शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

CoronaVirus News: राज्यात ११ लाख ३४ हजार रुग्ण कोविडमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 04:05 IST

CoronaVirus in Maharashtra: राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.३ झाले असून, मृत्युदर २.६४ टक्के

मुंबई : राज्यात दिवसभरात कोरोनाचे १६ हजार ८३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत ११ लाख ३४ हजार ४५५ रुग्ण कोविडमुक्त झाले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.३ झाले असून, मृत्युदर २.६४ टक्के आहे.राज्यात शनिवारी १४ हजार ३४८ रुग्ण आणि २७८ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १४ लाख ३० हजार ८६१ झाली असून, बळींचा आकडा ३७ हजार ७५८ वर पोहोचला आहे.दिवसभरात नोंदविलेल्या २७८ मृत्यूंमध्ये मुंबई ४६, ठाणे २, ठाणे मनपा १३, नवी मुंबई मनपा ५, कल्याण-डोंबिवली मनपा १०, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा-भार्इंदर मनपा ४, पालघर ३, वसई-विरार मनपा २, रायगड २, पनवेल मनपा ६ आदी रुग्णांचा समावेश आहे. सध्या राज्यात २२ लाख ३ हजार ९६६ व्यक्ती घरगुती अलगीकरणात, तर २८ हजार ४१४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.मुंबईत कोरोनाचे ९ हजारांहून अधिक बळीमुंबई : मागील सहा महिन्यांत मुंबईत कोरोनाचे तब्बल ९ हजारांहून अधिक बळी गेले. शहर-उपनगरात दिवसभरात कोरोनाच्या २ हजार ४०२ रुग्णांचे निदान झाले असून, ४६ मृत्यू झाले. परिणामी, कोरोनाबाधितांची संख्या २ लाख १२ हजार ४६२ झाली असून, मृतांचा आकडा ९ हजार ६० आहे.आतापर्यंत मुंबईतील १ लाख ७३ हजार ६७० रुग्ण कोविडमुक्त झाले असून, सध्या २९ हजार ३१४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ८२ टक्क्यांवर आला असून, रुग्णदुपटीचा कालावधी ६४ दिवसांवर गेला आहे. २६ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.०९ टक्के नोंदविण्यात आला. तर, शुक्रवारपर्यंत ११ लाख ५७ हजार ३९ कोविडच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.सध्या मुंबईत चाळ व झोपडपट्टीत ६७४ सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत. सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ९ हजार २८० इतकी आहे. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील १९ हजार ९७६ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या