शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
2
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
3
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
4
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
5
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
6
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
7
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
8
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
9
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
10
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
11
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
12
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
13
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
14
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
15
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
16
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
17
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
18
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
19
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
20
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...

coronavirus: ...अन् देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र आणलं!

By अतुल कुलकर्णी | Updated: May 28, 2020 08:03 IST

देवेंद्र फडणवीस यांची टीका आणि काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी केलेल्या विधानानंतर सत्ताधारी पक्षात एकवाक्यता नाही असे चित्र तयार झाले. त्यामुळे तीन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत बुधवारी ‘हम साथ साथ है’ हे दाखवून दिले.

ठळक मुद्दे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कोरोनाच्या काळात पहिल्यांदा एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन आम्ही एकत्र आहोत, असे दाखवून दिले कोरोनाच्या काळात सत्ताधारी पक्षाचे मंत्री रोज एकमेकांशी बोलत होते, व्हिडीओ कॉन्फरसींगच्या सहाय्याने बैठका घेत होते. माध्यमांना फक्त एकटे मुख्यमंत्री बोलत होते. पण मंत्र्यांमध्ये कुठेतरी कटूता येत होती. याआधी देखील फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र शपथ घेतली व सरकार स्थापन केले त्यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार चिडून एकत्र आल्याचे राज्याने पाहिले होते

- अतुल कुलकर्णी  मुंबई - विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारने राज्याला किती रुपयांची मदत केली याची आकडेवारी सांगत राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आणि विखुरलेले महाविकास आघाडीचे नेते एकत्र आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कोरोनाच्या काळात पहिल्यांदा एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन आम्ही एकत्र आहोत, असे दाखवून दिले.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांच्या मतदारसंघात इस्लामपूरला होते. मात्र त्यांना पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मुंबईत बोलावून घेतले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महूसल मंत्री बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री अनिल परब मुंबईत होते. शरद पवार राज्यपालांना भेटून आल्यानंतरच तीन्ही पक्षांनी एकत्रपणे जनतेसमोर गेले पाहिजे अशी चर्चा झालीच होती. शिवाय प्रशासनाने देखील माध्यमांना माहिती दिली पाहिजे असे पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसारच मुख्य सचिव अजोय मेहता व अन्य अधिकाऱ्यांनी एकत्रपणे मंगळवारी पत्रकारपरिषद घेण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एकत्रित समन्वय समितीची बैठक घ्यायची असेही ठरले होते. त्यावेळी फडणवीस यांची पत्रकार परिषद जाहीर झालेली नव्हती. मात्र ती झाली आणि पडद्याआड राजकीय हालचालींना वेग आला. बुधवारी समन्वय समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्याचे ठरले. त्यानुसार ती झाली.दरम्यान, अनिल परब यांनी एकट्याने त्यांची पत्रकार परिषद घेण्याचे आधीच जाहीर केले होते. पण त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही गेले पाहिजे व मंगळवारी राज्यभर जे चित्र निर्माण केले गेले त्याला छेद दिला पाहिजे असे ठरवण्यात आले. या संयुक्त पत्रकारपरिषदेत काय सांगायचे याचीही चर्चा सकाळी झालेल्या बैठकीत झाली. त्यानुसार अधिकाऱ्यांना सगळी माहिती गोळा करण्यासाठी सांगण्यात आले आणि तीन्ही नेत्यांनी एकत्रीतपणे पत्रकार परिषद घेतली. कोरोनाच्या काळात सत्ताधारी पक्षाचे मंत्री रोज एकमेकांशी बोलत होते, व्हिडीओ कॉन्फरसींगच्या सहाय्याने बैठका घेत होते. माध्यमांना फक्त एकटे मुख्यमंत्री बोलत होते. पण मंत्र्यांमध्ये कुठेतरी कटूता येत होती. निर्णय प्रक्रीयेत आपल्याला सहभागी केले जात नाही असा सूर उमटत होता. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयी तक्रारी होत्या. त्यावरही शरद पवार, उध्दव ठाकरे आणि खा. संजय राऊत यांच्या बैठकीत निर्णय झाले होते.पण मंगळवारी फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली, तिकडे दिल्लीत काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी केलेल्या विधानानंतर सत्ताधारी पक्षात एकवाक्यता नाही असे चित्र तयार झाले. त्यामुळे तीन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत बुधवारी ‘हम साथ साथ है’ हे दाखवून दिले. याआधी देखील फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र शपथ घेतली व सरकार स्थापन केले त्यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार चिडून एकत्र आल्याचे राज्याने पाहिले होते. त्याचीच छोटी पुनरावृत्ती बुधवारी घडली. यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये मधल्या दोन महिन्यात काय झाले हे विसरुन सगळे एकत्र आले. भाजपला आम्ही जेवढा काळ सत्तेपासून दूर ठेवू तेवढी त्यांच्यातील अस्वस्थता वाढेल आणि त्यातून कोरोना नंतर जे काही घडले ते सगळा महाराष्ट्र पाहिल, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने दिली ती पुरेशी बोलकी आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण