शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

फसवणाऱ्या बिल्डर्सवर गुन्हे नोंदवा, हायकोर्टाचे आदेश

By admin | Updated: October 15, 2015 03:06 IST

नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामे हटवण्याचे आदेश दिल्यानंतर उच्च न्यायालयाने आता आपला मोर्चा विकासकांकडे वळवला आहे

मुंबई : नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामे हटवण्याचे आदेश दिल्यानंतर उच्च न्यायालयाने आता आपला मोर्चा विकासकांकडे वळवला आहे. बेकायदेशीर बांधकामे करून सामान्यांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सना धारेवर धरून त्यांच्यावर फौजदारी कारवाईची गरज आहे, असे म्हणत आतापर्यंत त्यांच्यावर कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांनी काय पावले उचलली, अशी विचारणाही उच्च न्यायालायने बुधवारी केली.नवी मुंबईमधील दिघा येथील बेकायदेशीर बांधकामांसंदर्भात मयुरा मारू आणि राजीव मिश्रा यांनी केलेल्या जनहित याचिकेवर न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. या याचिकांवरील सुनावणीवेळी खंडपीठाने दिघा येथील ९६ बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचे आदेश दिले होते. या आदेशांवर अंमलबजावणी करण्याचे काम एमआयडीसीने हाती घेतले आहे. त्यामुळे खंडपीठाने आता मोर्चा बिल्डर्सकडे वळवला आहे.बेकायदेशीर बांधकाम करून लोकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सवर फौजदारी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यावरही भारतीय दंडसंहिता आणि एमआरटीपी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला पाहिजे, असेही खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)