शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

'देशापुढील संकट अतिशय गंभीर, मत देताना योग्य विचार करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 22:25 IST

काँग्रेसचे पुनरुज्जीवन अशक्य असून गांधी, नेहरु, पटेल यांच्या विचारधारेपासून पक्ष कोसो दूर गेला आहे.

मुंबई : देशावरील सध्याचे संकट अधिक गंभीर होण्याची भीती आहे.  परिस्थिती सुधारण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी सारासार विचार करुन योग्यपणे मतदानाचा वापर करावा, असे आवाहन एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले. धारावी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार मनोज संसारे यांच्यासाठी 90 फूट रस्त्यावर आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

ओवेसी म्हणाले, माझ्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करणारी काँग्रेस नेते, हिंदू मुस्लिम असा भेदभाव करत आले आहेत. मुंबई दंगल प्रकरणी न्या. श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालात नाव असलेल्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. सरकारने जीएसटी, नोटबंदी करुन सर्वसामान्यांचे जीवन उध्वस्त करुन टाकले. धारावीतील उद्योजकांना सरकारच्या धोरणांचा मोठा फटका बसला. राहुल गांधी सत्तर वर्षात विकास न झाल्याची कबुली देतात. काँग्रेसने UAPA सारख्या अन्यायकारक कायद्याच्या सुधारणेला भाजपला पाठिंबा दिला. त्याचा फटका दलित,  वंचित, मुस्लिम, कामगार, आदिवासी वर्गाला बसत आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांविरोधात कारवाईचे अनिर्बंध अधिकार त्यामुळे सरकारला मिळाले आहेत. 

काँग्रेसचे पुनरुज्जीवन अशक्य असून गांधी, नेहरु, पटेल यांच्या विचारधारेपासून पक्ष कोसो दूर गेला आहे. भाजपच्या हिंदुत्वासमोर काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्वाचा मार्ग पत्करला, हा काँग्रेसचा दुटप्पीपणा आहे.  काँग्रेसचा मतदार भाजपकडे वळला आहे आणि काँग्रेस मात्र आमच्यावर टीका करत आहे, असेही औवेसी म्हणाले. दलित, वंचित, मुस्लिम, कामगार, आदिवासी या वर्गाने एकत्रीत येऊन जबाबदारीने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. कुणाच्या मेहेरबानीने नव्हे तर बाबासाहेबांच्या संविधानामुळे देशात मुस्लिम समाज आनंदात राहत असून शेवटपर्यंत राहील. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा कुणाच्या मर्जीची गरज नसल्याचे त्यांनी ठणकावले. उद्धव ठाकरेंना डोळे तपासण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. पाकिस्तान व इतर कोणत्याही मुस्लिम देशांसोबत आमचा संबंध नाही, आमचा संबंध भारत या आमच्या देशाशी असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील धर्मनिरपेक्षता संपुष्टात आली असून भाजपला रोखण्यात अपयश आल्याची जबाबदारी काँग्रेसची असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

दरम्यान, यावेळी, माजी नगरसेवक व पक्षाचे उमेदवार मनोज संसारे म्हणाले, पस्तीस वर्षांपासुन सत्ता उपभोगणाऱ्या गायकवाड घराण्याने धारावीचा विनाश केला. केंद्र व राज्यात सत्ता असताना धारावीला स्वर्ग बनवू शकत होते. स्वर्ग बनवण्याऐवजी त्यांनी धारावीला नरक बनवले. विकास करण्यात अपयशी ठरले. अपक्ष, नगरसेवक म्हणून जे काम मी वडाळा मध्ये करु शकलो ते देखील धारावीत होऊ शकले नाही. धारावी पुनर्विकास प्रकल्प 2004 मध्ये सुरू झाला. मात्र, 15 वर्षांच्या कालावधीत नागरिकांना केवळ मुर्ख बनवण्यात आले. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारप्रमाणे भाजप सरकारने फसवणूक केली. धारावीचा बीकेसी प्रमाणे विकास करु असे आश्वासन त्यांनी दिले. 

टॅग्स :Asadgad Fortअसदगड किल्लाcongressकाँग्रेसAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019ElectionनिवडणूकAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन