शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

कर्नल पुरोहितवरील गंभीर आरोपांत सकृद्दर्शनी तथ्य

By admin | Updated: April 26, 2017 02:07 IST

मालेगावमध्ये सन २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्पोटातील आरोपी लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित याच्यावर देशाची अखंडता व एकात्मता याविरुद्ध युद्ध

मुंबई : मालेगावमध्ये सन २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्पोटातील आरोपी लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित याच्यावर देशाची अखंडता व एकात्मता याविरुद्ध युद्ध छेडल्याचा व बॉम्बस्फोट करून लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा गंभीर आरोप आहे व सकृद्दर्शनी तरी या आरोपांमध्ये तथ्य असावे असे दिसते, असे निरीक्षण उच्च न्यायालयान मंगळवारी पुरोहितला जामीन नाकारताना नोंदवले.एनआयएने दाखल केलेल्या दोषारोपपत्राचा आधार घेत खंडपीठाने म्हटले की, ‘हिंदू राष्ट्र’ निर्माण करण्यासाठी स्वतंत्र राज्यघटना व स्वतंत्र भगवा झेंडा पुरोहितने तयार केला. तसेच मुस्लीम समाजाने हिंदू समाजावर केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्याबाबत त्याने बैठकीत चर्चाही केली,’ असे म्हणत खंडपीठाने पुरोहितने संरक्षण दलाच्या आॅपरेशनचा एक भाग म्हणून जहालवादी हिंदूंच्या बैठकीत भाग घेतल्याचा युक्तिवाद फेटाळला. तसेच या प्रकरणातील एका साक्षीदाराच्या साक्षीचा आधार घेत खंडपीठाने म्हटले की, हिंदू जहालवादी संस्था ‘अभिनव भारत’ने केवळ राजकीय पक्ष म्हणून कामकाज न पाहता उजव्यांची एक संस्था म्हणून काम करायला हवे. या संस्थेला विरोध करणाऱ्यांना बाजूला सारण्याची (हत्या करण्याची) क्षमता या संस्थेत असली पाहिजे. ‘जर एक कर्तव्य म्हणून पुरोहित त्या बैठकींना हजर राहत होता तर अशा प्रकारची मते व्यक्त करण्याची काहीही आवश्यकता नव्हती, हे पुरोहितने मान्य करावे,’ असे खंडपीठाने ११८ पानी निकालात म्हटले आहे.ज्या लोकांनी साध्वीने भोपाळमधील बैठकीला उपस्थित राहून पुरोहितबरोबर बॉम्बस्फोटाचा कट रचला, असा जबाब एटीएसकडे दिला, त्याच साक्षीदारांनी साध्वीविरुद्ध दिलेला जबाब मागे घेतला. उलट त्यांनी एटीएसने खोटी साक्ष देण्यासाठी छळ केल्याचे एनआयएला सांगितले. ज्या दोन साक्षीदारांनी त्यांचा जबाब मागे घेतला नाही, त्यांनी अर्जदाराविरुद्ध काहीही आक्षेपार्ह माहिती दिलेली नाही. साध्वीची मोटारसायकल जरी बॉम्बस्फोटात वापरण्यात आली असली तरी या बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी रामजी उर्फ रामजी कलासंग्रा याच्याकडे स्फोटाच्या दोन वर्षांपूर्वीपासून ती ताब्यात होती,’ असे खंडपीठाने निकालात म्हटले आहे. ‘एनआयए’च्या भूमिकेवर संशयमालेगाव २००८ बॉम्बस्फोटात एनआयएची बाजू मांडणाऱ्या विशेष सरकारी वकील रोहिणी सॅलियन यांनी, एनआयए या केसला झुकते माप देत असल्याचा आरोप करून, एनआयच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर, १२ जून २०१५ रोजी एनएआयच्या एका अधिकाऱ्यााचा आपल्याला फोन आला आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्या भेटीत त्याने ही केस हळुवारपणे हाताळण्याचे ‘वरून’ आदेश असल्याचे सांगितले, असे सॅलियने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. त्यांच्या या मुलाखतीवरून एनआयए व भाजपाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला. सॅलियन यांनी एनआयएला यामध्ये आरोपींची सुटका हवी असावी, असा संशय व्यक्त केला. त्यांच्या या आरोपांमुळे एनआयएला स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यानंतर, एनआयएने सॅलियन यांना त्यांच्या वकिलांच्या पॅनेलवरून हटवले. (प्रतिनिधी)