शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

CoronaVirus News: राज्यातल्या जनतेसाठी पुढे या; कोरोनातून बऱ्या झालेल्या हजारो जणांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 14:31 IST

मुख्यमंत्र्यांचा राज्यातल्या जनतेशी संवाद; लॉकडाऊन उठणार नसल्याचे स्पष्ट संकेत

मुंबई: राज्य सरकार कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून जगात सुरू असलेल्या अत्याधुनिक पद्धतींचा वापर केला जात असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मिशन बिगनची सुरुवात केली आहे. मात्र शक्य असल्यास घरीच राहण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. 30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.कोरोना संकटाचा सामना करताना अनेक नवनव्या औषधांची नावं पुढे येत आहेत. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, रेमडेसिवीर अशा औषधांचा वापर जगभरात होत आहे. यामध्ये महाराष्ट्र कुठेही मागे नाही. कोरोना रुग्णांसाठी सध्या जगभरात प्लाज्मा पद्धती वापरण्यात येत आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाज्माच्या मदतीनं ९० टक्के कोरोना रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी पुढे यावं आणि प्लाज्मा दान करावा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. https://www.facebook.com/lokmat/videos/2537623293123603/कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जगभरात प्लाज्मा उपचार पद्धतीचा वापर होत आहे. राज्यातही सध्या या पद्धतीचा अतिशय व्यापकपणे वापर सुरू आहे. कदाचित महाराष्ट्र प्लाज्मा पद्धतीचा सर्वाधिक वापर करणारं राज्य ठरेल. मात्र यासाठी कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाज्मा दान करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी रक्तदानाच्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादाचा उल्लेख केला. कोरोना संकट येताच सुरुवातीला मी रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला राज्यातल्या जनतेनं मोठा प्रतिसाद दिला. रक्ताचा तुटवडा दूर झाला. त्याचप्रकारे प्लाज्मा दान करण्याच्या आवाहनालाही प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे