शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Coronavirus Live updates: कोरोनाचे ‘राज्य’! ब्राझीलमधील व्हेरिएंटही महाराष्ट्रात आढळला; मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 03:18 IST

जिनोम सिक्वेन्सिंग व महाराष्ट्रातील नमुने यांच्या विश्लेषणातून कोरोना विषाणूत म्युटेशन झाल्याचे आढळले आहे.

मुंबई/नवी दिल्ली : देशासह राज्यात झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र पुन्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर असून देशात सर्वाधिक सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत टॉप दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात ३१,८५५ नवे कोरोना रुग्ण आढळले असून, त्यात मुंबईतील ५,१८५ बाधितांचा समावेश आहे. राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात ४७ हजार २६२ लोकांना कोरोनाची बाधा झाली तर २७५ जणांचा मृत्यू झाला. ठाणे, पालघर, रायगडसह मुंबई महानगरात ९,१४७ रूग्ण आढळले. एकाच दिवसात एवढे रुग्ण आढळण्याचा हा नवीन वर्षातील नवा उच्चांक आहे. सलग १४व्या दिवशी बाधितांच्या संख्या वाढली आहे. 

देशात नव्या व्हेरिएंटचे ७७१ बाधितजिनोम सिक्वेन्सिंग व महाराष्ट्रातील नमुने यांच्या विश्लेषणातून कोरोना विषाणूत म्युटेशन झाल्याचे आढळले आहे. सुरुवातीच्या व्हेरिएंट्सपेक्षा हा म्युटेशन झालेला विषाणू वेगळा आहे. देशात कोरोना व्हेरिएंटच्या ७७१ प्रकरणांचा तपास लागला आहे. त्यात ब्रिटनच्या नव्या व्हेरिएंटचे ७३६ बाधित, द. आफ्रिकेच्या व्हेरिएंटचे ३४ आणि ब्राझील व्हेरिएंटचा १ अशा बाधितांचा समावेश आहे.

नांदेड, बीड जिल्ह्यात लॉकडाऊननांदेड जिल्ह्यात २५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत कडक लॉकडाऊन. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार या काळात बंद. किराणा दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी. बीड जिल्ह्यात २५ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपासून ४ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन. केवळ शासकीय कार्यालये व अत्यावश्यक सेवा सुरू. बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यास वा येण्यास कोरोना टेस्ट बंधनकारक.

परभणीत संपूर्ण संचारबंदीजिल्ह्यात बुधवारी सायंकाळीपासून १ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी.. अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. या काळात इतर सर्व व्यवहारांवर निर्बंध असतील.

मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेतराज्यात सगळीकडे कडक लॉकडाऊन लावण्याबाबतही मंत्रिमंडळात चर्चा झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नसेल या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले.

विषाणूच्या स्वरूपात बदल होणे ही एक सर्वसामान्य बाब आहे. कोरोनाला अटकाव करायचा असेल तर मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणे हे अत्यावश्यक आहे. मास्कचा वापर लसीकरणाएवढाच प्रभावी आहे. - व्ही. के. पॉल, नीती आयोगाचे सदस्य 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे