शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

Coronavirus : मृत्यूच्या दहशतीने दिला चार दशकांपूर्वीच्या घटनेला उजाळा, काेराेनाच्या निमित्ताने अनेकांनी जागविली ‘स्कायलॅब’ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 20:30 IST

Skylab memories : कोरोना व्हायरसची दुसरी लाट आपल्या देशात पाेहाेचली आहे. या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे शहरांपासून तर गावखेड्यापर्यंत कोरोनाची भीती वाढली आहे.

- अरविंद घुटकेगडचिरोली - सव्वा वर्षभरापूर्वी चीनमधून जगभरात पसरलेल्या काेराेना विषाणूमुळे संपूर्ण जग दहशतीत आहे. या व्हायरसची दुसरी लाट आपल्या देशात पाेहाेचली आहे. या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे शहरांपासून तर गावखेड्यापर्यंत कोरोनाची भीती वाढली आहे. यापूर्वीही साथी आल्या नि गेल्या, परंतु या कोरोनाने जी दहशत निर्माण केली त्यानिमित्ताने ४१ वर्षांपूर्वीच्या ‘स्कायलॅब’ या उपग्रह कोसळण्याच्या दहशतीची आठवण ज्येष्ठांमध्ये ताजी झाली आहे.   (memories of Skylab)अमेरिकेचा मानव निर्मित उपग्रह ‘स्कायलॅब’ पृथ्वीवर आणि तोही भारतातच कोसळणार अशा वावटळी ४० वर्षांपूर्वी उठल्या होत्या. हा उपग्रह कोसळल्यानंतर त्यातील रसायनांचा मोठा स्फोट होऊन निघणाऱ्या विषारी धुराने अनेक शहरे व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडणार, अशी भीती सर्वत्र पसरली होती.१९७९-८० च्या काळात आजच्यासारखा इलेक्ट्राॅनिक किंवा सोशल मीडिया नसतानाही ती बातमी वाऱ्यासारखी गावागावात पोहाेचली होती. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात मृत्युछाया गडद झाली.खिशाला कात्री लावून जीवन जगणारी मंडळी देखील आपापला खिसा सढळ हाताने रिकामा करीत होते. कोणी घरातल्या घरात विविध मिष्टान्नावर ताव मारत तर कोणी आता जायचंच आहे, असे समजून दानातून पुण्य कमविण्याचा प्रयत्न करीत होते. सर्वधर्मीय स्थळांवर विविध पूजा-अर्चा, यज्ञ सुरू होते. आता मरण अटळ आहे, असे समजून अनेक जण मनातील इच्छा-आकांक्षांना वाट मोकळी करून देत होते. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येत होते. तर काही ठिकाणी मृत्यूच्या भीतीने स्मशानशांतता होती. ज्यांच्याकडे रेडिओ होत्या. त्यांच्याकडे बातम्या ऐकणाऱ्यांची गर्दी असायची. खेड्यापाड्यात तर चौकाचौकात रेडिओवरील बातम्यांकरिता गर्दी असायची.

विषारी वायू आणि स्फोटातून जिवंत राहता यावे म्हणून काहींनी जमिनीत भुयार केले होते. किमान आपल्या पाल्यांना तरी जीवन जगता यावे म्हणून भुयाररुपी संदुकात ठेवून त्या संदुकावर लाकडी पाट्या ठेवून वरून मातीचे लेपणही ठेवल्याच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, देशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला हाेता. जागोजागी पोलीस व सैन्यांचे ताफे दिसत होते. परंतु अखेर अथक परिश्रम घेऊन तत्कालीन शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात तो स्कायलॅब पाडला. या घटनेने देशावरील संकट टळले हाेते. देशात जल्लोष करण्यात आला. कोरोनाचे संकट देखील टाळण्यासाठी जोमाने प्रयत्न सुरू आहेत. परंतु हे संसर्गाचे संकट पूर्णपणे केव्हा ओसरेल हे सांगणे कठीण आहे. असा होता स्कायलॅबस्कायलॅब हा उपग्रह अमेरिकेने १४ मे १९७३ रोजी अंतराळात सोडला होता. सतत पाच वर्षे सुरळीत कार्य केल्यानंतर नासाच्या रिपोर्टनुसार १९७८- ७९ मध्ये अंतराळात सौर उर्जेचे भयानक वादळ उठले. त्यात स्कायलॅबचे संपूर्ण पॅनल जळून खाक झाले होते. म्हणून हळूहळू त्यातील इंजिनने काम करणे बंद केले. त्यामुळे तो पृथ्वीकडे सरकत होता. हा उपग्रह भारतावरच पडू शकतो, असा अंदाज शास्त्रज्ञांनी बांधला होता. त्याची लांबी ८२.४ फूट व रुंदी ५८.८ फूट तर उंची ३६.३ फूट आणि वजन ७ हजार ७०० क्विंटल हाेते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGadchiroliगडचिरोलीhistoryइतिहास