शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

गाेड्या पाण्यातील ‘वाघा’च्या अस्तित्वावरचे संकट टळले; ‘महाशीर’ला वाचवण्याच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 07:37 IST

लोणावळा, वाळवण येथील मत्स्योत्पादन केंद्राने पन्नास वर्षांत मत्स्य विभागांच्या मदतीने विविध राज्यांना १६.५० लाख महाशीर बीज पुरवले.

सचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोड्या पाण्यातील वाघ म्हणून ओळख असलेला महाशीर मासा इंद्रायणी नदीमधून कायमचा नाहीसा होईल, अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्याच्या संवर्धनासाठीच्या प्रयत्नांना यश येत आहे.

लोणावळा, वाळवण येथील मत्स्योत्पादन केंद्राने पन्नास वर्षांत मत्स्य विभागांच्या मदतीने विविध राज्यांना १६.५० लाख महाशीर बीज पुरवले. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, हरियाणा, पंजाब, ओडिशा, गोवा, राजस्थान, आंध्र प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र स्टेट अँगलिंग असोसिएशन, भोपाळ फिश फेडरेशन, वाइल्डलाइफ असोसिएशन ऑफ साऊथ इंडिया इत्यादींचा समावेश आहे. परिणामी आता या माशाचे संवर्धन होत आहे.

हिमालय व सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये महाशीर मोठ्या प्रमाणात आढळून येत असे; पण नंतर त्यांची संख्या वेगाने कमी होऊ लागली. नद्या, तलावांमध्ये कारखान्यांमधून सोडले जाणारे सांडपाणी व त्यामुळे दूषित हाेणारे वातावरण, अनियंत्रित मासेमारी, अंडी व पिलांचीही मोठ्या प्रमाणावर शिकार, मोठमोठ्या प्रकल्पांची उभारणी अशा कारणांमुळे महाशीर संकटात सापडला. ‘नामशेष होणार असलेला गोड्या पाण्यातील मासा,’ अशी आययूसीएनने त्याची नोंद केली.त्यानंतर केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेने महाशीरचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्याच्या संवर्धनाचा प्रस्ताव टाटा पॉवरकडे मांडला. त्याला मान्यता मिळाली. लोणावळा येथे वाळवण धारण प्रकल्पाजवळ केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेच्या सहयोगाने महाशीर प्रजनन केंद्र स्थापन करण्यात आले. यामध्ये निळे कल्ले असलेल्या आणि सर्वाधिक लक्षवेधी अशा सोनेरी महाशीरवर लक्ष केंद्रित करण्यात आले. गेली ५० वर्षे केंद्राने मौल्यवान प्रजातींच्या संख्या वृद्धीसाठी मदत, संकल्पना आणि अभिनव उपक्रम राबवले आहेत. 

 तलाव, नद्यांमधील महाशीरची संख्या वाढणे गरजेचे!महाशीर हा मासा आता धोकादायक स्थितीतील प्रजातींच्या यादीमधून बाहेर आलेला असला तरी प्रजनन कार्यक्रम सुरूच राहील. कारण तलाव व नद्यांमधील त्याची संख्या वाढली पाहिजे. हा मासा जेव्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये स्वतःहून प्रजनन करू लागेल तेव्हा अशा उपक्रमांना यश येईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.

* १९७० साली झाली प्रकल्पाची सुरुवातधोका असलेल्या महाशीर माशाच्या संवर्धनासाठी १९७० साली प्रकल्पाची सुरुवात झाली. राज्यांच्या मत्स्य विभागांच्या मदतीने माशांना पुन्हा शुद्ध, स्वच्छ, प्रदूषित नसलेल्या पाण्यामध्ये सोडणे हे आव्हान आहे. लोणावळा येथील मत्स्योत्पादन केंद्रामध्ये एकावेळी ५ लाख महाशीर पिले निर्माण करण्याची क्षमता आहे. दरवर्षी जवळपास ४ ते ५ लाख महाशीर पिले उत्पादनाचे उद्दिष्ट असून महाशीर माशांच्या संख्येत हळूहळू वाढ हाेत आहे.