शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

CoronaVirus News: दिलासादायक! डेल्टा प्लस, तिसऱ्या लाटेचा धोका असताना महाराष्ट्रासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 09:45 IST

राज्यात १०० पैकी ८० रुग्ण आढळले डेल्टाचे, डेल्टा प्लसचे प्रमाण नगण्य; मास्क, सुरक्षित अंतराला पर्याय नाही - तज्ज्ञांचे मत

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : राज्यात १२ जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे ४५ रुग्ण आढळून आले असले तरी घाबरून जाण्याची परिस्थिती नाही. आपल्याकडे प्रत्येक १०० रुग्णांमागे ८० रुग्णांमध्ये डेल्टाचे विषाणू आढळत आहेत. तर प्रत्येक १०० रुग्णांमागे ०.५ रुग्णांमध्ये डेल्टा प्लसचे विषाणू आढळून आले आहेत. ८००० तपासण्यांमधून हा निष्कर्ष समोर आला आहे. यासाठी आज तरी मास्क आणि सुरक्षित अंतर याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

राज्यात जळगाव १३, रत्नागिरी ११, मुंबई ६, ठाणे ५, पुणे ३, पालघर, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक असे ४५ रुग्ण डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आढळून आले आहेत. त्यापैकी रत्नागिरीमधील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बाकी रुग्णांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. डेल्टा प्लस विषाणूची तपासणी मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. तरच या नव्या विषाणूचे किती रुग्ण कोणत्या जिल्ह्यात आहे ते स्पष्ट होईल, असेही या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.  याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, विषाणूमध्ये जनुकीय बदल होणे हा नैसर्गिक भाग आहे. असे बदल झाले नाहीत तर ते जास्त धोकादायक असते. डेल्टा प्लस रुग्णांमुळे या आजाराच्या प्रसाराचा वेग वाढतो. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर ज्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती तयार झाली आहे, त्यालाही न जुमानता हा विषाणू अशा रुग्णांमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. ही याची प्राथमिक लक्षणे समोर आली आहेत. आपल्याकडे सॅम्पल साइज छोटा असल्यामुळे जी माहिती हाताशी आहे, त्यावरून आजतरी डेल्टा प्लस फारसा गंभीर नाही, असे आपण म्हणू शकतो. मात्र हा आजार कितपत गंभीर आहे यासाठी साथरोग शास्त्रीय माहिती गोळा करणे सुरू आहे, असे डॉ. आवटे यांनी सांगितले.  रत्नागिरीत ज्या महिलेचा मृत्यू झाला, ती मनोरुग्ण होती. त्यामुळे ती उपचाराला सहकार्य करू शकली नाही. बाकी रुग्ण सौम्य व मध्यम स्वरूपाच्या आजाराचे आहेत, असे सांगून डॉ. आवटे म्हणाले, डेल्टा प्लस रुग्ण ज्या भागात आढळले आहेत, त्या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे, किंवा संसर्ग वाढण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही आढळलेले नाही. त्यामुळे डेल्टा प्लसच्या प्रसाराचा वेग जास्त आहे, असा निष्कर्ष आज अपुऱ्या माहितीवर काढता येणार नाही. घाबरून न जाता, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे, स्वतःची काळजी घेणे, हेच यावरचे उपचार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले, डेल्टा प्लस रुग्णांची झालेली तपासणी मर्यादित आहे. आणखी जास्त तपासण्या सुरू आहेत. त्यामुळे आत्ताच कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. याबाबत आणखी मोठ्या प्रमाणावर तपासणी करावी लागेल.तपासणीसाठी सेंटिनल सर्वेक्षण राज्यातील ५ प्रयोगशाळा आणि ५ रुग्णालयाची निवड यासाठी सेंटिनल सेंटर म्हणून करण्यात आली आहे. हे सेंटर दर १५ दिवसाला १५ प्रयोगशालेय नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था पुणे, यांना पाठवत आहे. राज्य शासनाने यासाठी कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स ॲण्ड इंटिग्रेटेड बायोलॉजी या प्रयोगशाळेसोबत करार केला आहे. या माध्यमातून दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून १०० प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

सर्वाधिक १९ ते ४५ वर्षे वयोगटातील ४५ रुग्णांपैकी २७ पुरुष व १८ स्त्रिया आहेत. सर्वाधिक २० डेल्टा प्लस रुग्ण १९ ते ४५ वर्षे वयोगटातील आहेत. तर ४६ ते ६० वर्षे वयोगटातील १४ रुग्ण आहेत. यामध्ये १८ वर्षाखालील ६ मुलांचा समावेश असून ६० वर्षावरील ५ रुग्ण आहेत. ४५ रुग्णांपैकी ३४ रुग्णांची सविस्तर माहिती आतापर्यंत गोळा झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या