शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आता वीज चोरांवर दाखल होणार गुन्हा; राज्यभरात रोहित्रांची तपासणी मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 14:02 IST

वाढत्या उन्हाची तीव्रता व कोरोना काळानंतर उद्योगांकडून वाढलेल्या वीज मागणीला पुरवठा करताना पुरेसा कोळसा उपलब्ध होत नाही. त्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी भारनियमन केले जात आहे.

मुंबई : राज्यात विजेच्या मागणीत वाढ नोंदविण्यात येत असून, सध्याची उच्चतम मागणी आहे. त्यानुसार विजेचा पुरवठा करताना दमछाक होत  असतानाच वीज चोरांविरोधात धडक मोहीम राबविण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यानुसार, अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्रांकडे लक्ष देऊन त्या रोहित्राची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासणी केली जाणार आहे. वीजचोरी आढळ्यास वीजचोरांवर अदखलपात्र व अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात येणार आहे.

वाढत्या उन्हाची तीव्रता व कोरोना काळानंतर उद्योगांकडून वाढलेल्या वीज मागणीला पुरवठा करताना पुरेसा कोळसा उपलब्ध होत नाही. त्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी भारनियमन केले जात आहे. अशात विजेची चोरी होऊ नये म्हणून महावितरण सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्रांकडे विशेष लक्ष देऊन त्या रोहित्राची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहीम राज्यभर राबविण्यात येणार आहे. या रोहित्रांवर वीजचोरी आढळल्यास संबंधित ग्राहकांविरुध्द कडक कारवाई केली जाणार आहे. महावितरणच्या संचालक विभागाचे संचालक संजय ताकसांडे यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत विजेची चोरी किंवा अनधिकृतपणे विजेचा वापर करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले.

- प्रत्येक जिल्ह्यातील रोहित्रांवर मंजूर भारापेक्षा जास्त भार असल्यास अशा सर्व रोहित्रांची तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.- ग्राहकांनी वीजचोरी केली असल्यास वा वीज यंत्रणेवर आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्याविरुध्द कारवाई करून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा. - वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर अदखलपात्र व अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज