शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

Coronavirus: सहव्याधीमुळे राज्यात पुरुष ठरले कोरोनाचे सर्वाधिक बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 09:07 IST

Coronavirus In Maharashtra: गेल्या अडीच वर्षात (१२ जून २०२२ पर्यंत) राज्यात १ लाख ४७ हजार ८६८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यापैकी  १ लाख ४५ हजार ९९९ कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या कारणांचे परीक्षण राज्य कोविड मृत्यू विश्लेषण समितीने केले आहे.

 मुंबई : गेल्या अडीच वर्षात (१२ जून २०२२ पर्यंत) राज्यात १ लाख ४७ हजार ८६८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यापैकी  १ लाख ४५ हजार ९९९ कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या कारणांचे परीक्षण राज्य कोविड मृत्यू विश्लेषण समितीने केले आहे. त्या समितीच्या अहवालात  पुरुषांचे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असून ते ९६ हजार ७५९ इतके आहे, तर महिलांचा मृत्यूचा आकडा ४९ हजार २४० इतका आहे.

या अहवालात मृत्यूचे प्रमुख कारण सहव्याधी, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे, वयोवृद्ध नागरिक अशी आढळून आलेली आहेत. जून महिन्यात १८ दिवसांत संपूर्ण राज्यात कोरोनामुळे २६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा काळ सुरू झाल्यापासून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने कोरोनामुळे होणाऱ्या प्रत्येक मृत्यूची नोंद ठेवली आहे. तसेच हे मृत्यू नेमके कशामुळे झाले आहे, त्यामागची कारणे शोधण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली होती.  त्यांच्याकडे राज्य कोविड मृत्यू विश्लेषण अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. 

काय आहेत कारणे?पुरुषांमध्ये सहव्याधीचे प्रमाण अधिककाही प्रमाणात व्यसनाधीनतामहिलांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा अधिक

कोरोना काळात पुरुष अधिक काळ बाहेरराज्य कोविड मृत्यू विश्लेषण समिती व एमएमआर विभागाचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे म्हणाले, आमची डॉक्टरांची समिती या अहवालासाठी काम करत असते. यामध्ये प्रामुख्याने दिसून आलेले निरीक्षण म्हणजे कोरोना बाधितांमध्ये पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण महिलांच्या मृत्यूच्या तुलनेत अधिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महिलांच्या तुलनेत पुरुष कोरोना काळात अधिक बाहेर असल्याने त्यांना संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला होता. 

३८८३ रुग्णांचे राज्यात शनिवारी नवीन निदान झाले असून, दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये दोन मृत्यू मुंबईमध्ये झाले.

४९००० महिलांनीही गमावला जीव

७७,६१,०३२ कोरोनाबाधित रुग्ण राज्यात आतापर्यंत बरे होऊन घरी गेले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू