शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

CoronaVirus News : दिलासादायक! दिवसभरात २२ हजार रुग्ण झाले बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 02:24 IST

राज्यभरात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ३४ हजार ४३२ पोहोचली आहे. सध्या ३ लाख ८८७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबई : राज्यात शुक्रवारी एका दिवसात २२ हजार ७८ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी परतले. ही आतापर्यंतची दिवसभरात बरे होणाऱ्यांची सर्वाधिक संख्या आहे. आज नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून, आज २१ हजार ६५६ नवीन रुग्णांचे निदान झाले.राज्यभरात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ३४ हजार ४३२ पोहोचली आहे. सध्या ३ लाख ८८७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११ लाख ६७ हजार ४९६ झाली आहे, तर मृतांचा एकूण आकडा ३१,७९१ इतका आहे.आज नोंद झालेल्या एकूण मृत्युंपैकी २४४ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर १०३ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ९३ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. या ९३ मृत्युपैकी पुणे मनपा ४०, नागपूर ११, अहमदनगर ९, औरंगाबाद आणि सातारा प्रत्येकी ७, पुणे ग्रामीण, कोल्हापूर, तसेच सांगलीत प्रत्येकी ३, तर जळगाव आणि नांदेडमध्ये प्रत्येकी २ मृतांचा समावेश आहे. याशिवाय, बुलडाणा, ठाणे, लातूर, पालघर, सोलापूर आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी एका मृताचा समावेश आहे.राज्यात आज कोरोनाच्या ४०५ मृत्यूंची नोंद झाली असून, सध्या मृत्युदर २.७२ टक्के एवढा आहे.मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ५६ दिवसांवरमुंबई : मुंबईत शुक्रवारी २,२६७ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी आणखी कमी होऊन ५६ दिवसांवर आला आहे, तर रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर १.२५ टक्क्यांवर आहे. दिवसभरात ९२५ रुग्ण बरे झाले, तर ५२ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ८,३७२ झाला आहे. सध्या ३४,१३६ सक्रिय रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत एकूण एक लाख ३७ हजार ६६४ रुग्ण बरे झाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस