शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'देशापुढील संकट अतिशय गंभीर, मत देताना योग्य विचार करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 22:25 IST

काँग्रेसचे पुनरुज्जीवन अशक्य असून गांधी, नेहरु, पटेल यांच्या विचारधारेपासून पक्ष कोसो दूर गेला आहे.

मुंबई : देशावरील सध्याचे संकट अधिक गंभीर होण्याची भीती आहे.  परिस्थिती सुधारण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी सारासार विचार करुन योग्यपणे मतदानाचा वापर करावा, असे आवाहन एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले. धारावी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार मनोज संसारे यांच्यासाठी 90 फूट रस्त्यावर आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

ओवेसी म्हणाले, माझ्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करणारी काँग्रेस नेते, हिंदू मुस्लिम असा भेदभाव करत आले आहेत. मुंबई दंगल प्रकरणी न्या. श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालात नाव असलेल्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. सरकारने जीएसटी, नोटबंदी करुन सर्वसामान्यांचे जीवन उध्वस्त करुन टाकले. धारावीतील उद्योजकांना सरकारच्या धोरणांचा मोठा फटका बसला. राहुल गांधी सत्तर वर्षात विकास न झाल्याची कबुली देतात. काँग्रेसने UAPA सारख्या अन्यायकारक कायद्याच्या सुधारणेला भाजपला पाठिंबा दिला. त्याचा फटका दलित,  वंचित, मुस्लिम, कामगार, आदिवासी वर्गाला बसत आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांविरोधात कारवाईचे अनिर्बंध अधिकार त्यामुळे सरकारला मिळाले आहेत. 

काँग्रेसचे पुनरुज्जीवन अशक्य असून गांधी, नेहरु, पटेल यांच्या विचारधारेपासून पक्ष कोसो दूर गेला आहे. भाजपच्या हिंदुत्वासमोर काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्वाचा मार्ग पत्करला, हा काँग्रेसचा दुटप्पीपणा आहे.  काँग्रेसचा मतदार भाजपकडे वळला आहे आणि काँग्रेस मात्र आमच्यावर टीका करत आहे, असेही औवेसी म्हणाले. दलित, वंचित, मुस्लिम, कामगार, आदिवासी या वर्गाने एकत्रीत येऊन जबाबदारीने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. कुणाच्या मेहेरबानीने नव्हे तर बाबासाहेबांच्या संविधानामुळे देशात मुस्लिम समाज आनंदात राहत असून शेवटपर्यंत राहील. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा कुणाच्या मर्जीची गरज नसल्याचे त्यांनी ठणकावले. उद्धव ठाकरेंना डोळे तपासण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. पाकिस्तान व इतर कोणत्याही मुस्लिम देशांसोबत आमचा संबंध नाही, आमचा संबंध भारत या आमच्या देशाशी असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील धर्मनिरपेक्षता संपुष्टात आली असून भाजपला रोखण्यात अपयश आल्याची जबाबदारी काँग्रेसची असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

दरम्यान, यावेळी, माजी नगरसेवक व पक्षाचे उमेदवार मनोज संसारे म्हणाले, पस्तीस वर्षांपासुन सत्ता उपभोगणाऱ्या गायकवाड घराण्याने धारावीचा विनाश केला. केंद्र व राज्यात सत्ता असताना धारावीला स्वर्ग बनवू शकत होते. स्वर्ग बनवण्याऐवजी त्यांनी धारावीला नरक बनवले. विकास करण्यात अपयशी ठरले. अपक्ष, नगरसेवक म्हणून जे काम मी वडाळा मध्ये करु शकलो ते देखील धारावीत होऊ शकले नाही. धारावी पुनर्विकास प्रकल्प 2004 मध्ये सुरू झाला. मात्र, 15 वर्षांच्या कालावधीत नागरिकांना केवळ मुर्ख बनवण्यात आले. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारप्रमाणे भाजप सरकारने फसवणूक केली. धारावीचा बीकेसी प्रमाणे विकास करु असे आश्वासन त्यांनी दिले. 

टॅग्स :Asadgad Fortअसदगड किल्लाcongressकाँग्रेसAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019ElectionनिवडणूकAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन