शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या गोंधळामागे महाविद्यालयांचा खोडसाळपणा

By admin | Updated: July 25, 2016 22:32 IST

अकरावी आॅनलाईन प्रवेशामुळे गेल्या आठवडाभरापासून मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात पालक व विद्यार्थ्यांची धूमश्चक्री सुरू आहे.

चेतन ननावरे/मुंबई : अकरावी आॅनलाईन प्रवेशामुळे गेल्या आठवडाभरापासून मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात पालक व विद्यार्थ्यांची धूमश्चक्री सुरू आहे. यंत्रणेतील दोष गर्दीचे कारण नसून महाविद्यालयांनी केलेल्या खोडसाळपणाचा हा परिणाम असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे उपसंचालक कार्यालयाकडून याप्रकरणी महाविद्यालयांना तंबी देणार असल्याचेउपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी लोकमतला सांगितले.चव्हाण म्हणाले की, उपसंचालक कार्यालयात एकाच प्रकारच्या समस्या घेऊन पालक आणि विद्यार्थी येत आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा १०० टक्के प्रवेश हे आॅनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. याची पूरेपूर कल्पना मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि रायगडमधील महाविद्यालयांना आहे. मात्र तरीही आॅफलाईन प्रवेश हवा असेल, तर विद्यार्थ्यांनी उपसंचालक कार्यालयातून पत्र घेऊन यावे, असे दिशाभूल करणारे वक्तव्य महाविद्यालयांमधून केले जात आहे. परिणामी आॅफलाईन प्रवेशाच्या शोधात एक पत्र मिळेल, या अपेक्षेने पालक आणि विद्यार्थी उपसंचालक कार्यालयात गर्दी करत आहेत.केवळ महाविद्यालयातील गर्दी टाळण्यासाठी काही महाविद्यालये अशा प्रकारचा खोडसाळपणा करत असल्याचा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तर काही महाविद्यालयांमधील दलालांचा आॅफलाईन प्रवेशाचा धंदा बंद झाल्याने संबंधित दलाल विद्यार्थी व पालकांमध्ये रोष निर्माण करण्यासाठी अशाप्रकारचा हातखंडा वापरत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे सर्वच महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची दिशाभूल करणारे वक्तव्य करू नये किंवा सल्ला देऊ नये, असे पत्र पाठवणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.पुन्हा गोंधळ, पुन्हा ठिय्यागुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला नव्हता, त्यांना सोमवारी आणि मंगळवारी मोबाईलवर मेसेज येणार होते. मात्र सोमवारी सकाळी मेसेज न आल्याने शेकडो विद्यार्थ्यांनी पालकांसह उपसंचालक कार्यालयात धाव घेतली. यावेळी पोलिसांच्या मदतीने कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी पालकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्यालयाचा दरवाजाच बंद केला. उपसंचालकांची भेट होत नसल्याने शेकडो पालकांनी विद्यार्थ्यांसह कार्यालयाबाहेरच ठिय्या केला. त्यानंतर उपसंचालक बी.बी.चव्हाण यांनी कार्यालयाबाहेर येऊन पालकांनामार्गदर्शन करत शांत केले. मात्र तोपर्यंत उपसंचालक कार्यालयाला युद्धभूमीचे रूप आले होते.प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी हे वाचाच...२५ आणि २६ जुलैला केवळ नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांना मेसेज येतील. मेसेज आलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना मेसेज आलेला नाही, त्यांनी ९ आॅगस्ट रोजी नव्याने अर्ज करायचा आहे.ज्या विद्यार्थ्यांनी याआधी अर्ज भरलेला नाही, किंवा अर्धवट अर्ज भरलेला आहे, त्यांनी ३० जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान अर्ज पूर्ण भरायचा आहे. त्यांच्यासाठी ४ आॅगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यादीमधीलमहाविद्यालयात ५ व ६ आॅगस्ट रोजी जाऊन संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशनिश्चित करावा लागेल.ज्या विद्यार्थ्यांना दूरचे महाविद्यालय मिळालेले आहे, किंवा विषय चुकीचानिवडलेला आहे, किंवा शाखा बदल करायचा आहे, किंवा प्राधान्यक्रम चुकलाआहे, त्यांनी ९ आॅगस्टला नव्याने अर्ज भरायचा आहे. या विद्यार्थ्यांसाठी९ ते १३ आॅगस्टदरम्यान पहिली, १८ ते २३ आॅगस्ट दरम्यान दुसरी आणि २५ ते३० आॅगस्ट दरम्यान तिसरी विशेष फेरी घेतली जाईल. प्रवेश फेरीतमहाविद्यालय मिळाल्यानंतरच विद्यार्थ्यांना आधीच्या महाविद्यालयातीलप्रवेश रद्द करता येईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी आधीच्यामहाविद्यालयातील प्रवेश रद्द करू नये.