शहरं
Join us  
Trending Stories
1
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
2
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
3
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
4
नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता... 
5
Video - घरातून बाहेर पडला अन् चालतानाच खाली कोसळला; २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
6
Video : घरात लाईट नाही म्हणून एटीएममध्येच थाटला संसार; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
7
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
8
Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
9
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
10
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
11
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
12
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
13
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
14
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
15
"नणंद आणि दिराने चारित्र्यावर संशय घेतला, तर सासऱ्यांनी…’’ हगवणे यांच्या थोरल्या सुनेने केले गंभीर आरोप 
16
बचपन का प्यार! बायको-पोरांना सोडून बालपणीच्या मैत्रिणीसोबत फुर्र झाला ६० वर्षांचा वकील; पण २४ तासांतच..
17
बापरे! 'या' लोकांसाठी पाणी ठरतंय विष; जास्त पिणं ठरू शकतं जीवघेणं
18
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
19
पावसाळ्यात फिरायला जायचंय? बजेटची चिंता सोडा! 'ट्रॅव्हल लोन'ची ही प्रक्रिया फक्त माहिती हवी
20
वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे इंग्लंडला जाणार! विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर BCCIची मोठी घोषणा

अकरावीच्या गोंधळामागे महाविद्यालयांचा खोडसाळपणा

By admin | Updated: July 25, 2016 22:32 IST

अकरावी आॅनलाईन प्रवेशामुळे गेल्या आठवडाभरापासून मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात पालक व विद्यार्थ्यांची धूमश्चक्री सुरू आहे.

चेतन ननावरे/मुंबई : अकरावी आॅनलाईन प्रवेशामुळे गेल्या आठवडाभरापासून मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात पालक व विद्यार्थ्यांची धूमश्चक्री सुरू आहे. यंत्रणेतील दोष गर्दीचे कारण नसून महाविद्यालयांनी केलेल्या खोडसाळपणाचा हा परिणाम असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे उपसंचालक कार्यालयाकडून याप्रकरणी महाविद्यालयांना तंबी देणार असल्याचेउपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी लोकमतला सांगितले.चव्हाण म्हणाले की, उपसंचालक कार्यालयात एकाच प्रकारच्या समस्या घेऊन पालक आणि विद्यार्थी येत आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा १०० टक्के प्रवेश हे आॅनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. याची पूरेपूर कल्पना मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि रायगडमधील महाविद्यालयांना आहे. मात्र तरीही आॅफलाईन प्रवेश हवा असेल, तर विद्यार्थ्यांनी उपसंचालक कार्यालयातून पत्र घेऊन यावे, असे दिशाभूल करणारे वक्तव्य महाविद्यालयांमधून केले जात आहे. परिणामी आॅफलाईन प्रवेशाच्या शोधात एक पत्र मिळेल, या अपेक्षेने पालक आणि विद्यार्थी उपसंचालक कार्यालयात गर्दी करत आहेत.केवळ महाविद्यालयातील गर्दी टाळण्यासाठी काही महाविद्यालये अशा प्रकारचा खोडसाळपणा करत असल्याचा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तर काही महाविद्यालयांमधील दलालांचा आॅफलाईन प्रवेशाचा धंदा बंद झाल्याने संबंधित दलाल विद्यार्थी व पालकांमध्ये रोष निर्माण करण्यासाठी अशाप्रकारचा हातखंडा वापरत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे सर्वच महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची दिशाभूल करणारे वक्तव्य करू नये किंवा सल्ला देऊ नये, असे पत्र पाठवणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.पुन्हा गोंधळ, पुन्हा ठिय्यागुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला नव्हता, त्यांना सोमवारी आणि मंगळवारी मोबाईलवर मेसेज येणार होते. मात्र सोमवारी सकाळी मेसेज न आल्याने शेकडो विद्यार्थ्यांनी पालकांसह उपसंचालक कार्यालयात धाव घेतली. यावेळी पोलिसांच्या मदतीने कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी पालकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्यालयाचा दरवाजाच बंद केला. उपसंचालकांची भेट होत नसल्याने शेकडो पालकांनी विद्यार्थ्यांसह कार्यालयाबाहेरच ठिय्या केला. त्यानंतर उपसंचालक बी.बी.चव्हाण यांनी कार्यालयाबाहेर येऊन पालकांनामार्गदर्शन करत शांत केले. मात्र तोपर्यंत उपसंचालक कार्यालयाला युद्धभूमीचे रूप आले होते.प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी हे वाचाच...२५ आणि २६ जुलैला केवळ नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांना मेसेज येतील. मेसेज आलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना मेसेज आलेला नाही, त्यांनी ९ आॅगस्ट रोजी नव्याने अर्ज करायचा आहे.ज्या विद्यार्थ्यांनी याआधी अर्ज भरलेला नाही, किंवा अर्धवट अर्ज भरलेला आहे, त्यांनी ३० जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान अर्ज पूर्ण भरायचा आहे. त्यांच्यासाठी ४ आॅगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यादीमधीलमहाविद्यालयात ५ व ६ आॅगस्ट रोजी जाऊन संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशनिश्चित करावा लागेल.ज्या विद्यार्थ्यांना दूरचे महाविद्यालय मिळालेले आहे, किंवा विषय चुकीचानिवडलेला आहे, किंवा शाखा बदल करायचा आहे, किंवा प्राधान्यक्रम चुकलाआहे, त्यांनी ९ आॅगस्टला नव्याने अर्ज भरायचा आहे. या विद्यार्थ्यांसाठी९ ते १३ आॅगस्टदरम्यान पहिली, १८ ते २३ आॅगस्ट दरम्यान दुसरी आणि २५ ते३० आॅगस्ट दरम्यान तिसरी विशेष फेरी घेतली जाईल. प्रवेश फेरीतमहाविद्यालय मिळाल्यानंतरच विद्यार्थ्यांना आधीच्या महाविद्यालयातीलप्रवेश रद्द करता येईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी आधीच्यामहाविद्यालयातील प्रवेश रद्द करू नये.