शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

राज्यात बूस्टर डोस मोहीम थंडावली; आतापर्यंत ३८ लाख नागरिकांनी घेतला लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 07:15 IST

कोरोनाची भीती गेल्याने बूस्टर डोस मोहीम थंडावली आहे. परंतु, कोरोना संसर्गाची तीव्रता सौम्य होण्याच्या दृष्टीने लसीकरण पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई : राज्यात कोरोनाच्या संसर्गानंतर आता परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आली आहे. त्यामुळे कोरोनाचे भय कमी झाले असल्याने राज्यात कोरोना बूस्टर डोस मोहीम ही थंडावली आहे. राज्यात एकूण नऊ कोटीहून अधिक लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला आहे, तर ७ कोटी ४८ लाख लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात आतापर्यंत ३८ लाख ४५ हजार लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले, कोरोनाची भीती गेल्याने बूस्टर डोस मोहीम थंडावली आहे. परंतु, कोरोना संसर्गाची तीव्रता सौम्य होण्याच्या दृष्टीने लसीकरण पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. साठहून अधिक वयोगटातील सुमारे २० लाख लाभार्थी बूस्टर डोससाठी पात्र आहेत. त्यातील केवळ ७.२५ लाख लाभार्थ्यांनी लसमात्रा घेतली आहे. राज्याचा विचार करता मुंबईत तीन लाख आणि पुण्यात सुमारे दोन लाख लाभार्थ्यांनी बूस्टर डोस घेतला आहे. 

दोन डोस घेतलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेला असल्यास त्यास तीन महिन्यांनंतर बूस्टर डोस दिला जाणार आहे. तर ६० वर्षांवरील सहव्याधीग्रस्त व्यक्तींना बूस्टर डोस घेण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांची संमती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे नाही. दरम्यान, बूस्टर डोस घेतल्यानंतरही सर्वांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, गर्दीत न जाणे व हाताची स्वच्छता राखणे हे नियम पाळावेच लागतील.

राज्यात दिवसभरात तीन हजार नवीन कोरोनाबाधित 

राज्यात मंगळवारी ३ हजार ०९८ नवीन कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. यामध्ये सहा कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात मुंबई, वसई विरार, पुणे, रत्नागिरी, सातारा आणि सोलापूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच, ४२०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण ७८,२१,१४० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८९ टक्के एवढे झाल्याची माहिती राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिली. पाच जलैपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२१,७८,५११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,८९,५११ (०९.७२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात एकूण २० हजार ८२० सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील मृत्यूदर १.८५ टक्के एवढा असल्याची माहिती राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिली.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस