शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

कर्नल पुरोहितवरील गंभीर आरोपांत सकृद्दर्शनी तथ्य

By admin | Updated: April 26, 2017 02:07 IST

मालेगावमध्ये सन २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्पोटातील आरोपी लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित याच्यावर देशाची अखंडता व एकात्मता याविरुद्ध युद्ध

मुंबई : मालेगावमध्ये सन २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्पोटातील आरोपी लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित याच्यावर देशाची अखंडता व एकात्मता याविरुद्ध युद्ध छेडल्याचा व बॉम्बस्फोट करून लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा गंभीर आरोप आहे व सकृद्दर्शनी तरी या आरोपांमध्ये तथ्य असावे असे दिसते, असे निरीक्षण उच्च न्यायालयान मंगळवारी पुरोहितला जामीन नाकारताना नोंदवले.एनआयएने दाखल केलेल्या दोषारोपपत्राचा आधार घेत खंडपीठाने म्हटले की, ‘हिंदू राष्ट्र’ निर्माण करण्यासाठी स्वतंत्र राज्यघटना व स्वतंत्र भगवा झेंडा पुरोहितने तयार केला. तसेच मुस्लीम समाजाने हिंदू समाजावर केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्याबाबत त्याने बैठकीत चर्चाही केली,’ असे म्हणत खंडपीठाने पुरोहितने संरक्षण दलाच्या आॅपरेशनचा एक भाग म्हणून जहालवादी हिंदूंच्या बैठकीत भाग घेतल्याचा युक्तिवाद फेटाळला. तसेच या प्रकरणातील एका साक्षीदाराच्या साक्षीचा आधार घेत खंडपीठाने म्हटले की, हिंदू जहालवादी संस्था ‘अभिनव भारत’ने केवळ राजकीय पक्ष म्हणून कामकाज न पाहता उजव्यांची एक संस्था म्हणून काम करायला हवे. या संस्थेला विरोध करणाऱ्यांना बाजूला सारण्याची (हत्या करण्याची) क्षमता या संस्थेत असली पाहिजे. ‘जर एक कर्तव्य म्हणून पुरोहित त्या बैठकींना हजर राहत होता तर अशा प्रकारची मते व्यक्त करण्याची काहीही आवश्यकता नव्हती, हे पुरोहितने मान्य करावे,’ असे खंडपीठाने ११८ पानी निकालात म्हटले आहे.ज्या लोकांनी साध्वीने भोपाळमधील बैठकीला उपस्थित राहून पुरोहितबरोबर बॉम्बस्फोटाचा कट रचला, असा जबाब एटीएसकडे दिला, त्याच साक्षीदारांनी साध्वीविरुद्ध दिलेला जबाब मागे घेतला. उलट त्यांनी एटीएसने खोटी साक्ष देण्यासाठी छळ केल्याचे एनआयएला सांगितले. ज्या दोन साक्षीदारांनी त्यांचा जबाब मागे घेतला नाही, त्यांनी अर्जदाराविरुद्ध काहीही आक्षेपार्ह माहिती दिलेली नाही. साध्वीची मोटारसायकल जरी बॉम्बस्फोटात वापरण्यात आली असली तरी या बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी रामजी उर्फ रामजी कलासंग्रा याच्याकडे स्फोटाच्या दोन वर्षांपूर्वीपासून ती ताब्यात होती,’ असे खंडपीठाने निकालात म्हटले आहे. ‘एनआयए’च्या भूमिकेवर संशयमालेगाव २००८ बॉम्बस्फोटात एनआयएची बाजू मांडणाऱ्या विशेष सरकारी वकील रोहिणी सॅलियन यांनी, एनआयए या केसला झुकते माप देत असल्याचा आरोप करून, एनआयच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर, १२ जून २०१५ रोजी एनएआयच्या एका अधिकाऱ्यााचा आपल्याला फोन आला आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्या भेटीत त्याने ही केस हळुवारपणे हाताळण्याचे ‘वरून’ आदेश असल्याचे सांगितले, असे सॅलियने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. त्यांच्या या मुलाखतीवरून एनआयए व भाजपाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला. सॅलियन यांनी एनआयएला यामध्ये आरोपींची सुटका हवी असावी, असा संशय व्यक्त केला. त्यांच्या या आरोपांमुळे एनआयएला स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यानंतर, एनआयएने सॅलियन यांना त्यांच्या वकिलांच्या पॅनेलवरून हटवले. (प्रतिनिधी)