शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील 'या' ११ शहरांमध्ये दिवसभरात एकही कोरोना मृत्यू नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 06:50 IST

दिलासादायक चित्र; राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख घसरला

मुंबई : राज्यात आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली असून, मंगळवारी तब्बल ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर दुसरीकडे दिवसभरातील मृत्यूंची ४७७  ही संख्या थोडी चिंता वाढविणारी असली, तरी औरंगाबाद ग्रामीण, ठाणे, उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड, भंडारा, गडचिराेली अशा ११ शहरांत एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. राज्यात मंगळवारी १४ हजार १२३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने सक्रिय रुग्णसंख्या २,३०,६८१ इतकी झाली आहे. नव्या बाधितांची संख्या वीस हजारांखाली आल्याने मागीलवर्षीच्या उच्चांकी रुग्णसंख्येवरून बाधितांचा आलेख उतरणीला लागला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६८ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२८ टक्क्यांवर गेल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा हलका झाल्याचे पाहायला मिळते. रुग्णसंख्या वाढीचा दर कमी होऊ लागल्याने मंगळवारपासून अनेक शहरांत दुकाने उघडण्यास स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली. त्यामुळे बाजारपेठ महिनाभरानंतर पुन्हा गजबजू लागल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात मंगळवारी एकही बाधित रुग्ण आढळला नाही, तर भिवंडी, परभणी शहरात प्रत्येकी ७, तर जळगाव शहरात केवळ आठ नवे रुग्ण आढळले आहेत.मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या हजाराखालीमुंबईतही रुग्णवाढ नियंत्रणात येत असल्याचे दिसते आहे. गेले काही दिवस येथील दैनंदिन रुग्णसंख्या एक हजाराच्याखाली नोंदवली जात आहे. मंगळवारी मुंबईत ८३१ नवे रुग्ण आढळून आले. या शहरांत शून्य मृत्यू ठाणे, उल्हासनगर भिवंडी, मीरा-भाईंदर, औरंगाबाद ग्रामीण, धुळे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, गोंदिया या शहरांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही, तर कल्याण-डोंबिवली, पनवेल, जळगाव आणि सोलापूर येथे प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस