शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्ट वाहकांवर होणार फौजदारी कारवाई !

By admin | Updated: May 20, 2015 01:22 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या तोट्यास वाहकच जबाबदार असल्याचा निष्कर्ष महामंडळाने काढला आहे.

विलास गावंडे ल्ल यवतमाळराज्य परिवहन महामंडळाच्या तोट्यास वाहकच जबाबदार असल्याचा निष्कर्ष महामंडळाने काढला आहे. बडतर्फी, वेतनवाढ रोखणे-कपात करणे या उपाययोजनांनंतरही परिणाम होत नसल्याने आता अपहार करणाऱ्या वाहकांवर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक वाहकाला या निर्णयाची प्रत पाठविली आहे. बुधवारपासून याची अंमलबजावणी होणार आहे.महामंडळाला २०१४-१५ या आर्थिक वर्षात ६४५ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मागील काही वर्षांचा संचित तोटा १ हजार ८३९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वाहकांनी केलेला अपहार हे यामागील प्रमुख कारण असल्याच्या निष्कर्षाप्रत महामंडळ पोहोचले आहे. एखाद्या वाहकाने केलेल्या अपहाराची रक्कम कमी असली तरी वाहकांची एकूण संख्या लक्षात घेता आणि होणारा अपहार पाहता तोट्यात मोठी भर पडली आहे. महामंडळांतर्गत होणारी कारवाई क्षुल्लक वाटत असल्याने या कारवाईला वाहक जुमानत नाहीत. म्हणूनच आता अपहार करणाऱ्या वाहकांविरुद्ध थेट पोलिसांत तक्रार केली जाणार आहे. मार्ग तपासणी पथकाला ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. यासाठी सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांना उद्दिष्ट दिले जाणार आहे. प्रत्येक मार्ग तपासणी पथकाने बस व मार्ग तपासणी करताना वाहकाला त्याची बाजू मांडण्याची संधी द्यावी, असे निर्देश आहेत. असे आहेत अपहाराचे मार्ग...प्रवाशांकडून भाडे वसूल केले, मात्र तिकीट दिले नाही, तिकिटांची पुनर्विक्री, कमी दराचे तिकीट देणे, अनियमित तिकीट देणे, लगेजमधील अनियमितता आदी मार्गांनी एसटी वाहकांकडृून गैरव्यवहार केला जातो. एकापेक्षा अधिकवेळा अपहार करताना आढळलेल्या वाहकांवर पोलीस कारवाई केली जाणार आहे.एप्रिल २०११ ते मार्च २०१५या चार आर्थिक वर्षांत अपहाराची54,311 प्रकरणे उघडकीस आली असून, ती निकालीही काढण्यात आली.प्रकरणांमध्ये काही वाहकांची वेतनवाढ रोखली तर काहींचे वेतन कमी केले.