शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: "एकदाचं दार उघडलं; आता दुसरी काही लफडी करू नका"; निर्बंध हटवण्यावर डॉ. रवी गोडसेंची मार्मिक टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 21:50 IST

अलीकडेच डॉ. रवी गोडसेंनी भारतात कोरोनाची चौथी लाट येणार नाही असं विधान केले होते.

मुंबई – मागील २ वर्षापासून जगभरात कोरोना महामारीमुळे लोकं दहशतीच्या सावटाखाली जगत होती. लॉकडाऊन आणि निर्बंधामुळे लोकांचे जगणं कठीण झाले. या महामारीमुळे लाखो लोकांचा जीव गेला. परंतु लसीकरणामुळे सर्व देशात नवी आशा निर्माण झाली. हळूहळू कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येऊ लागली. भारतातही कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे २ वर्षापासून लावलेले निर्बंध हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रातही येत्या गुढी पाडव्यापासून म्हणजे २ एप्रिलपासून राज्यात लावलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. आता मास्क घालण्याचीही सक्ती नाही असं स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यावर कोरोना विश्लेषक डॉक्टर रवी गोडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

डॉ. रवी गोडसे(Dr Ravi Godse) म्हणतात की, चिऊ ताई, चिऊ ताईनं दार उघड, शेवटी एकदाच दार उघडलं. उशीरा का होईना दार उघडलं आहे. शाब्बास, लसीकरणाच्या कामाला चांगलं सहकार्य केले. आता चिऊताईंच्या वेगवेगळ्या समित्या आणि कमिट्या आहेत त्यांना चिमुकली विनंती आहे. आपली चिमणी बुद्धीपणाला लावून दुसरी काही लफडी करू नका. दार उघडलंय ते सतत कायम ठेवा. उडून उडून जावा. दाणे टिपायला नवीन अंगण घ्यावं अशी मार्मिक टीप्पणी रवी गोडसेंनी केली आहे.

अलीकडेच डॉ. रवी गोडसेंनी भारतात कोरोनाची चौथी लाट येणार नाही असं विधान केले होते. ते म्हणाले होते की, भारतातील कम्युनिटी ट्रान्समिशनचं प्रमाण पाहता भारतात आता मास्क वापरण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, असं माझं वैद्यकीय वैयक्तिक मत आहे. हे मी हजारो रुग्णांवर केलेले उपचार आणि अनुभवातून सांगत आहे. अमेरिकेतील सर्व राज्यांनी आता मास्कची अनिवार्यता संपुष्टात आणली आहे. इटलीने टास्क फोर्सला सुट्टी दिली आहे. आता कोरोनासोबतच राहायचं आहे, याची जाणीव लोकांना झाली आहे. ओमायक्रॉनमुळे हॉस्पिटलमध्ये जाव्या लागलेल्या आणि तिथे ऑक्सिजनची गरज भासलेल्या किती लोकांना तुम्ही वैयक्तिकरीत्या ओळखता, याचा आढावा घेतला तर प्रत्येक माणसाला स्वत:चं उत्तर मिळेल असं त्यांनी सांगितले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं लोकांना आवाहन

गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असं आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDr Ravi Godseडॉ. रवी गोडसे