शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

कोरडवाहू शेतीचे आरोग्य सुधारणार!

By admin | Updated: January 22, 2017 03:04 IST

संशोधन, तंत्रज्ञानाच्या शिफारशीची अंमलबजावणी आवश्यक ; राष्ट्रीय कोरडवाहू कार्यशाळेचा समारोप.

अकोला, दि. २१- भरघोस उत्पादनासाठी मातीचे आरोग्य सुदृढ असणे गरजेचे आहे. मातीचे आरोग्य सुधारणे व कमी पाण्यात अधिक उत्पादन येण्यासाठीच्या संशोधनावर सक्षमतेने भर दिला असून, एकात्मिक शेती पद्धती व शिफारशी केलेल्या तंत्रज्ञान, संशोधनाची प्रत्यक्ष शेतावर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन शनिवारी (आयसीएआर)भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहायक महासंचालक डॉ. एस. भास्कर, दिल्ली यांनी केले.अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसेच हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत १७ राज्यातील १४0 कृषी शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला. २१ जानेवारीला कार्यशाळेचा समारोप झाला. या कार्यक्रमाला डॉ.एस.भास्कर, हैदराबाद येथील डॉ.के.पी.आर. विठ्ठल, डॉ.सुब्बाराव, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. व्ही. एम. मायंदे, आंध्रप्रदेश, प्रकल्प समन्वयक डॉ. रवींद्र चारी, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ तथा कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एम.बी. नागदेवे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.भास्कर यांनी मातीच्या सुधारणेसह एकात्मिक शेती पद्धतीवर अधिक लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले. शेतकर्‍यांनी कुक्कुट, शेळीपालन, दुग्ध व्यवसायाची शेतीला जोड द्यावी लागणार आहे. पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापनही काटेकोर करावे लागणार असून, पाणी अडवून जिरवणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.डॉ. नागदेवे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून राबविण्यात योणार्‍या विविध कामांची माहिती दिली. विदर्भातील कोरडवाहू क्षेत्र आणि पावसाचे कमी झालेले दिवस बघता, शेतकर्‍यांनी पाण्याचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. पाच दिवस कोरडवाहू शेती आरोग्य सुधारणा कार्यक्रमावर अधिक भर देण्याचे ठरविण्यात आले. कोरडवाहू शेतीला कसे शाश्‍वत करता येईल, कमी पाण्यात, खर्चात भरघोस पीक कसे घेता येईल,आदी विषयांवर कोरडवाहू या विषयाच्या कृषी शास्त्रज्ञांनी सूक्ष्म मंथन केले. भारतातील ४५ टक्के शेती कोरडवाहू असून, ५0 टक्के लोकसंख्या ही कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहे. कोरडवाहू शेतीसमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना सामोरे जात उत्पन्न कसे वाढविता येईल, यासाठी शास्त्रज्ञांद्वारे निर्मित तंत्रज्ञान कोरडवाहू शेती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विस्तार कार्यावर अधिक भर देताना त्यासाठीचे अनेक विषय शास्त्रज्ञांनी हाताळले. अनेक शिफारशी तयार करण्यात आल्या. समारोपाला कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.