शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

CoronaVirus : बाप्पा पावला! 'या' जिल्ह्यात पहिले दोन रुग्ण झाले कोरोनामुक्त; टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 16:53 IST

या दोघांनाही सरनोबतवाडी येथील अथायू रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये पुण्याहून आलेला पहिला कोरोना रुग्ण आणि त्याच्यामुळे संसर्ग झालेली त्याची बहीण अशा दोघांचेही कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले. अशा दोघांना आज येथील अथायू रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि तुळशीचे रोप देऊन घरी सोडण्यात आले.कोल्हापुरातील भक्तिपूजानगरमध्ये पुण्याहून आलेल्या तरुणाला 26 मार्च रोजी कोरोना झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्याच्या बहिणीचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या दोघांनाही सरनोबतवाडी येथील अथायू रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या ठिकाणी अथायू रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश पुराणिक, नर्सिंगच्या अधीक्षक शीतल राणे, उप व्यवस्थापक राहुल खोत, कॅज्युलिटी इन्चार्ज विजय महापुरे हे या दोघांवर उपचार करत होते. आवश्यक ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे, काही पूरक जीवनसत्त्वे, जोडीला समुपदेशन आणि आयुर्वेदिकतेचीही पद्धती या 23 दिवसांत उपचारात वापरण्यात आल्याची माहिती डॉ. पुराणिक यांनी दिली. मुख्य रुग्णालयापासून बाजूला असणाऱ्या इमारतीत कोव्हिड -19चा विलगीकरण कक्ष करण्यात आलेला होता. यामध्ये जीवनरक्षक यंत्रणेसह सर्व आपत्कालीन सुविधा तैनात ठेवण्यात आली होती. 14 दिवसांनंतर या दोघांचेही दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले. आज कोव्हिड-19 या विलगीकरण कक्षापासून दोन्ही बाजूला रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दोन्ही बाजूला फुगे लावण्यात आले होते. रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात या दोघांना निरोप दिला. रुग्णालयाच्या लॉबीत असणाऱ्या श्रीगणेशाची त्या दोघांनी आरती करून दर्शन घेतले. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर  फुगे फोडून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या दोघांनाही तुळशीचे रोप आणि मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा आरोग्‍य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, रुग्णालयाचे अध्यक्ष अनंत सरनाईक उपस्थित होते.जिल्हा प्रशासनाकडून अथायू रुग्णालयाचे आभार- डॉ. कलशेट्टीजिल्ह्यामध्ये सापडलेल्या पहिल्या कोरोनाबाधित आणि त्याच्यामुळे संसर्ग झालेल्या अशा दोन्ही रुग्णांवर अथायू रुग्णालयाने गेल्या 23 दिवसांत अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार केले. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग यांच्या बरोबरीने अथायू रुग्णालयाने कोरोना विरुद्धच्या या लढाईत सहभाग घेतला, असे सांगून महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या रुग्णालयाच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आभार मानले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या