शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेचा इशारा; मुंबईत 1 दिवसात कोरोनाचे 532 रुग्ण, 15 जुलैनंतर सर्वात मोठी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 09:10 IST

coronavirus : राज्यात कोरोना संक्रमित लोकांची संख्या 64,97,872 झाली आहे आणि मृतांची संख्या 1,37,962 वर पोहोचली आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेबाबत चिंता वाढत आहे. बुधवारी मुंबईत नवीन कोरोना रुग्णांची संख्या 532 नोंदवण्यात आली. जुलैनंतर नवीन प्रकरणांमध्ये ही सर्वात मोठी वाढ आहे. यापूर्वी 15 जुलैला 528 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. दुसरीकडे, राज्यात बुधवारी  कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 4,174 नोंदवली गेली, तर 65 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोना संक्रमित लोकांची संख्या 64,97,872 झाली आहे आणि मृतांची संख्या 1,37,962 वर पोहोचली आहे.

मुंबईत जवळपास दोन महिन्यांनंतर केवळ नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. तसेच, येथील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा वाढला आहे. पॉझिटिव्हिटी रेट आता 0.9 वरून 1.1 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत हा दर 0.5-0.7% दरम्यान होता. आता मुंबईत गेल्या 7 दिवसांत सरासरी रुग्णांचा आकडा 434 वर गेला आहे. तर 18 ऑगस्टला हा आकडा फक्त 253 होता. मुंबईत तिसऱ्या लाटेचा धोका वाढल्याचे हे आकडे इशारा करत आहेत.

रुग्णसंख्या वाढण्याचे काय कारण?गेल्या दोन महिन्यांत मुंबईत लोकल सुरु करण्यात आली आहेत. याशिवाय, येथे काही शाळा देखील उघडल्या आहेत. अधिकाऱ्यांनी कोणतेही नवीन निर्बंध त्वरित मागे घेण्यास नकार दिला आहे. मात्र त्यांनी सांगितले की, कोरोना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच, स्थानिक अधिकाऱ्यांना विशेषतः गणेश चतुर्थी उत्सवाच्या वेळी गर्दी थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.

कोरोना चाचण्यांमध्ये घट?आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळासमोर कोरोनाच्या परिस्थितीवर एक प्रझेंटेशन दिले. या दरम्यान ते म्हणाले की, दैनंदिन प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, परंतु चाचण्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. याआधी राज्यात दररोज दोन मिलियनहून अधिक चाचण्या होत होत्या, त्या आता कमी होऊन दररोज 1.7 मिलियन झाल्या आहेत. म्हणजेच सक्रिय प्रकरणे आज आपण पाहत आहोत, त्यापेक्षा अधिक असू शकतात.

लसीकरणावर भरडॉ. प्रदीप व्यास यांनी इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाइम्सला सांगितले, 'कोविड -19 साथीच्या विरूद्ध आमची लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि रेकॉर्ड करण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा सर्व प्रयत्न करत आहे. 4 सप्टेंबर रोजी आम्ही 1,227,224 डोसचे लसीकरण केले आणि 21 ऑगस्ट रोजी 1,104,465 डोसचे लसीकरण केले.

गणेशोत्सवात सतर्कतामहाराष्ट्र सरकारने बुधवारी म्हटले आहे की, कोविड महामारीमुळे लोकांना गणेशोत्सवाच्यावेळी मंडपात प्रवेश दिला जाणार नाही. राज्याच्या गृह खात्याकडून सांगण्यात आले की, मंडपामधून केवळ ऑनलाइन दर्शनाला परवानगी असेल. यापूर्वी, गृह विभागाने एका आदेशात म्हटले होते की सणादरम्यान सोशल डिस्टंसिंगचे पालन काटेकोरपणे केले पाहिजे.

टॅग्स :MumbaiमुंबईCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस