शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

मंत्र्यांनाच समुपदेशनाची गरज

By admin | Updated: May 15, 2015 02:20 IST

प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपा-शिवसेनेला सत्ता मिळाल्याने सरकारमधील मंत्री आणि नेते मानसिक संतुलन ढासळल्यासारखे वागत

मुंबई : प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपा-शिवसेनेला सत्ता मिळाल्याने सरकारमधील मंत्री आणि नेते मानसिक संतुलन ढासळल्यासारखे वागत आहेत. म्हणूनच सत्ताधाऱ्यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशनाची गरज असल्याचे सांगत आहेत. शेतकऱ्यांपेक्षा, वादग्रस्त विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या मंत्र्यांनाच समुपदेशनाची जास्त गरज असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे एकीकडे म्हणतात की, शेतकऱ्यांकडे मोबाइलचे बिल भरण्यासाठी पैसे असतात मग ते विजेचे बिज का भरू शकत नाहीत? दुसरीकडे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी शेतकऱ्यांनी आता सरकारकडून मदतीची अपेक्षा ठेवू नये असे सांगतात. हेच नितीन गडकरी शेतकऱ्यांना शेतीसाठी मानवी मूत्राचा वापर करा, त्यामुळे शेतीतून भरघोस उत्पादन मिळते असा सल्ला देतात; आणि त्यांचीच री ओढत कृषिमंत्री एकनाथ खडसे मल्टिप्लेक्समधील मलमूत्राचे संकलन करून शेतीसाठी कसे वापरता येईल यासंदर्भात सरकार प्रयत्न करणार असल्याचा मानस व्यक्त करतात. अशा प्रकारे भाजपा सरकारमधील नेतेमंडळी नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे.