शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

Coronavirus: महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती?; लवकरच निर्णय होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 09:13 IST

दिल्ली, कर्नाटक तसेच इतर काही राज्यांमध्ये कोविड संसर्गात वाढ होत असून, त्याविषयी महाराष्ट्रातील राज्य टास्क फोर्सने चिंता व्यक्त केली आहे

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत असून, या पार्श्वभूमीवर राज्यात बंदिस्त ठिकाणी (इनडोअर) मास्क वापराची सक्ती करण्याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. तशी शिफारस राज्य टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या गरजेवर भर दिला आहे. 

दिल्ली, कर्नाटक तसेच इतर काही राज्यांमध्ये कोविड संसर्गात वाढ होत असून, त्याविषयी महाराष्ट्रातील राज्य टास्क फोर्सने चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी टास्क फोर्सची सोमवारी रात्री बैठक घेतली. तेव्हा ही चिंता त्यांच्या कानावर घालण्यात आली.  मास्कचा वापर वाढविणे, लसीकरणाला आणखी वेग देणे, रुग्णांचा शोध घेणे, जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देणे आवश्यक आहे, असे टास्क फोर्सने सांगितले.  

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीत राज्यात बंदिस्त ठिकाणी मास्क वापराची सक्ती करण्याबाबतची शिफारस टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. डॉ.संजय ओक, डॉ.शशांक जोशी, तसेच इतर सदस्य बैठकीला उपस्थित होते. सध्या संसर्ग झालेली व्यक्ती ही रॅपिड टेस्ट करून स्वत:वर घरच्या घरीच उपचार करून घेत आहे. त्यांना विलगीकरणातील आवश्यक उपचार घेणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसून येत नाही, असे निरीक्षणही टास्क फोर्सच्या सदस्यांनी नोंदविले आहे.

टास्क फोर्सच्या सूचनाकिमान बंदिस्त ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक करावे. विशेषत: चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स अशा ठिकाणी संसर्गाचा धोका लक्षात घेता, या ठिकाणी मास्क बंधनकारक पाहिजेत. विमान कंपन्या प्रवाशांना मास्क वापराविषयी वारंवार सांगतात, तशाच पद्धतीने रुग्णालयांमध्येही मास्कचा वापर प्राधान्याने सुरू करण्याविषयी सूचना देणे आवश्यक आहे. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. दुसऱ्या डोसनंतर बूस्टर डोस घेण्यासाठी २७० दिवसांचे अंतर कमी करून १८० दिवसांवर आणावे.

भविष्यात विषाणूचे काही परिवर्तित प्रकार येऊ शकतात. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वच विषाणूचे प्रकार ओमायक्रॉन इतके सौम्य असतीलच असे नाही. त्यामुळे मास्क घालणे व लसीकरण करणे हाच सर्वात प्रभावी उपाय आहे, असे टास्क फोर्सने स्पष्ट केले. विषाणूचे परिवर्तित प्रकार जाणून घेण्यासाठी व अधिक चांगली उपाययोजना करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंगचे निकाल वेळेवर मिळणेही गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रयोगशाळांची संख्या वाढवावी, असे टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना सांगितले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस