शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

CoronaVirus News: रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.४९ पोहोचले टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 02:48 IST

राज्याची रुग्णसंख्या १ लाख २४ हजार ३३१; ३ हजार ८२७ रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात दिवसभरात ३ हजार ८२७ रुग्णांची नोंद झाली असून १४२ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या १ लाख २४ हजार ३३१ वर पोहोचली असून मृतांचा आकडा ५ हजार ८९३ झाला आहे. तर राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.४९ टक्के झाले असून मृत्यूदर ४.७४ टक्के आहे. सध्या राज्यात ५५ हजार ६५१ सक्रिय रुग्ण आहेत.राज्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. याखेरीज, रुग्णदुपटीचा दर ३३ दिवसांवर गेला आहे. सध्या मुंबईत ६४ हजार १३९ रुग्ण आहेत, तर ३ हजार ४२५ मृत्यू झाले आहेत. तर शहर उपनगरात २८ हजार ४४२ सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईत शुक्रवारी १ हजार २६९ रुग्णांची नोंद झाली असून ११४ मृत्यू झाले आहेत. या ११४ मृत्यूंपैकी ५९ मृत्यू १५ जून पूर्वीचे असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. आतापर्यंत मुंबईत ३२ हजार २६४ जण कोविडमुक्त झाले आहेत.राज्यात शुक्रवारी नोंद झालेल्या १४२ मृत्यूंमध्ये मुंबई ११४, ठाणे २, वसई विरार ५, रायगड ३, नाशिक ३, धुळे ३, जळगाव ३, सोलापूर १ आणि औरंगाबाद ८ या रुग्णांचा समावेश आहे. १४२ मृत्यूंपैकी ८९ पुरुष तर ५३ महिला आहे. त्यातील ७४ रुग्णांचे वय ६० हून अधिक आहे. ५७ रुग्णांचे वय ४० ते ५९ आहे. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. सध्या राज्यात ५ लाख ९१ हजार ४९ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर २५ हजार लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ३५ हजार ६७४ नमुन्यांपैकी १६.९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात प्रयोगशाळा नमुने तपासणीचे प्रमाण प्रति दशलक्ष ५३१७ एवढे असून हे प्रमाण देशतापळीवर ४२१० एवढे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या