शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

जातपंचायतीच्या २० खंडणीखोरांवर गुन्हा

By admin | Updated: November 21, 2014 02:00 IST

न्यायालयात निर्दोष सुटका होवूनही परंपरागत निवाड्याच्या नावाखाली एका विधवा महिलेकडून १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या ‘जात पंचायत’च्या मुख्य पंचासह २० जणांविरूध्द पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर (अहमदनगर) : न्यायालयात निर्दोष सुटका होवूनही परंपरागत निवाड्याच्या नावाखाली एका विधवा महिलेकडून १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या ‘जात पंचायत’च्या मुख्य पंचासह २० जणांविरूध्द पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. २२ डिसेंबर २००६ रोजी अहमदनगर येथील वैदू समाजाच्या शांताबाई शिंदे यांचे पती मारूती शिंदे यांचा खून झाला. शांताबार्इंना आपल्या पतीच्या खुनाचा संशय ज्यांच्यावर होता, त्यांनीच शांताबाईसह इतर दोघांविरूध्द फिर्याद दिली. न्यायालयाने खुनाच्या आरोपातून शांताबाईसह दोघांची निर्दोष सुटका केली. मात्र जात पंचायतीने परंपरागत न्याय-निवाडा करण्यासाठी आधी तिघांकडून प्रत्येकी ३० हजार घेतले. पुन्हा काही दिवसांनी प्रत्येकी २ लाख ३० हजार रूपयांचा दंड वसूल केला. इतकेच नव्हे तर त्यांना जातीतून बहिष्कृत करण्यात आले. शांताबार्इंना पुन्हा जातीत घेण्यासाठी चक्क १५ लाखांची मागणी पंचांनी केली होती. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षा अ‍ॅड. रंजना गवांदे, जात पंचायत मूठमाती अभियानाचे संयोजक कृष्णा चांदगुडे व विलास कांगुणे यांच्या मदतीने शांताबार्इंनी जात पंचायतीचे मुख्य पंच चंदर बापू दासरजोगी व इतर २० पंचांच्या विरोधात लोणी पोलिसांत तक्रार दिली. तीन दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी मुख्य पंच चंदर बापू दासरजोगी, राजा शिंदे, मारूती शिंदे, अंबू शिंदे, बाबू धनगर, मारूती शिंदे, बापू शिंदे, साहेबराव शिंदे, शामराव शिंदे, बापू लोखंडे, हुसेन शिंदे, मल्लू शिंदे, शामलींग शिंदे, नागेश शिंदे, तायगा शिंदे, राजू , अमृत अण्णा पवार, दशरथ शिंदे व खरग्या उर्फ ढवळ्या शंकर शिंदे अशा एकूण २० जणांविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)