शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

CoronaVirus News: कोरोना मृतांच्या नातेवाईकांना अनुदानासाठी शंभर कोटी; खात्यात लवकरच जमा होणार रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 07:41 IST

लवकरच कोविड मृतांच्या पात्र नातेवाइकांना अनुदान वितरित करण्याचे काम सुरू होणार

मुंबई :  राज्यात कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारस किंवा जवळच्या नातेवाइकांना ५० हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानासाठी २० हजार जण पात्र ठरले असून, यांच्या अनुदानासाठी राज्य सरकारने १०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. यासाठी शासन स्तरावर संकेतस्थळ सुरू करणे, बँक खाते उघडण्यासह आवश्यक कार्यवाही संदर्भातील शासन निर्णय महसूल विभागाने जारी केला आहे. त्यामुळे लवकरच कोविड मृतांच्या पात्र नातेवाइकांना अनुदान वितरित करण्याचे काम सुरू होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशातील कोरोना मृतांच्या नातेवाइकांना ५० हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय झाला. मात्र, कोविड मृतांची संख्या मोठी असल्याने पडणारा आर्थिक भार लक्षात घेत अनेक राज्यात हे काम संथगतीने सुरू होते. मात्र, न्यायालयाने कडक भूमिका घेत सर्व राज्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले होते. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून ही मदत केली जाणार आहे. यासाठी नवी वेबसाईट देखील विकसित करण्यात येणार असल्याची घोषणाही राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती. तसेच अनुदान वितरणाची पद्धतही ठरविण्यात आली. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात येणाऱ्या २० हजार पात्र अर्जदारांसाठी शंभर कोटींचा निधी मंजूर केला आहे. नवे वेब पोर्टल सुरूअनुदानासाठी मंजूर केलेली ही सर्व रक्कम आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांच्या नावे उघडण्यात आलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित पात्र अर्जदारांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नव्याने वेब पोर्टलदेखील सुरू करण्यात आले असून त्या वेब पोर्टलवर ऑनलाइन अर्ज कसा करावा तसेच या योजनेची संपूर्ण तपशीलवार कार्यपद्धती याची माहिती देण्यात आली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या