शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: बिकट परिस्थितीवर जिद्दीने मात; पाय नसतानाही कोरोनाशी लढणारा रिक्षावाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 13:37 IST

लॉकडाऊन शिथिल झाल्यावर रिक्षाचालवून केला कुटुंबाचा उदरनिर्वाह

नारायण बडगुजर

पिंपरी : कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडलेत. हजारो तरुण बेरोजगार झालेत. नैराश्याच्या गर्तेत जाऊन अनेकांनी आपलं जीवन संपवल्याचे दुर्दैवी प्रकारही घडत आहेत. अशा वेळी, अपयशानं खचून गेलेल्या, नैराश्याला कवटाळून बसलेल्या तरुणांना पिंपरी-चिंचवडमधील एका रिक्षाचालकाची कहाणी नवं बळ देणारीच आहे. दोन्ही पायांनी अपंग असलेला रिक्षाचालक कोरोना संकटाला धीराने सामोरा जात आहे. बिकट परिस्थितीवर त्यानं जिद्दीनं, परिश्रमानं मात केली आहे.

लॉकडाऊन शिथिल होताच पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा व्यवसाय पुन्हा सुरू करून स्वाभिमानाने तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. नागेश काळे असे त्या २९ वर्षीय रिक्षाचालकाचे नाव आहे.

चिखली येथील मोरेवस्ती येथे आई व पत्नीसह ते भाडेतत्त्वावरील खोलीत राहतात. त्यांचे मूळ गाव परभणी असून, १५ वर्षांपूर्वी त्यांचे वडील रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवड शहरात आले. तेव्हापासून काळे कुटुंब मिळेल ते काम करतात. नागेश काळे यांनीदेखील काही कंपन्यांमध्ये कंत्राटी तत्त्वावर काम केले. त्यानंतर त्यांनी भाडेतत्त्वावर रिक्षा घेऊन रिक्षा चालविण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यात त्यांना यश आले. त्यामुळे त्यांनी स्वत:ची रिक्षा खरेदी केली. परमिट काढले. दरम्यान सात वर्षांपूर्वी रेल्वे अपघातात त्यांचे दोन्ही पाय गेले.

त्यांच्या पत्नीने मॉलमध्ये काम सुरू केले. घरखर्चाला हातभार लागला. मात्र, बेरोजगारीच्या विचाराने नागेश अस्वस्थ होत असत. पायावरील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात गेले. तेथून परत येत असताना मित्राला सोबत घेऊन रिक्षा चालविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना बरे वाटले. सराव केला. पाय नसले तरी रिक्षा चालविता येऊ शकते, हे समजले. त्यामुळे त्यांचा आनंद आणि आत्मविश्वासदेखील द्विगुणित झाला. त्यांनी रिक्षात तांत्रिक बदल करून घेतले. पायाचा ब्रेक हँडलला जोडून घेतला. लॉकडाऊनच्या काळात दररोज आठ ते नऊ तास रिक्षा चालवून रोज ३०० ते ५०० रुपये मिळवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.

 

मीही निराश झालो होतो, पण...

कोशिश करने वालों की हार नही होती, हे आपल्या कृतीतून सिद्ध करणाऱ्या नागेश काळे यांनी 'लोकमत'कडे आपलं मनोगत अगदी मोकळेपणानं व्यक्त केलं. ''कोरोना काळात माझ्यासारख्या अनेक अपंग व्यक्ती आत्मसन्मानाने उभं राहण्यासाठी धडपड करीत आहेत. अपंग असल्यामुळे अनेक जण सहानुभूती दाखवितात. मात्र त्यापेक्षाही जास्त कामाची गरज आहे. लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झाला. पुरेसे प्रवासी नसल्याने मोठे नुकसान होते. त्यामुळे माझ्यासारख्या रिक्षाचालकांना नियमित प्रवासी भाडे मिळणे आवश्यक आहे'', याकडे त्यांनी लक्ष वेधलं. लॉकडाऊन दरम्यान पिंपरी - चिंचवड, पुण्यासह राज्यात सुमारे आठ रिक्षाचालकांनी आत्महत्या केल्या. हे थांबले पाहिजे. रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावले. त्यामुळे काही काळ मला देखील नैराश्य आले होते. मात्र, कुटुंबांच्या जबाबदारीने मला स्वस्थ बसू दिले नाही. तसाच आघात कोरोना महामारीने केला. लाॅकडाऊन शिथील झाले तरी पहिल्या टप्प्यात रिक्षा चालविण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे भाजीपाला विक्री केली. त्यातून दोन पैसे मिळविले, असं नागेश यांनी सांगितलं.

लॉकडाऊन आणखी शिथील झाला आणि त्यानंतर काळे यांनी त्यांची रिक्षा रस्त्यावर आणली. सुरुवातीच्या टप्प्यात प्रवासी नसल्याने कसरत झाली. मात्र तरीही काळे थांबले नाहीत. धावत आहेत, कारण आयुष्याच्या खडतर प्रवासात कधीही पंक्चर न होणाऱ्या त्यांच्या इच्छाशक्तीला रिक्षाच्या तीन चाकांची जोड आहे.

आपल्या शरीराचे अवयव कमी झाले, मात्र मन खंबीर आहे. लॉकडाऊन सर्वांसाठीच होता. निराश न होता सर्वांनी संकटावर मात करावी. त्याचा स्वीकार करून मास्कसह सॅनिटायजेशनची काळजी घ्यावी. त्यानुसार आपल्या कामातही बदल करावा लागेल, पण काम थांबवून चालणार नाही, असं आवाहन नागेश काळे यांनी सगळ्यांनाच केलं.

(फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचं कुठलंही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPositive on Coronaसकारात्मक कोरोना बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या