शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Coronavirus: राज्यात आतापर्यंत कोरोनाचे १ लाख ५९ हजार रुग्ण; दिवसभरात ५,३१८ रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 08:22 IST

मुंबईत दिवसभरात १ हजार ४०२ रुग्णांचे निदान झाले, तर ४१ मृत्यू झाले. त्यामुळे रुग्णसंख्या ७४ हजार २५२ झाली असून मृत्यू ४ हजार २८४ झाले आहेत.

मुंबई : राज्यात शनिवारी ५ हजार ३१८ रुग्णांची नोंद झाली असून १६७ मृत्यू झाले. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या १ लाख ५९ हजार १३३ झाली आहे. तर मृत्यू ७ हजार २७२ झाले आहेत. मागील काही दिवसांत राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून हे प्रमाण आता ५२.९४ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्यूदर ४.५७ टक्के आहे.

राज्यात ६७ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी नोंद झालेल्या १६७ मृत्यूंपैकी ८६ मृत्यू मागील ४८ तासांत झाले आहेत. उर्वरित ८१ मृत्यू मागील काळातील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६४, जळगाव ५, धुळे ४, अहमदनगर २, नाशिक २, वसई विरार १, पिंपरी-चिंचवड १, जालना १ आणि लातूर १ यांचा समावेश आहे.

अन्य राज्य किंवा देशातील ७२ रुग्णराज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने १ लाख ५९ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यात अन्य राज्य वा देशातील ७२ कोरोना रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत २३ बाहेरील रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर ४९ सक्रिय रुग्ण आहेत.८४,२४५ जण झाले बरेदिवसभरात ४,४३० रुग्ण बरे झाले असून राज्यात आतापर्यंत ८४,२४५ जण कोविडमुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६५ हजार १६१ जण होम क्वारंटाईन आहेत, तर ३६ हजार ९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.मुंबईत कोरोनामुळे आणखी ४१ बळी

मुंबईत दिवसभरात १ हजार ४०२ रुग्णांचे निदान झाले, तर ४१ मृत्यू झाले. त्यामुळे रुग्णसंख्या ७४ हजार २५२ झाली असून मृत्यू ४ हजार २८४ झाले आहेत. सध्या मुंबईत २७ हजार ६३१ सक्रिय रुग्ण आहेत, तर आतापर्यंत ४२ हजार ३२९ रुग्ण बरे झाले आहेत. शनिवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ९६ हजार ८७४ नमुन्यांपैकी १७.७४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस