शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Coronavirus: देशात सर्वाधिक १०८ कोरोना लॅब महाराष्ट्रात; आजवर ९ लाख ४३,४८५ चाचण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 07:06 IST

कोरोना चाचणी केलेल्या १ लाख ७३ हजार २२७ म्हणजे १८.३० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. देशात खासगी व सरकारी मिळून १०४७ लॅब आहेत.

अतुल कुलकर्णी

मुंबई : राज्यात १२ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला तेव्हा मुंबई, पुणे आणि नागपूर येथे तीन तपासणी प्रयोगशाळा (लॅब) होत्या. आता त्या १०८ झाल्या आहेत. आत्तापर्यंत ९ लाख ४३ हजार ४८५ चाचण्या झाल्या असून महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक तपासण्या करणारे राज्य ठरले आहे.

कोरोना चाचणी केलेल्या १ लाख ७३ हजार २२७ म्हणजे १८.३० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. देशात खासगी व सरकारी मिळून १०४७ लॅब आहेत. महाराष्ट्रात सरकारी ६२ आणि खासगी ४६ अशा १०८ लॅब कार्यरत आहेत. यापैकी थेट कोरोनाच्या डिटेल तपासणीच्या ७७, ‘ट्रू नेट’ तपासणी करणाऱ्या १६ आणि ‘सीबी नेट’ तपासणीच्या १५ लॅब आहेत. तपासणीपैकी ७,७३,२९१ (८१.७० टक्के) रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत.

बिना पेट्रोलची गाडी, म्हणून निधी दिला नाही!भाजप सरकारच्या काळात आरोग्य विभागाला पुरेसा निधी का दिला नाही, असे विचारले असता माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, बिना पेट्रोलची गाडी चालते आहे असे आम्हाला वाटत होते, म्हणून निधी दिला गेला नाही, पण आता निधी द्यावाच लागेल.तरीही रुग्णसंख्या अधिक का?

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले,  आपण तपासण्या जास्त करत आहोत म्हणून रुग्णांची संख्या जास्त आहे. आपण एक रुग्ण आढळला तर त्याच्या संपर्कातील १० जणांची तपासणी करतो. त्यामुळेही संख्या जास्त आहे. मात्र बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे.महाराष्ट्रात सर्वात तपासण्या होत आहेत, ही चांगली बाब आहे. परंतु मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक का आहे, याचे उत्तर सरकारने द्यावे.- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेतेसर्व सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना लॅब कार्यरत आहेत. त्यासाठीची कोणतीही फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वैद्यकीय मंत्र्यांनी १० मिनिटांच्यावर स्वत:कडे ठेवली नाही. आयसीएमआरनेही गतीने परवानग्या दिल्या. - डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार