शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

CoronaVirus News: मार्च ते सप्टेंबरदरम्यान रुग्ण निदानाचा आलेख चढाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 06:51 IST

CoronaVirus News: मृत्युदर घटला; कोरानाबाधित बरे होण्याचे प्रमाण वाढले

मुंबई : राज्यात मार्चात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून देशातील सर्वात जास्त रुग्ण आणि मृत्युदरात महाराष्ट्र पुढे असल्याचे दिसून आले होते. संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात देशाच्या तुलनेत ४० टक्के संसर्ग राज्यात असल्याचे दिसून आले होते, आता मात्र हे प्रमाण कमी झाले आहे. राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, हे प्रमाण आता ४० टक्क्यांवरून २२ टक्क्यांवर आले आहे.ऑगस्ट महिन्यात स्थिरावलेल्या कोरोनाच्या स्थितीने सप्टेंबरच्या पंधरवड्यात उसंडी मारली. या काळात अगदी १२ ते २२ हजारांवर दररोजच्या रुग्ण निदानाचा आलेख पोहोचला.याविषयी टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले, मागच्या काही महिन्यांच्या तुलनेत राज्यभरात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे राज्यात दैनंदिन रुग्ण वाढ अधिक दिसून येते. परंतु एकूणच कोरोनाच्या मृत्युंमध्ये घट झाली असून, ही समाधानकारक स्थिती आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंत ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे, तर दुसºया बाजूला रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला असून, सध्या सक्रिय रुग्णांचे प्रमाणही २.६ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून येत आहे.आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ.साधना तायडे यांनी सांगितले की, सध्या राज्यात कोरोना चाचण्यांची क्षमता दुप्पट करण्याचे काम सुरू आहे, तसेच मृत्युदर १ टक्क्यांच्या खाली आणण्याचे काम वेगाने सुरू आहे. शिवाय, पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही १० टक्के असल्याने, त्याविषयी टास्क फोर्सच्या तज्ज्ञांच्या निर्देशानुसार, विश्लेषण करण्यात येत आहे.कोरोना चाचणीच्या क्षमतेत वाढमुंबईत ३ फेब्रुवारी, २०२०ला पहिली कोरोना चाचणी करण्यात आली. ३ फेब्रुवारी ते ६ मे या तीन महिन्यांच्या कालावधीत एक लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला, तर १ जूनला दोन लाख चाचण्यांचा टप्पा पार करण्यात आला. त्यानंतर, २४ जून रोजी ३ लाख चाचण्या पार पडल्या. १४ जुलै रोजी ४ लाख चाचण्या पूर्ण केल्या. २९ जुलैपर्यंत ५ लाख चाचण्या पार पडल्या होत्या, तर २३ आॅगस्टला चाचण्यांची संख्या ७ लाख झाली, तसेच २९ सप्टेंबरपर्यंत हीच संख्या ११ लाखांच्या पुढे गेली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस