शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Coronavirus : उजळणी करा, ताण घेऊ नका; मानसिक तणावाखाली असणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 06:08 IST

coronavirus : विद्यार्थ्यांना दहावीच्या एका पेपरची धाकधूक असणे साहजिकच आहे. मात्र त्यांनी आपल्या अभ्यासात सातत्य राखून उजळणी करावी म्हणजे त्या पेपरची भीती उरणार नाही. पालक यामध्ये विद्यार्थ्यांना नक्कीच मदत करू शकतात.

मुंबई : कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता शालेय शिक्षण विभागाकडून दहावीचा भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. एका पेपरसाठी ३१ मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करत आहेत. मात्रर् ंविद्यार्थ्यांनी राहिलेल्या परीक्षेचा ताण न घेता पुढील महत्त्वाच्या परीक्षांची माहिती घ्यावी. त्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यास वेळ द्यावा, असे करिअर मार्गदर्शक आणि शिक्षणतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना सुचविले आहे.आपत्कालीन परिस्थितीतही राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेटाने, परिश्रमपूर्वक सुरू ठेवल्या होत्या. विविध पालक संघटना आणि शाळांकडून ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे जाहीर केल्यानंतरच या परीक्षांनाही स्थगिती द्यावी, अशी मागणी होत होती. या कारणास्तव अखेर एक पेपर बाकी असताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षेला स्थगिती देऊन पुढील निर्णय ३१ मार्चनंतर घेण्यात येईल, असे जाहीर केले. मात्र दहावीचे वर्ष म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष, आणि ही परीक्षा झाली की विद्यार्थ्यांचा मानसिक ताण आपोआप कमी होतो. मात्र लांबणीवर पडलेल्या पेपरचा अभ्यास किती दिवस आणि कसा करणार? इतके दिवस तोच अभ्यास सोडून इतर काहीच करता येणार नाही. यामुळे उगीचच अडकून पडलो, अशा प्रतिक्रिया दहावीच्या विद्यार्थ्यांकडून येत आहेत.विद्यार्थ्यांना दहावीच्या एका पेपरची धाकधूक असणे साहजिकच आहे. मात्र त्यांनी आपल्या अभ्यासात सातत्य राखून उजळणी करावी म्हणजे त्या पेपरची भीती उरणार नाही. पालक यामध्ये विद्यार्थ्यांना नक्कीच मदत करू शकतात. ते विविध उपक्रमातून सहज विद्यार्थ्यांची उजळणी करून घेऊ शकतात. यामुळे विद्यार्थ्यांना खास वेळ काढून अभ्यास करण्याची गरज भासणार नाही आणि त्यांना त्याचा ताणही वाटणार नाही. शिवाय ते इतर विषयांत आपला सकारात्मक वेळ गुंतवू शकतात, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ शीला साळवे यांनी दिला.या काळात पेपरचा मानसिक ताण घेण्याऐवजी पुढील आयुष्यात आपण तयारी करत असलेल्या क्षेत्राविषयी माहिती घेण्यासाठी या वेळेचा सदुपयोग करून घ्यावा, असे मत राजश्री मोरे या शिक्षिकेने व्यक्त केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसexamपरीक्षा