शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

CoronaVirus: ...तर विनाअनुदानित शाळांवर दंडात्मक कारवाई, प्रसंगी मान्यता रद्द करणार, राज्यमंत्री बच्चू कडूंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 05:05 IST

CoronaVirus: आवश्यकतेनुससार, त्यांची मान्यता रद्द करण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सीमा महांगडे मुंबई : पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत राज्याच्या शिक्षण विभागाने या वर्गातील मुलांसाठी आॅनलाइन शिक्षण नको, अशा सूचना केल्या. परंतु, खासगी विनाअनुदानित शाळा त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हा शासन निर्णय नसून केवळ मार्गदर्शक सूचना असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, ज्या शाळा किंवा शिक्षणसंस्था या सूचनांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. आवश्यकतेनुससार, त्यांची मान्यता रद्द करण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.अनेक जिल्ह्यांतून पूर्व प्राथमिक ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण दिले जात असल्याच्या तक्ररी येत आहेत. पुण्यातील अशाच एका तक्रारीवर नुकतेच ते वर्ग बंद केल्याची माहिती राज्यमंत्र्यांनी दिली. या सर्वांवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच परिपत्रक काढून जिल्ह्यांना, शैक्षणिक संस्थांना देण्यात येईल. नियमांचे पालन सर्व शाळांनी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.>मनमानी खपवून घेतली जाणार नाहीशाळांनी शुल्कवाढ करू नये. सद्य:स्थितीत पालकांकडे शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये हे याआधीच शासन निर्णय व परिपत्रकांतून स्पष्ट केले आहे. शिक्षण विभागाच्या सूचनांना डावलून शाळा मनमानी करणार असतील तर त्यांना कारवाईला सामोरे जावेच लागेल, असा इशारा राज्यमंत्री कडू यांनी दिला.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू