शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

CoronaVirus News : दिवसभरात कोरोनाचे ५०० हून अधिक मृत्यू; २० हजार ४८२ नवीन बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 04:38 IST

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.६२ टक्के झाले असून मृत्युदर २.७७ टक्के आहे. सध्या राज्यात २ लाख ९१ हजार ७९७ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबई : राज्यात मंगळवारी तब्बल ५१५ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला, तर आतापर्यंत ३०,४०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २० हजार ४८२ रुग्ण आढळले असून परिणामी कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ९७ हजार ८५६ झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.६२ टक्के झाले असून मृत्युदर २.७७ टक्के आहे. सध्या राज्यात २ लाख ९१ हजार ७९७ सक्रिय रुग्ण आहेत.राज्यातील ५१५ मृत्यूंपैकी ३०२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत. तर ११६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ९७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. एकूण ५१५ मृत्यूंमध्ये मुंबई ४९, ठाणे ७, ठाणे मनपा ११, नवी मुंबई मनपा १३, कल्याण-डोंबिवली मनपा २६, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा- भार्इंदर मनपा २, पालघर ५, वसई- विरार मनपा ५, रायगड १०, पनवेल मनपा ४ आदी रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १९,४२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ७ लाख ७५ हजार २७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ५४ दिवसांवरमुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्क्यांवर गेले असून रुग्ण दुपटीचा काळ ५४ दिवसांवर पोहोचला आहे. दिवसभरात १ हजार ५८६ रुग्ण आढळले असून ४९ मृत्यूंची नोंद झाली आहे. शहरात सध्या १ लाख ७३ हजार ५९६ कोरोनाबाधित असून ८ हजार २३० मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत १ लाख ३४ हजार ६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ३० हजार ९३८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिवसभरात कोरोनाचे ५०० हून अधिक मृत्यू; २० हजार ४८२ नवीन बाधितमुंबई : राज्यात मंगळवारी तब्बल ५१५ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला, तर आतापर्यंत ३०,४०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २० हजार ४८२ रुग्ण आढळले असून परिणामी कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ९७ हजार ८५६ झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.६२ टक्के झाले असून मृत्युदर २.७७ टक्के आहे. सध्या राज्यात २ लाख ९१ हजार ७९७ सक्रिय रुग्ण आहेत.राज्यातील ५१५ मृत्यूंपैकी ३०२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत. तर ११६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ९७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. एकूण ५१५ मृत्यूंमध्ये मुंबई ४९, ठाणे ७, ठाणे मनपा ११, नवी मुंबई मनपा १३, कल्याण-डोंबिवली मनपा २६, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा- भार्इंदर मनपा २, पालघर ५, वसई- विरार मनपा ५, रायगड १०, पनवेल मनपा ४ आदी रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १९,४२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ७ लाख ७५ हजार २७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ५४ दिवसांवरमुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्क्यांवर गेले असून रुग्ण दुपटीचा काळ ५४ दिवसांवर पोहोचला आहे. दिवसभरात १ हजार ५८६ रुग्ण आढळले असून ४९ मृत्यूंची नोंद झाली आहे. शहरात सध्या १ लाख ७३ हजार ५९६ कोरोनाबाधित असून ८ हजार २३० मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत १ लाख ३४ हजार ६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ३० हजार ९३८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस