शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

Coronavirus Live updates: कोरोनाचे ‘राज्य’! ब्राझीलमधील व्हेरिएंटही महाराष्ट्रात आढळला; मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 03:18 IST

जिनोम सिक्वेन्सिंग व महाराष्ट्रातील नमुने यांच्या विश्लेषणातून कोरोना विषाणूत म्युटेशन झाल्याचे आढळले आहे.

मुंबई/नवी दिल्ली : देशासह राज्यात झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र पुन्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर असून देशात सर्वाधिक सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत टॉप दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात ३१,८५५ नवे कोरोना रुग्ण आढळले असून, त्यात मुंबईतील ५,१८५ बाधितांचा समावेश आहे. राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात ४७ हजार २६२ लोकांना कोरोनाची बाधा झाली तर २७५ जणांचा मृत्यू झाला. ठाणे, पालघर, रायगडसह मुंबई महानगरात ९,१४७ रूग्ण आढळले. एकाच दिवसात एवढे रुग्ण आढळण्याचा हा नवीन वर्षातील नवा उच्चांक आहे. सलग १४व्या दिवशी बाधितांच्या संख्या वाढली आहे. 

देशात नव्या व्हेरिएंटचे ७७१ बाधितजिनोम सिक्वेन्सिंग व महाराष्ट्रातील नमुने यांच्या विश्लेषणातून कोरोना विषाणूत म्युटेशन झाल्याचे आढळले आहे. सुरुवातीच्या व्हेरिएंट्सपेक्षा हा म्युटेशन झालेला विषाणू वेगळा आहे. देशात कोरोना व्हेरिएंटच्या ७७१ प्रकरणांचा तपास लागला आहे. त्यात ब्रिटनच्या नव्या व्हेरिएंटचे ७३६ बाधित, द. आफ्रिकेच्या व्हेरिएंटचे ३४ आणि ब्राझील व्हेरिएंटचा १ अशा बाधितांचा समावेश आहे.

नांदेड, बीड जिल्ह्यात लॉकडाऊननांदेड जिल्ह्यात २५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत कडक लॉकडाऊन. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार या काळात बंद. किराणा दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी. बीड जिल्ह्यात २५ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपासून ४ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन. केवळ शासकीय कार्यालये व अत्यावश्यक सेवा सुरू. बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यास वा येण्यास कोरोना टेस्ट बंधनकारक.

परभणीत संपूर्ण संचारबंदीजिल्ह्यात बुधवारी सायंकाळीपासून १ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी.. अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. या काळात इतर सर्व व्यवहारांवर निर्बंध असतील.

मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेतराज्यात सगळीकडे कडक लॉकडाऊन लावण्याबाबतही मंत्रिमंडळात चर्चा झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नसेल या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले.

विषाणूच्या स्वरूपात बदल होणे ही एक सर्वसामान्य बाब आहे. कोरोनाला अटकाव करायचा असेल तर मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणे हे अत्यावश्यक आहे. मास्कचा वापर लसीकरणाएवढाच प्रभावी आहे. - व्ही. के. पॉल, नीती आयोगाचे सदस्य 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे