कोणत्या बेटावरचं होतं? की भराव टाकून बनवलं होतं...? त्यामुळे त्या मैदानाचा सातबारा तुमच्या पुरातत्त्व विभागात कोणाच्या नावाने आहे हे कळू शकेल का?  आता टीपूचं नाव का दिलं असं विचारले की, आम्हाला लगेच काही जण देशद्रोही वगैरे म्हणतात. असं कोणाचं नाव घेतलं की, माणूस देशभक्त किंवा देशद्रोही ठरतो का? पुरातत्त्व विभागात याचे काही दाखले आहेत का...? बघा काही सापडतात का ते...? आमच्या मनात आणखी काही प्रश्न आहेत. ज्या मुंबईत टीपूच्या नावावरून वाद सुरू आहे त्याच मुंबईच्या अंधेरी भागात २००१ साली एका रस्त्याला टीपू सुलतानचे नाव दिलं म्हणे... आणि त्यावेळी भाजपचे सगळे नेते हजर होते.. एवढंच कशाला, २०१३ साली गोवंडीत एका रस्त्याला टीपूचं नाव दिलं आणि तो प्रस्ताव भाजपच्या नगरसेवकानेच आणला होता म्हणे... तिकडे अकोल्यातसुद्धा महापालिकेत स्थायी सभागृहाला टीपूचे नाव दिलंय... त्यासाठीच्या प्रस्तावाचे सूचक भाजपचेच नगरसेवक होते म्हणे... हे सगळं कुठं तपासून मिळेल... याची काही कागदपत्रे जुनी-पुराणी झाली म्हणून पुरातत्त्व विभागात पाठवली जातात का...? आमच्या घरी जुने कागद, पुस्तकं, एखादी बाटली सापडली तर लगेच आमच्या सौ. द्या पाठवून पुरातत्त्व विभागात असं म्हणतात.... म्हणून आपलं विचारलं... ते जाऊ द्या... २०१२ साली यदुरप्पा यांनी टीपू सुलतानच्या कबरीला भेट दिली होती आणि तिथल्या वहीत हा ग्रेट वॉरीयर होता, असं लिहून ठेवलंय म्हणे... ते तर काहीच नाही... आपले राष्ट्रपती २०१७ मध्ये कर्नाटक विधानसभेत आले होते. त्यावेळी त्यांनी टीपू सुलतानचं वर्णन ‘देशासाठी प्राणाची आहुती देणारा योद्धा,’ असं केलं होतं. आता हे सगळं जुनं-पुराणं कोण तपासून देणार सांगा बरं...? जाता जाता आणखी एक... आमच्या मुंबईत एक जांबोरी मैदान आहे. तिथं म्हणे महात्मा गांधीजींच्या नावाची पाटी होती... आणि ती शिवसेनेने काढली, असं भाजपवाले म्हणत आहेत... त्यामुळेसुद्धा आमच्या मनात काही प्रश्न आले आहेत... आमच्या पत्रात दिलेले सगळे दाखले भाजपवाले टीपू सुलतानवर प्रेम करणारे होते, असं सांगणारे आहेत. मात्र, तेच आता टीपूवर टीका आणि गांधीजींवर प्रेम करत आहेत... ही काय भानगड आहे...? याचे तपशील तुमच्या पुराण विभागात आहेत का? जाता जाता एकच शेवटचं सांगा, गांधीजी नेमके कोणाचे होते...? की फक्त सरकारी भिंतीवर लावण्यापुरतेच होते...? सगळं जग गांधीजींच्या विचारावर चालतोय असं म्हणतं... आपण नेमकं कोणाच्या विचारावर चालतोय... आपला आणि गांधीजींचा काही संबंध आहे का...? तुमच्या पुराण खात्यात त्याच्या काही नोंदी आहेत का..? बघा सापडतात का काही...?तुमचाच,बाबूराव

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र