शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

Coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढतोय, वारीचं काय होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 21:28 IST

Ashadhi Wari 2022: अचानक कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आता वारीबाबत राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे वारकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. त्यादरम्यान, आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वारीबाबत मोठी घोषणा केली आहे.

मुंबई - गेल्या काही दिवसांमध्ये अचानक राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह राज्य सरकारही अलर्ट झाले आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने यावर्षी पंढरपूरची आषाढी वारी कुठल्याही निर्बंधांविना होणार, अशी घोषणा झाली होती. मात्र अचानक कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आता वारीबाबत राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे वारकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. त्यादरम्यान, आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वारीबाबत मोठी घोषणा केली आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी सध्याच्या घडीला पंढरपूरची आषाढी वारी ही कुठल्याही निर्बंधांविना आणि अडचणींविना होईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. ते म्हणाले की, मला असं वाटतं की. सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे असं सांगितलंय. पण के सगळं करत असताना दिंडीमध्ये १०-१५ लाख लोक जमणार आहेत. या परिस्थितीत आता काळजी घेऊन दिंडी पूर्ण करावी, अशी प्राथमिक चर्चा झाली आहे, असे त्यांनी सांगितले. 

वारीवर काही बंधनं नसतील का असं विचारलं असता राजेश टोपे यांनी सांगितले की, आता वारीवर काही बंधनं असावीत का अशी चर्चा झाली. मात्र वारीबाबतची तयारी खूप पुढे गेलेली आहे आहे. की त्याबाबत चर्चा जरूर झाली की एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमल्यास कसं होईल. मात्र आपण खूप पुढे गेलोय. त्यामागे लोकांच्या भावनाही आहेत. त्यामुळे वारी होईल. त्यावर कुठलीही बंधने अडचण येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्यात मुंबई, ठाणे, पालघर अशा काही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढत असून, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर टेस्टिंग वाढवण्याची सूचना देण्यात आली आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपेAshadhi Ekadashiआषाढी एकादशी