शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

फसवणाऱ्या बिल्डर्सवर गुन्हे नोंदवा, हायकोर्टाचे आदेश

By admin | Updated: October 15, 2015 03:06 IST

नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामे हटवण्याचे आदेश दिल्यानंतर उच्च न्यायालयाने आता आपला मोर्चा विकासकांकडे वळवला आहे

मुंबई : नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामे हटवण्याचे आदेश दिल्यानंतर उच्च न्यायालयाने आता आपला मोर्चा विकासकांकडे वळवला आहे. बेकायदेशीर बांधकामे करून सामान्यांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सना धारेवर धरून त्यांच्यावर फौजदारी कारवाईची गरज आहे, असे म्हणत आतापर्यंत त्यांच्यावर कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांनी काय पावले उचलली, अशी विचारणाही उच्च न्यायालायने बुधवारी केली.नवी मुंबईमधील दिघा येथील बेकायदेशीर बांधकामांसंदर्भात मयुरा मारू आणि राजीव मिश्रा यांनी केलेल्या जनहित याचिकेवर न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. या याचिकांवरील सुनावणीवेळी खंडपीठाने दिघा येथील ९६ बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचे आदेश दिले होते. या आदेशांवर अंमलबजावणी करण्याचे काम एमआयडीसीने हाती घेतले आहे. त्यामुळे खंडपीठाने आता मोर्चा बिल्डर्सकडे वळवला आहे.बेकायदेशीर बांधकाम करून लोकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सवर फौजदारी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यावरही भारतीय दंडसंहिता आणि एमआरटीपी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला पाहिजे, असेही खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)