शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

गाेड्या पाण्यातील ‘वाघा’च्या अस्तित्वावरचे संकट टळले; ‘महाशीर’ला वाचवण्याच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 07:37 IST

लोणावळा, वाळवण येथील मत्स्योत्पादन केंद्राने पन्नास वर्षांत मत्स्य विभागांच्या मदतीने विविध राज्यांना १६.५० लाख महाशीर बीज पुरवले.

सचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोड्या पाण्यातील वाघ म्हणून ओळख असलेला महाशीर मासा इंद्रायणी नदीमधून कायमचा नाहीसा होईल, अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्याच्या संवर्धनासाठीच्या प्रयत्नांना यश येत आहे.

लोणावळा, वाळवण येथील मत्स्योत्पादन केंद्राने पन्नास वर्षांत मत्स्य विभागांच्या मदतीने विविध राज्यांना १६.५० लाख महाशीर बीज पुरवले. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, हरियाणा, पंजाब, ओडिशा, गोवा, राजस्थान, आंध्र प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र स्टेट अँगलिंग असोसिएशन, भोपाळ फिश फेडरेशन, वाइल्डलाइफ असोसिएशन ऑफ साऊथ इंडिया इत्यादींचा समावेश आहे. परिणामी आता या माशाचे संवर्धन होत आहे.

हिमालय व सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये महाशीर मोठ्या प्रमाणात आढळून येत असे; पण नंतर त्यांची संख्या वेगाने कमी होऊ लागली. नद्या, तलावांमध्ये कारखान्यांमधून सोडले जाणारे सांडपाणी व त्यामुळे दूषित हाेणारे वातावरण, अनियंत्रित मासेमारी, अंडी व पिलांचीही मोठ्या प्रमाणावर शिकार, मोठमोठ्या प्रकल्पांची उभारणी अशा कारणांमुळे महाशीर संकटात सापडला. ‘नामशेष होणार असलेला गोड्या पाण्यातील मासा,’ अशी आययूसीएनने त्याची नोंद केली.त्यानंतर केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेने महाशीरचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्याच्या संवर्धनाचा प्रस्ताव टाटा पॉवरकडे मांडला. त्याला मान्यता मिळाली. लोणावळा येथे वाळवण धारण प्रकल्पाजवळ केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेच्या सहयोगाने महाशीर प्रजनन केंद्र स्थापन करण्यात आले. यामध्ये निळे कल्ले असलेल्या आणि सर्वाधिक लक्षवेधी अशा सोनेरी महाशीरवर लक्ष केंद्रित करण्यात आले. गेली ५० वर्षे केंद्राने मौल्यवान प्रजातींच्या संख्या वृद्धीसाठी मदत, संकल्पना आणि अभिनव उपक्रम राबवले आहेत. 

 तलाव, नद्यांमधील महाशीरची संख्या वाढणे गरजेचे!महाशीर हा मासा आता धोकादायक स्थितीतील प्रजातींच्या यादीमधून बाहेर आलेला असला तरी प्रजनन कार्यक्रम सुरूच राहील. कारण तलाव व नद्यांमधील त्याची संख्या वाढली पाहिजे. हा मासा जेव्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये स्वतःहून प्रजनन करू लागेल तेव्हा अशा उपक्रमांना यश येईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.

* १९७० साली झाली प्रकल्पाची सुरुवातधोका असलेल्या महाशीर माशाच्या संवर्धनासाठी १९७० साली प्रकल्पाची सुरुवात झाली. राज्यांच्या मत्स्य विभागांच्या मदतीने माशांना पुन्हा शुद्ध, स्वच्छ, प्रदूषित नसलेल्या पाण्यामध्ये सोडणे हे आव्हान आहे. लोणावळा येथील मत्स्योत्पादन केंद्रामध्ये एकावेळी ५ लाख महाशीर पिले निर्माण करण्याची क्षमता आहे. दरवर्षी जवळपास ४ ते ५ लाख महाशीर पिले उत्पादनाचे उद्दिष्ट असून महाशीर माशांच्या संख्येत हळूहळू वाढ हाेत आहे.