शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

राज्यात कापसाचा बाजार यंदा तेजीत राहणार; ‘सीसीआय’चा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 06:52 IST

शासकीय खरेदी केंद्रांची गरज पडणार नाही

- राजेश निस्ताने नांदेड : आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेली मागणी, मोठ्या प्रमाणात निर्यातीची चिन्हे, अन्य देशांच्या तुलनेत रुई-गाठींचे भारतात कमी असलेले दर लक्षात घेता, या वर्षी कापसाचा बाजार कमालीचा तेजीत राहील. त्यामुळे शासकीय कापूस खरेदी केंद्राची गरज भासणार नाही, असा अंदाज कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (सीसीआय) वर्तविला आहे. सीसीआयचे मुख्य महाव्यवस्थापक एस. के. पाणिग्रही (मुंबई) यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ३० मि.मी. लांबीच्या कापसाला शासनाचा ६,०२५ रुपये तर २८ मि.मी. कापसाला ५,७२५ रुपये एवढा हमीभाव आहे. परंतु प्रत्यक्षात सध्या बाजारात कापसाला साडेसात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळतो आहे. अखेरपर्यंत हा दर शासनाच्या हमीभावापेक्षा कमी येणार नाही, अशी एकूण चिन्हे आहेत.४० लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी  राज्यात यंदाच्या खरीप हंगामात ४० लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र ५ लाख हेक्टरने घटले आहे. पावसामुळे कपाशीच्या गुणवत्तेला काहीसा फटका बसला असला तरी, सरासरी उत्पन्नात मात्र घट होणार नाही, अशी शक्यता पाणिग्रही यांनी वर्तविली.सीसीआयही कापूस खरेदीसाठी सज्जपाणिग्रही म्हणाले, यंदा शेतकऱ्यांना शासकीय खरेदी केंद्रांकडे यावे लागणार नाही, असे बाजारातील स्थितीवरून दिसते. तरीही सीसीआयने राज्यात ८० खरेदी केंद्रे सज्ज ठेवली आहेत. हमीभावापेक्षा कमी दर जाताच सीसीआय कापूस खरेदीसाठी एन्ट्री करेल. त्यासाठीची आवश्यक जिनिंग-प्रेसिंगसोबत करार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. गरज भासल्यास महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाची सब-एजंट म्हणून मदत घेतली जाणार आहे.    एकाच वेळी कापूस विकू नयेबाजारात कापसाला सध्या चांगले दर आहेत. ते पुढेही कायम राहावे असे वाटत असेल तर शेतकऱ्यांनी एकाच वेळी कापूस बाजारात विक्रीला आणू नये. त्यामुळे खरेदीदारावर दबाव निर्माण होऊन भाव पडण्याची भीती सीसीआयने व्यक्त केली.