शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

Coronavirus: 'मशाली' पेटवून कोरोनाला हरवणार, सदाभाऊ खोत वेगळे 'दिवे' लावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 14:50 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर देशभरात दिवे लावण्याच्या संकल्पनेवरुन वाद-विवाद आणि चर्चा सुरू झाली. अनेकांनी यास विरोध केला असून भाजपा नेते जोरदारपणे याचं समर्थन करत आहेत.

मुंबई - वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून ३६०० वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील ९९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाला पराभूत करण्यासाठी आणि देशातील सामुदायिक सामर्थ्य दाखविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी नागरिकांना रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी आपल्या घरात, बाल्कनीत, दारासमोर मेणबत्ती, दिवे, टॉर्च अथवा मोबाईलचे फ्लॅशलाईट लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अनेकजण याचा उत्सवच बनवू इच्छिताना दिसत आहे. माजी मंत्री आणि रयत शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी तर मशाली पेटवणार असल्याचे म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर देशभरात दिवे लावण्याच्या संकल्पनेवरुन वाद-विवाद आणि चर्चा सुरू झाली. अनेकांनी यास विरोध केला असून भाजपा नेते जोरदारपणे याचं समर्थन करत आहेत. ऊर्जीमंत्री नितीन राऊत यांनी अचानक लाईट गेल्यास पॉवर ग्रीडींचा धोका असल्याचं सांगितलंय. मात्र, केवळ मोदींनी सांगितलंय म्हणून हा विरोध होत असल्याचं प्रत्युत्तरादाखल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे सर्वांनीच दिवे लावावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले आहे. तर, सदाभाऊ खोत यांनी तर आम्ही मशालीच पेटवणार असल्याचं म्हटलंय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला आदेश आम्ही पाळणार असून संघटनेच्या कार्यकर्त्यांना मशाली पेटवण्याचे आवाहन खोत यांनी केलंय. तसेच, मशाली पेटवून आम्ही कोरोनाला हरवणार, असेही ते म्हणाले. त्यानुसार, रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते आज रात्री आपापल्या घरी चक्क मशाली पेटवणार आहेत.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई