शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

Palghar Mob Lynching : कोरोनाच्या संकटात शरद पवार उद्या सकाळी संवाद साधणार; पालघरच्या घटनेवर काय बोलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 21:29 IST

पालघरच्या घटनेवर काय बोलणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. 

मुंबई- देशावर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालेला असतानाच राज्य सरकारकडून त्याला थोपवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. ठाकरे सरकारनं कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्यात नियमावलीच लागू केली आहे. काही प्रमाणात ऑरेंज आणि ग्रीन झोनमधल्या जिल्ह्यांना सूट दिली असली तरी जिल्हाबंदीच कायमच आहे. परंतु या कोरोनाच्या काळात पालघरच्या घटनेनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. पालघर जिल्ह्यातील एका गावात दोन साधू आणि एका चालकाच्या झालेल्या हत्येमुळे देशपातळीवर खळबळ उडाली आहे. दरम्यान, जमावाकडून साधूंच्या झालेल्या क्रूर हत्येची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गंभीर दखल घेतली असून, मुख्यमंत्र्यांना योग्य ती कारवाई करण्यास सांगितलं आहे. कोरोनाच्या  प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार २१ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ वाजता शरद पवार फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधणार असून, पालघरच्या घटनेवर काय बोलणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. शरद पवारांच्या भूमिकेला ठाकरे सरकारमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गेल्या वेळी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी वांद्र्यातल्या प्रकारावर भाष्य केलं होतं. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असला तरी त्यांच्या प्रवासाची सोय करू शकत नाही. मात्र त्यांच्या जेवणाची खबरदारी सरकार, सेवाभावी संस्थांनी घेतल्याचं त्यांनी सांगितलं होतं. 3 मेपर्यंत संपूर्ण देशाने सरकारला सहकार्य करायचं आहे. सरकार धीराने काम करत आहे, योग्य नियोजन करून कोरोनाचा सामना करणं गरजेचं आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे कोरोनाची बाधा कमी असल्याचाही त्यांनी उल्लेख केला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे उद्योग बंद असून, अशातच कामगारांची जबाबदारी आणि वाढणारं कर्ज आणि शून्य उत्पादन अशा संकटात सर्वच क्षेत्र आहेत. त्यामुळे राज्यावर आर्थिक संकट येणार आहे. एवढंच नाहीतर शेतकऱ्यांवरही शेतीचा माल तसाच सोडून देण्याची वेळ आल्याचंही ते म्हणाले होते. येणाऱ्या काळात बेरोजगारी वाढणार आहे. कोरोनाचे परिणामही एक ते दोन वर्षांपर्यंत जाणवणार आहेत.' कोरोना संकटाचा अर्थकारणावरही मोठा परिणाम होणार आहे. याबाबत आतापासूनच काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. तसेच काही उपाययोजनाही करणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. अशातच कोरोनाच्या संकटाशी संयमानं मुकाबला करणं आवश्यक आहे.' असा सल्लाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला दिला होता. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcorona virusकोरोना वायरस बातम्या