शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांनी ठाकरे सरकारचं टेन्शन वाढवलं; लोकांना अधिक सतर्क राहण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 18:25 IST

केरळमध्ये ओनम सणानंतर कोरोना संक्रमितांच्या संख्येत बरीच वाढ झाल्याचं आढळून आलं.

मुंबई – गणेश चतुर्थीच्या निमित्ताने राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. या स्थितीत कोरोनाचं विघ्न पडू नये यासाठी जनतेने खबरदारी घेणं गरजेचे आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या कोविड नियमांचे तंतोतंत पालन करावे. गर्दी करू नये. गर्दीमुळे कोरोना संक्रमण वाढण्याचा धोका आहे. अन्य राज्यांकडे बघून आपण उदाहरण घेतलं पाहिजं. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावं असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

राजेश टोपे म्हणाले की, केरळमध्ये ओनम सणानंतर कोरोना संक्रमितांच्या संख्येत बरीच वाढ झाल्याचं आढळून आलं. सध्याच्या स्थितीत अन्य राज्यात संक्रमण कमी आहे परंतु केरळमध्ये भयंकर परिस्थिती आहे. केरळमध्ये यावेळी दर दिवसाला ३० हजाराच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. अपवादात्मक म्हणजे ६ सप्टेंबरला १९ हजार रुग्ण सापडले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यात कोरोना संक्रमण वाढत असल्याचं सांगितलं. यात मुंबई-पुण्याचाही सहभाग आहे.

राज्यातील ५ जिल्ह्यात संक्रमण वाढलं

मुंबई, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्येने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. या जिल्ह्यात कोरोना संक्रमिक संख्या अधिक आहे. राज्यातील एकूण कोरोना संक्रमित संख्येपैकी ७० टक्के याच जिल्ह्यातील आहेत. या जिल्ह्यात राहणाऱ्या लोकांना अधिक सतर्क राहणं गरजेचे आहे. मुंबईच्या ज्या भागात सर्वात उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो त्या परिसरात संक्रमण अधिक होण्याची भीती आहे. लालबागच्या राजा गणेशोत्सव पाहण्यासाठी खूप लांबून लोकं येतात. परंतु मुंबईत लालबाग आणि परळ भागात कोरोना संक्रमण सध्या जास्त आहे अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.

कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात १२ हजार ४१३, सातारा ६ हजार ३२८, मुंबई ४ हजार २७३, रत्नागिरी १०८१ आणि अहमदनगरमध्ये ४ हजार ९७५ रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरीत सोमवारी १२५ रुग्ण आढळले तर ५ जणांचा मृत्यू झाला. तर ११८ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या रत्नागिरी, चिपळूण तालुक्यात आहे. सातारा जिल्ह्यात सोमवारी ३०८ नवे कोरोना बाधित आढळले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे