शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

Palghar Mob Lynching : कोरोनाच्या संकटात शरद पवार उद्या सकाळी संवाद साधणार; पालघरच्या घटनेवर काय बोलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 21:29 IST

पालघरच्या घटनेवर काय बोलणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. 

मुंबई- देशावर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालेला असतानाच राज्य सरकारकडून त्याला थोपवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. ठाकरे सरकारनं कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्यात नियमावलीच लागू केली आहे. काही प्रमाणात ऑरेंज आणि ग्रीन झोनमधल्या जिल्ह्यांना सूट दिली असली तरी जिल्हाबंदीच कायमच आहे. परंतु या कोरोनाच्या काळात पालघरच्या घटनेनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. पालघर जिल्ह्यातील एका गावात दोन साधू आणि एका चालकाच्या झालेल्या हत्येमुळे देशपातळीवर खळबळ उडाली आहे. दरम्यान, जमावाकडून साधूंच्या झालेल्या क्रूर हत्येची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गंभीर दखल घेतली असून, मुख्यमंत्र्यांना योग्य ती कारवाई करण्यास सांगितलं आहे. कोरोनाच्या  प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार २१ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ वाजता शरद पवार फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधणार असून, पालघरच्या घटनेवर काय बोलणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. शरद पवारांच्या भूमिकेला ठाकरे सरकारमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गेल्या वेळी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी वांद्र्यातल्या प्रकारावर भाष्य केलं होतं. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असला तरी त्यांच्या प्रवासाची सोय करू शकत नाही. मात्र त्यांच्या जेवणाची खबरदारी सरकार, सेवाभावी संस्थांनी घेतल्याचं त्यांनी सांगितलं होतं. 3 मेपर्यंत संपूर्ण देशाने सरकारला सहकार्य करायचं आहे. सरकार धीराने काम करत आहे, योग्य नियोजन करून कोरोनाचा सामना करणं गरजेचं आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे कोरोनाची बाधा कमी असल्याचाही त्यांनी उल्लेख केला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे उद्योग बंद असून, अशातच कामगारांची जबाबदारी आणि वाढणारं कर्ज आणि शून्य उत्पादन अशा संकटात सर्वच क्षेत्र आहेत. त्यामुळे राज्यावर आर्थिक संकट येणार आहे. एवढंच नाहीतर शेतकऱ्यांवरही शेतीचा माल तसाच सोडून देण्याची वेळ आल्याचंही ते म्हणाले होते. येणाऱ्या काळात बेरोजगारी वाढणार आहे. कोरोनाचे परिणामही एक ते दोन वर्षांपर्यंत जाणवणार आहेत.' कोरोना संकटाचा अर्थकारणावरही मोठा परिणाम होणार आहे. याबाबत आतापासूनच काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. तसेच काही उपाययोजनाही करणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. अशातच कोरोनाच्या संकटाशी संयमानं मुकाबला करणं आवश्यक आहे.' असा सल्लाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला दिला होता. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcorona virusकोरोना वायरस बातम्या