शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : मृत्यूच्या दहशतीने दिला चार दशकांपूर्वीच्या घटनेला उजाळा, काेराेनाच्या निमित्ताने अनेकांनी जागविली ‘स्कायलॅब’ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 20:30 IST

Skylab memories : कोरोना व्हायरसची दुसरी लाट आपल्या देशात पाेहाेचली आहे. या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे शहरांपासून तर गावखेड्यापर्यंत कोरोनाची भीती वाढली आहे.

- अरविंद घुटकेगडचिरोली - सव्वा वर्षभरापूर्वी चीनमधून जगभरात पसरलेल्या काेराेना विषाणूमुळे संपूर्ण जग दहशतीत आहे. या व्हायरसची दुसरी लाट आपल्या देशात पाेहाेचली आहे. या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे शहरांपासून तर गावखेड्यापर्यंत कोरोनाची भीती वाढली आहे. यापूर्वीही साथी आल्या नि गेल्या, परंतु या कोरोनाने जी दहशत निर्माण केली त्यानिमित्ताने ४१ वर्षांपूर्वीच्या ‘स्कायलॅब’ या उपग्रह कोसळण्याच्या दहशतीची आठवण ज्येष्ठांमध्ये ताजी झाली आहे.   (memories of Skylab)अमेरिकेचा मानव निर्मित उपग्रह ‘स्कायलॅब’ पृथ्वीवर आणि तोही भारतातच कोसळणार अशा वावटळी ४० वर्षांपूर्वी उठल्या होत्या. हा उपग्रह कोसळल्यानंतर त्यातील रसायनांचा मोठा स्फोट होऊन निघणाऱ्या विषारी धुराने अनेक शहरे व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडणार, अशी भीती सर्वत्र पसरली होती.१९७९-८० च्या काळात आजच्यासारखा इलेक्ट्राॅनिक किंवा सोशल मीडिया नसतानाही ती बातमी वाऱ्यासारखी गावागावात पोहाेचली होती. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात मृत्युछाया गडद झाली.खिशाला कात्री लावून जीवन जगणारी मंडळी देखील आपापला खिसा सढळ हाताने रिकामा करीत होते. कोणी घरातल्या घरात विविध मिष्टान्नावर ताव मारत तर कोणी आता जायचंच आहे, असे समजून दानातून पुण्य कमविण्याचा प्रयत्न करीत होते. सर्वधर्मीय स्थळांवर विविध पूजा-अर्चा, यज्ञ सुरू होते. आता मरण अटळ आहे, असे समजून अनेक जण मनातील इच्छा-आकांक्षांना वाट मोकळी करून देत होते. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येत होते. तर काही ठिकाणी मृत्यूच्या भीतीने स्मशानशांतता होती. ज्यांच्याकडे रेडिओ होत्या. त्यांच्याकडे बातम्या ऐकणाऱ्यांची गर्दी असायची. खेड्यापाड्यात तर चौकाचौकात रेडिओवरील बातम्यांकरिता गर्दी असायची.

विषारी वायू आणि स्फोटातून जिवंत राहता यावे म्हणून काहींनी जमिनीत भुयार केले होते. किमान आपल्या पाल्यांना तरी जीवन जगता यावे म्हणून भुयाररुपी संदुकात ठेवून त्या संदुकावर लाकडी पाट्या ठेवून वरून मातीचे लेपणही ठेवल्याच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, देशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला हाेता. जागोजागी पोलीस व सैन्यांचे ताफे दिसत होते. परंतु अखेर अथक परिश्रम घेऊन तत्कालीन शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात तो स्कायलॅब पाडला. या घटनेने देशावरील संकट टळले हाेते. देशात जल्लोष करण्यात आला. कोरोनाचे संकट देखील टाळण्यासाठी जोमाने प्रयत्न सुरू आहेत. परंतु हे संसर्गाचे संकट पूर्णपणे केव्हा ओसरेल हे सांगणे कठीण आहे. असा होता स्कायलॅबस्कायलॅब हा उपग्रह अमेरिकेने १४ मे १९७३ रोजी अंतराळात सोडला होता. सतत पाच वर्षे सुरळीत कार्य केल्यानंतर नासाच्या रिपोर्टनुसार १९७८- ७९ मध्ये अंतराळात सौर उर्जेचे भयानक वादळ उठले. त्यात स्कायलॅबचे संपूर्ण पॅनल जळून खाक झाले होते. म्हणून हळूहळू त्यातील इंजिनने काम करणे बंद केले. त्यामुळे तो पृथ्वीकडे सरकत होता. हा उपग्रह भारतावरच पडू शकतो, असा अंदाज शास्त्रज्ञांनी बांधला होता. त्याची लांबी ८२.४ फूट व रुंदी ५८.८ फूट तर उंची ३६.३ फूट आणि वजन ७ हजार ७०० क्विंटल हाेते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGadchiroliगडचिरोलीhistoryइतिहास