शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गुन्हेगारीत वाढ- नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 16:47 IST

आपण पर्यटन जिल्ह्याकडे वाटचाल करीत असताना सिंधुदुर्गमध्ये घडणारे वाढते गुन्हे यामुळे येथील पर्यटन धोक्यात येत आहे. गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात तर गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.

सिंधुदुर्ग : आपण पर्यटन जिल्ह्याकडे वाटचाल करीत असताना सिंधुदुर्गमध्ये घडणारे वाढते गुन्हे यामुळे येथील पर्यटन धोक्यात येत आहे. गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात तर गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्राच्या क्राईम अहवालानुसार सिंधुदुर्गमध्ये २०१४च्या तुलनेत २०१७मध्ये साडेतीन टक्क्यांनी गुन्हेगारी वाढली आहे, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली. ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सावंतवाडी आयोजित माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या सुंदरवाडी महोत्सवाच्या तिस-या पर्वाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदीप कुडतरकर, तालुकाध्यक्ष संजू परब, सभापती रवींद्र मडगावकर, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, नगरसेवक राजू बेग, उदय नाईक, गुरू पेडणेकर, उपसभापती निकिता सावंत, महिला तालुकाध्यक्ष गीता परब, जिल्हा परिषद सदस्या शर्वाणी गावकर, पल्लवी राऊळ, उन्नती धुरी, नगरसेवक अ‍ॅड. परिमल नाईक, उदय नाईक, दीपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विरनोडकर, आनंद शिरवलकर, केतन आजगावकर, किरण सावंत, गुरू मठकर, दिलीप भालेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला.सावंतवाडीला एका सांस्कृतिक चळवळीचा वारसा आहे. हीच सांस्कृतिक चळवळ पुढे नेण्याचे काम माजी खासदार निलेश राणे, संजू परब व त्यांचे सहकारी करीत आहेत. एवढा मोठा महोत्सव सलग तीन वर्षे आयोजित करणे हे सोपे काम नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांची मेहनत निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. सावंतवाडीची प्रतिमाच या महोत्सवाच्या माध्यमातून उंचावण्याचे काम त्यांनी केले आहे, असे गौरवोद्गार आमदार नितेश राणे यांनी काढले. सावंतवाडीचा विकास झाला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. कणकवली येथे अद्ययावत चित्रपटगृह आहे. पण सावंतवाडीत नाही. येथील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. एखादी व्यक्ती जर चित्रपट पाहण्यासाठी गेला तर त्याला आपण सुरक्षित घरी जाऊ का याची चिंता वाटते.सावंतवाडीमध्ये पर्यटन वाढावे असे वाटत असेल, तर गुन्हेगारी थांबली पाहिजे आणि आम्हीही टीका विरोधक म्हणून करीत नाही, राज्याचा एक क्राईम अहवाल निघतो, त्यात सर्व साधारणपणे आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीत जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वीचे गुन्हे आणि आता वाढ झालेले गुन्हे यांचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांनी याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही यावेळी आमदार राणे यांनी दिला आहे. मी येत्या अधिवेशनात शांत बसणार नाही. सावंतवाडीत घडणारे सर्व प्रकार विधानसभेत मांडणार असून, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही करणार आहे. पर्यटन जिल्हा करीत असताना हे चालले ते योग्य नाही. गोवा पर्यटनावर चालतो, पण तेथे अशी गुन्हेगारी नाही याचाही विचार झाला पाहिजे, असेही आमदार राणे म्हणाले.

महोत्सवाच्या निमित्ताने डॉ. राजेश नवांगुळ, प्रदीप सावंत, स्नेहा टिळवे, उद्योजक राजन आंगणे, डॉ. विष्णू नाईक आदींचा सत्कार करण्यात आला. तर स्वाभिमानचे नेते संदीप कुडतरकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर सडकून टीका केली.तसेच कणकवली येथे नाट्यगृह होऊ शकते, मग सावंतवाडीमध्ये का होत नाही, असा सवाल उपस्थित केला. तर किरण सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा करण्यात नारायण राणे यांचा मोठा वाटा आहे. त्यानंतर अनेक तालुक्यात महोत्सव झाले, असे सांगितले.बाबा माका संकासूर बघूचो हा! संवादाला रसिकांची दादकलाकार सार्थक वाटवे यांचा आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सार्थक याने दोन विनोदही यावेळी रसिकांसमोर सादर केले. यात बाबा माका संकासूर बघूचो हा असे म्हणताच उपस्थितांनी त्याला चांगलीच दाद दिली. यावेळी भार्गवी चिरमुले, केतकी पालव, प्रांजल पालकर व संदीप गायकवाड, प्रसाद खांडेकर यांच्यासह लावणी सम्राज्ञी प्रियांका जाधव व निशा बारोत यांचा नृत्याविष्कार व कार्यक्रमांनी पहिल्या दिवसाचा कार्यक्रम यादगार ठरला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग