शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढतोय, वारीचं काय होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 21:28 IST

Ashadhi Wari 2022: अचानक कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आता वारीबाबत राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे वारकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. त्यादरम्यान, आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वारीबाबत मोठी घोषणा केली आहे.

मुंबई - गेल्या काही दिवसांमध्ये अचानक राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह राज्य सरकारही अलर्ट झाले आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने यावर्षी पंढरपूरची आषाढी वारी कुठल्याही निर्बंधांविना होणार, अशी घोषणा झाली होती. मात्र अचानक कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आता वारीबाबत राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे वारकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. त्यादरम्यान, आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वारीबाबत मोठी घोषणा केली आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी सध्याच्या घडीला पंढरपूरची आषाढी वारी ही कुठल्याही निर्बंधांविना आणि अडचणींविना होईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. ते म्हणाले की, मला असं वाटतं की. सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे असं सांगितलंय. पण के सगळं करत असताना दिंडीमध्ये १०-१५ लाख लोक जमणार आहेत. या परिस्थितीत आता काळजी घेऊन दिंडी पूर्ण करावी, अशी प्राथमिक चर्चा झाली आहे, असे त्यांनी सांगितले. 

वारीवर काही बंधनं नसतील का असं विचारलं असता राजेश टोपे यांनी सांगितले की, आता वारीवर काही बंधनं असावीत का अशी चर्चा झाली. मात्र वारीबाबतची तयारी खूप पुढे गेलेली आहे आहे. की त्याबाबत चर्चा जरूर झाली की एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमल्यास कसं होईल. मात्र आपण खूप पुढे गेलोय. त्यामागे लोकांच्या भावनाही आहेत. त्यामुळे वारी होईल. त्यावर कुठलीही बंधने अडचण येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्यात मुंबई, ठाणे, पालघर अशा काही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढत असून, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर टेस्टिंग वाढवण्याची सूचना देण्यात आली आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपेAshadhi Ekadashiआषाढी एकादशी