शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

CoronaVirus कोरोनामुळे रेल्वे रद्द झाली; प्रवाशांना पैसे परत मिळू लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 07:20 IST

२१ लाख प्रवाशांना दिले एकूण १३४ कोटी : मुंबई विभागातून ६३ कोटींचा परतावा

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. एक्स्प्रेस सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी काढलेल्या तिकिटांचा परतावा पश्चिम रेल्वेकडून दिला जात आहे. १ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत पश्चिम रेल्वेच्या संपूर्ण विभागातून एकूण २१ लाख २३ हजार प्रवाशांना १३४ कोटी ४८ लाख रुपयांचा तिकीट परतावा केला आहे. याच कालावधीत मुंबई विभागातून ९ लाख प्रवाशांना पश्चिम रेल्वेने ६३ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन घोषित केला आहे. लॉकडाउनमुळे भारतीय रेल्वे मार्गावर एकही प्रवासी वाहतूक सेवा सुरू नाही. प्रवाशांचा प्रवास रद्द होत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त प्रवाशांनी दोन-तीन महिन्यांअगोदर काढलेले तिकीट पश्चिम रेल्वेकडून रद्द केले जात आहे.

या प्रवाशांना तिकीट परतावा दिला जात आहे. १ मार्च ते ३१ मार्च कालावधीत २० लाख ९६ हजार प्रवाशांचा प्रवास रद्द झाला आहे.परिणामी पश्चिम रेल्वेने या प्रवाशांना १३२ कोटी २५ लाख रुपयांचा तिकीट परतावा दिला आहे. तर मागील ४ दिवसात २२ हजार ४२७ प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. यातून २ कोटी २३ लाख रुपये परतावा देण्यात आला.

१ मार्च ते ४ एप्रिल कालावधीत पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील एकूण ९ लाख ३५ हजार ५०९ प्रवाशांनी तिकीट रद्द केले आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वेने ६३ कोटी ४८ लाख रुपये परतावा केला आहे. १ मार्च ते ३१ मार्चपर्यंत ९ लाख २३ हजार ६४५ प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. यातून ६२ कोटी ४९ लाख रुपये परतावा देण्यात आला. तर मागील ४ दिवसात ११ हजार ८६४ प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. यातून ९८ लाख २४ हजार रुपये परतावा देण्यात आला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या