शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील 'या' ११ शहरांमध्ये दिवसभरात एकही कोरोना मृत्यू नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 06:50 IST

दिलासादायक चित्र; राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख घसरला

मुंबई : राज्यात आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली असून, मंगळवारी तब्बल ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर दुसरीकडे दिवसभरातील मृत्यूंची ४७७  ही संख्या थोडी चिंता वाढविणारी असली, तरी औरंगाबाद ग्रामीण, ठाणे, उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड, भंडारा, गडचिराेली अशा ११ शहरांत एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. राज्यात मंगळवारी १४ हजार १२३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने सक्रिय रुग्णसंख्या २,३०,६८१ इतकी झाली आहे. नव्या बाधितांची संख्या वीस हजारांखाली आल्याने मागीलवर्षीच्या उच्चांकी रुग्णसंख्येवरून बाधितांचा आलेख उतरणीला लागला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६८ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२८ टक्क्यांवर गेल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा हलका झाल्याचे पाहायला मिळते. रुग्णसंख्या वाढीचा दर कमी होऊ लागल्याने मंगळवारपासून अनेक शहरांत दुकाने उघडण्यास स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली. त्यामुळे बाजारपेठ महिनाभरानंतर पुन्हा गजबजू लागल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात मंगळवारी एकही बाधित रुग्ण आढळला नाही, तर भिवंडी, परभणी शहरात प्रत्येकी ७, तर जळगाव शहरात केवळ आठ नवे रुग्ण आढळले आहेत.मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या हजाराखालीमुंबईतही रुग्णवाढ नियंत्रणात येत असल्याचे दिसते आहे. गेले काही दिवस येथील दैनंदिन रुग्णसंख्या एक हजाराच्याखाली नोंदवली जात आहे. मंगळवारी मुंबईत ८३१ नवे रुग्ण आढळून आले. या शहरांत शून्य मृत्यू ठाणे, उल्हासनगर भिवंडी, मीरा-भाईंदर, औरंगाबाद ग्रामीण, धुळे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, गोंदिया या शहरांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही, तर कल्याण-डोंबिवली, पनवेल, जळगाव आणि सोलापूर येथे प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस