शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Coronavirus: संकटकाळात ८८ लाख महिला, बालकांची दोन महिने सोय; महिला व बालविकास विभागाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 02:52 IST

अंगणवाड्यांमधील बालकांना या वस्तूंव्यतिरिक्त तांदूळदेखील दिला जात आहे.

यदु जोशी

मुंबई : राज्यातील तब्बल ८८ लाख शहरी आणि ग्रामीण मुले व गर्भवती तसेच स्तनदा मातांना दोन महिने पुरेल इतक्या खाण्यासाठीच्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत महिला व बालविकास विभागाने कोरोनाच्या संकटकाळात धावून जाण्याचे काम केले आहे.सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतची बालके, गर्भवती व स्तनदा माता तसेच अतिकुपोषित बालके अशा ५० लाख, तर अंगणवाड्यांमधील तीन वर्षे ते सहा वर्षे वयाच्या ३८ लाख बालकांना हा पुरवठा केला जात आहे. त्यात हरभरा डाळ, तेल, हळद, मिरची, मीठ आणि गहू यांचा समावेश आहे.

अंगणवाड्यांमधील बालकांना या वस्तूंव्यतिरिक्त तांदूळदेखील दिला जात आहे. सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना एका जेवणात ५०० कॅलरी व १२ प्रोटीन दर किलोमागे द्यावेत, तर महिलांना ६०० कॅलरी आणि १८ ते २० प्रोटीन दर किलोमागे द्यावेत, असे निकष आहेत. दोन महिने पुरतील एवढ्या वस्तू एका किटमध्ये दिल्या जात असून पुरवठादार प्रत्येक अंगणवाडीमध्ये हे किट पोहोचवतात आणि तेथून महिला व इतर कुटुंबीयांना त्या दिल्या जातात. केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून हे काम केले जाते. सूत्रांनी सांगितले की, पुरवठादारांना तब्बल ४०० कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत. त्यात महिला बचत गटांच्या माध्यमातून काम करणाऱ्या पुरवठादारांचा समावेश आहे.

लॉकडाउनचा काळ आणि त्यातही कमी दिवस हाती असताना आमच्या यंत्रणेने प्रचंड नियोजन करून ८८ लाख माता-बालकांपर्यंत पोहोचण्याचा विडा उचलला. पुरवठा प्रक्रियेचे मॉनिटरिंग नियमित केले जात आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मी विशेष आभार मानते. - यशोमती ठाकूर, मंत्री, महिला व बालविकासपोषण आहार घरपोचसहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना आधीपासूनच घरपोच पुरवठा केला जात होता. मात्र, आता त्यात ३ वर्षे ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचाही समावेश करण्यात आला आहे. ही बालके अंगणवाड्यांमध्ये यायची आणि त्यांना शिजवलेले अन्न पुरवण्यात यायचे. मात्र, लॉकडाउनच्या काळात अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे त्यांनाही महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत पूरक पोषण आहार थेट घरापर्यंत पोहोचविला जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwomen and child developmentमहिला आणि बालविकास