शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

CoronaVirus: वर्तमानपत्रांच्या घरोघरी वितरणावरील बंदी उठवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 06:49 IST

मुंबई, पुण्यासह कंटेनमेंट क्षेत्रामध्ये मात्र निर्बंध कायम राहणार

मुंबई : वर्तमानपत्रांच्या घरोघरी वितरणावर आणलेले निर्बंध राज्य सरकारने मंगळवारी मागे घेतले. वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते हे मास्क लावून, जंतुनाशके हाताला लावून तसेच सामाजिक अंतर ठेवून वृत्तपत्रे घरोघरी देऊ शकतात, असा आदेश राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी काढला.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभर लागू असलेल्या लॉकडाउनमधून मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रसारमाध्यमांना केंद्र सरकारने सूट दिलेली आहे. तसे परिपत्रही जारी केले आहे. मात्र, राज्य सरकारने २० एप्रिलपासून काही निर्बंध शिथिल करताना वृत्तपत्रांच्या छपाईला असलेली परवानगी कायम ठेवत घरोघरी (डोअर-टू-डोअर) वाटप करण्यास मात्र निर्बंध आणले होते. वृत्तपत्रांची विक्री स्टॉलवर करावी, असे सरकारने म्हटले होते. सरकारच्या या निर्णयास मुद्रित माध्यमातून तीव्र विरोध झाला. तसेच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ‘स्यू मोटो’ याचिका दाखल करून घेत, यावर प्रधान सचिवांना २४ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. तर नागपूर खंडपीठात महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ व नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांनी सरकारच्या निर्णयाविरुद्ध रिट याचिका दाखल केली होती. त्यावर नागपूर खंडपीठाने केंद्र, राज्य सरकार व नागपूर महापालिका आयुक्त यांना नोटीस बजावून २३ तारखेला उत्तर देण्यास सांगितले होते.मास्क बंधनकारकयासंदर्भात राज्य सरकारने सुधारित आदेश काढत वृत्तपत्रांच्या घरोघरी वितरणास सशर्त परवानगी दिली आहे. त्यानुसार वृत्तपत्रांची विक्री करणाऱ्यांनी मास्क घालणे बंधनकारक आहे. तसेच हॅन्ड सॅनिटायझर वापरणे व सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे.या भागात निर्बंध कायम : मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र (एमएमआर रिजन), पुणे महानगरपालिका क्षेत्र तसेच राज्यातील ज्या भागात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले असेल, अशा भागात वृत्तपत्रांचे घरोघरी वाटप करता येणार नाही.१७ एप्रिलच्या अधिसूचनेत बदलमुंबई महानगर आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी नवी अधिसूचना लागू असेल. म्हणजेच १७ एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई महानगर आणि पुणे महानगरसाठी लागू राहील. उर्वरित राज्यात १७ एप्रिलप्रमाणे शिथिलता राहील.ई-कॉमर्स कंपन्यांना इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाहतूक करण्यास दिलेली मुभा रद्द करण्यात आली आहे. त्यांना केवळ अन्न, जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि वैद्यकीय उपकरणांचीच वाहतूक करता येईल. फरसाण, मिठाईची दुकाने, कन्फेक्शनरी दुकाने मुंबई-पुण्यात बंदच राहतील.मुंबई आणि पुण्यात बांधकामेदेखील बंदच राहतील, तसेच या भागांतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनीदेखील त्यांच्या कर्मचाºयांकडून ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीनेच काम करून घ्यायचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या