शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

coronavirus: महाराष्ट्रातील कोरोनाबळींची संख्या ५० हजारांपार, राज्यात अद्याप ५३ हजार अॅक्टिव्ह रुग्ण

By बाळकृष्ण परब | Updated: January 9, 2021 22:12 IST

coronavirus News : राज्यातील कोरोनाच्या फैलावाचा आकडा आता बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. मात्र असे असले तरी अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही.

ठळक मुद्देगेल्या २४ तासांत राज्यात सापडले कोरोनाचे ३ हजार ५८१ नवे रुग्ण राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही १९ लाख ६५ हजार ५५६ वर पोहोचली आहे. तर याच काळात ५७ जणांचा मृत्यू दिवसभरात राज्यात २ हजार ४०१ जणांनी कोरोनावर मात केली

मुंबई - राज्यातील कोरोनाच्या फैलावाचा आकडा आता बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. मात्र असे असले तरी अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. दरम्यान, गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनामुळे ५७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या ५० हजारांच्या पुढे गेली आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ५० हजार २७ जणांचा मृत्यू झाला आहे.राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ३ हजार ५८१ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही १९ लाख ६५ हजार ५५६ वर पोहोचली आहे. तर याच काळात ५७ जणांचा मृत्यू झाला. या दिवसभरात राज्यात २ हजार ४०१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात कोरोनाचे ५२ हजार ९६० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशामध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून, कोरोनाचे रुग्ण आणि एकूण कोरोना बळींमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे गेल्या एक दोन महिन्यांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असून, कोरोनाची साथ नियंत्रणात आल्याचे संकेत मिळत आहे.दरम्यान, देशभरात कोरोनाविरोधातील लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुमारे आठ लाख आरोग्य सेवकांना पहिल्या टप्प्यामध्ये कोरोनाविरोधातील लस दिली जाईल. तीन महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईHealthआरोग्य