शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ठाकरे सरकारनं लपवली आकडेवारी?; कोरोना मृतांची संख्या अचानक १३२८ नं वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 06:50 IST

कोरोना मृत्यूची आकडेवारी लपवली जात असल्याचा आपण केलेला आरोप खरा ठरला; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई : राज्यात कोरोनाने १५ जूनपर्यंत ४१२८ मृत्यू झालेले असताना राज्य सरकारने मंगळवारी केलेल्या स्पष्टीकरणानंतर प्रत्यक्षात आणखी १३२८ मृत्यू झाले असल्याचे समोर आले. त्यामुळे कालपर्यंत मृतांचा आकडा ५४५६ झाला आहे. त्यानंतर, कोरोना मृत्यूची आकडेवारी लपवली जात असल्याचा आपण केलेला आरोप खरा ठरला आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितले की, राज्य सरकारने फेरतपासणी केली असता मुंबई महापालिका क्षेत्रात आणखी ८६२ मृत्यू, तर राज्यात आणखी ४६६ मृत्यू आढळले. या सर्व प्रकरणांत मृत्युसमयी कोविड अहवाल पॉझिटीव्ह आला होता व या सर्व प्रकरणांची नोंद डेथ इन कोविड पॉझिटीव्ह म्हणून घेण्यात आली आहे.कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नोंदी कमी संख्येने दाखविण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येत असताना मेहता यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर तसेच नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या (एनसीडीसी) मार्गदर्शक तत्वांनुसार कोरोनाबधित मृत्यू प्रकरणांची तपासणी करणे बंधनकारक आहे, या आधारे तसेच राज्य सरकारने निर्देशित केल्याप्रमाणे मार्चपासूनची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार नवीन आकडेवारी आली आहे. आकडेवारीत वाढ दिसली तरी हेतूबाबत शंका घेण्याचे कारण असू नये.फेरतपासणीमध्ये राज्यात पुढीलप्रमाणे आणखी मृत्यूसंख्या आढळली. अहमदनगर १, अकोला १४, अमरावती ६, औरंगाबाद ३३, बुलढाणा २, धुळे १२, जळगाव ३४, जालना ४, लातूर ३, नांदेड २, नाशिक २८, उस्मानाबाद ३, पालघर ११, परभणी १, पुणे ८५, रायगड १४, रत्नागिरी १, सांगली ४, सातारा ६, सिंधुदूर्ग ३, सोलापूर ५१, ठाणे १४६, वाशिम १, यवतमाळ १ अशी एकूण ४६६.अखेर सत्य पुढे आलेचकोरोना मृत्यूचा आकडा लपविला जात आहे असा आरोप आपण केला होता. सरकारने आज खरी आकडेवारी दिली; मात्र आतापर्यंत खरी आकडेवारी लपविणाऱ्यांवर काय कारवाई करणार असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गेल्या तीन महिन्यांपासून काही कोरोनामृत्यू होऊन सुद्धा ते प्रत्यक्ष आकडेवारीत दाखविले जात नसल्याबद्दल तक्रार केली होती. आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना बळी कसे नोंदवायचे, याचे स्पष्ट दिशानिर्देश दिले असल्याने ही कार्यकक्षा डेथ आॅडिट कमिटीची कशी काय होऊ शकते? ही समिती मृत्यूसंख्या कमी करण्यासाठी आहे की, मृत्यूसंख्या दडपण्यासाठी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.राज्यात ८१ मृत्यूराज्यात मंगळवारी ८१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर दोन हजार ७०१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले.दिवसभरात एक हजार ८०२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले.राज्यात आजपर्यंत एकूण ५७ हजार ८५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.राज्यात ५० हजार ४४ रूग्णांवर उपचार सुरू असल्याने आजवरच्या रूग्णांची एकूण संख्या एक लाख १३ हजार ४४५ वर पोहोचली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस