शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

Coronavirus: राज्यात आतापर्यंत कोरोनाचे १ लाख ५९ हजार रुग्ण; दिवसभरात ५,३१८ रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 08:22 IST

मुंबईत दिवसभरात १ हजार ४०२ रुग्णांचे निदान झाले, तर ४१ मृत्यू झाले. त्यामुळे रुग्णसंख्या ७४ हजार २५२ झाली असून मृत्यू ४ हजार २८४ झाले आहेत.

मुंबई : राज्यात शनिवारी ५ हजार ३१८ रुग्णांची नोंद झाली असून १६७ मृत्यू झाले. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या १ लाख ५९ हजार १३३ झाली आहे. तर मृत्यू ७ हजार २७२ झाले आहेत. मागील काही दिवसांत राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून हे प्रमाण आता ५२.९४ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्यूदर ४.५७ टक्के आहे.

राज्यात ६७ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी नोंद झालेल्या १६७ मृत्यूंपैकी ८६ मृत्यू मागील ४८ तासांत झाले आहेत. उर्वरित ८१ मृत्यू मागील काळातील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६४, जळगाव ५, धुळे ४, अहमदनगर २, नाशिक २, वसई विरार १, पिंपरी-चिंचवड १, जालना १ आणि लातूर १ यांचा समावेश आहे.

अन्य राज्य किंवा देशातील ७२ रुग्णराज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने १ लाख ५९ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यात अन्य राज्य वा देशातील ७२ कोरोना रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत २३ बाहेरील रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर ४९ सक्रिय रुग्ण आहेत.८४,२४५ जण झाले बरेदिवसभरात ४,४३० रुग्ण बरे झाले असून राज्यात आतापर्यंत ८४,२४५ जण कोविडमुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६५ हजार १६१ जण होम क्वारंटाईन आहेत, तर ३६ हजार ९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.मुंबईत कोरोनामुळे आणखी ४१ बळी

मुंबईत दिवसभरात १ हजार ४०२ रुग्णांचे निदान झाले, तर ४१ मृत्यू झाले. त्यामुळे रुग्णसंख्या ७४ हजार २५२ झाली असून मृत्यू ४ हजार २८४ झाले आहेत. सध्या मुंबईत २७ हजार ६३१ सक्रिय रुग्ण आहेत, तर आतापर्यंत ४२ हजार ३२९ रुग्ण बरे झाले आहेत. शनिवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ९६ हजार ८७४ नमुन्यांपैकी १७.७४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस